ETV Bharat / state

पारनेरचे नवनिर्वाचित आमदार निलेश लंकेंनी घेतले अण्णा हजारेंचे आशिर्वाद - निलेश लंकेंनी घेतले अण्णा हजारेंचे आशिर्वाद

पारनेर मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या विजय औटी यांनी पराभवाचा जोरदार धक्का देत निलेश लंके हे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत निवडून आले होते. त्यानंतर काल त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन अण्णांचे आशिर्वाद घेतले. यावेळी अण्णा हजारे यांनी लंकेंचे अभिनंदन करत, त्यांना समाजाचे प्रश्न सोडवा असा सल्ला दिला.

Nilesh Lanke took blessings from Anna Hajare
author img

By

Published : Oct 27, 2019, 2:45 AM IST

अहमदनगर - पारनेरचे नवनिर्वाचित आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. पारनेर मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या विजय औटी यांनी पराभवाचा जोरदार धक्का देत निलेश लंके हे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत निवडून आले होते. त्यानंतर काल त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन अण्णांचे आशिर्वाद घेतले. यावेळी अण्णा हजारे यांनी लंकेंचे अभिनंदन करत, त्यांना समाजाचे प्रश्न सोडवा असा सल्ला दिला.

पारनेर मतदारसंघ हा पूर्वी कम्युनिस्ट पक्षांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. त्यानंतर इथे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. 2004 साली मात्र, काँग्रेसचे विजय औटी यांनी शिवसेनेत प्रवेश करून विजय मिळवला. तिथून पुढे तीन वेळा सलग विजय मिळवत त्यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी औटी यांना विधानसभा उपाध्यक्षपद मिळाले होते. मात्र पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष असलेले निलेश लंके यांच्यात आणि औटी यांच्यात काही मुद्यांवर मतभेद झाले आणि लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर पेटून उठलेल्या लंके यांनी मतदारसंघात नियोजनबद्ध संघटना उभी करत अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले.

याच पार्श्वभूमीवर, वजनदार समजल्या जाणाऱ्या औटी यांना मोठ्या मताधिक्याने मात देत निलेश लंके यांनी मिळवलेला विजय मोठा मानला जात आहे.

हेही वाचा : नगर जिल्ह्यात पुन्हा आघाडी; भाजपच्या गडाला खिंडार, तर सेनेचा एकमेव शिलेदारही पराभूत

अहमदनगर - पारनेरचे नवनिर्वाचित आमदार निलेश लंके यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. पारनेर मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आलेल्या विजय औटी यांनी पराभवाचा जोरदार धक्का देत निलेश लंके हे यंदाच्या विधानसभा निवडणूकीत निवडून आले होते. त्यानंतर काल त्यांनी राळेगणसिद्धीमध्ये जाऊन अण्णांचे आशिर्वाद घेतले. यावेळी अण्णा हजारे यांनी लंकेंचे अभिनंदन करत, त्यांना समाजाचे प्रश्न सोडवा असा सल्ला दिला.

पारनेर मतदारसंघ हा पूर्वी कम्युनिस्ट पक्षांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जात असे. त्यानंतर इथे काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व होते. 2004 साली मात्र, काँग्रेसचे विजय औटी यांनी शिवसेनेत प्रवेश करून विजय मिळवला. तिथून पुढे तीन वेळा सलग विजय मिळवत त्यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला.

दरम्यान, काही महिन्यांपूर्वी औटी यांना विधानसभा उपाध्यक्षपद मिळाले होते. मात्र पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष असलेले निलेश लंके यांच्यात आणि औटी यांच्यात काही मुद्यांवर मतभेद झाले आणि लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर पेटून उठलेल्या लंके यांनी मतदारसंघात नियोजनबद्ध संघटना उभी करत अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले.

याच पार्श्वभूमीवर, वजनदार समजल्या जाणाऱ्या औटी यांना मोठ्या मताधिक्याने मात देत निलेश लंके यांनी मिळवलेला विजय मोठा मानला जात आहे.

हेही वाचा : नगर जिल्ह्यात पुन्हा आघाडी; भाजपच्या गडाला खिंडार, तर सेनेचा एकमेव शिलेदारही पराभूत

Intro:अहमदनगर- जोइंटकीलर निलेश लंकेनी घेतली अण्णा हजारेंचे आशीर्वाद..
Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_lanke_meet_hajare_image_7204297

अहमदनगर- जोइंटकीलर निलेश लंकेनी घेतली अण्णा हजारेंचे आशीर्वाद..

अहमदनगर- शिवसेनेकडून सलग तीन वेळेस आमदार आणि विधानसभा उपाध्यक्षपद असताना विजय औटी यांना पराभवाचा जोरदार धक्का देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश लंके यांनी समाजसेवक अण्णा हजारे यांची राळेगणसिद्धीत भेट घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी बोलताना अण्णांनी समाजाचे प्रश्न सोडवा, तुमचे अभिनंदन असे1म्हणत अभिनंदन केले. पारनेर ह्या मतदारसंघाची कम्युनिस्ट पार्टीचा मतदारसंघ संघ म्हणून पूर्वी ओळख होती. त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीने या मतदारसंघावर आपले वर्चस्व ठेवले. मात्र 2004 साली विजय औटी यांनी काँग्रेस मधून शिवसेनेत प्रवेश करून विजय मिळवला आणि पुढे 2014 पर्यंत तीन वेळेस हा मतदारसंघ आपल्या ताब्यात ठेवला. दरम्यान काही महिन्यांपूर्वी औटी यांना विधानसभा उपाध्यक्षपद मिळाले होते. मात्र पूर्वाश्रमीचे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष असलेले निलेश लंके यांच्यात आणि औटी यांच्यात काही मुद्यांवर मतभेद झाले आणि लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर पेटून उठलेल्या लंके यांनी मतदारसंघात नियोजनबद्ध संघटन उभे करत अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले. प्रस्थापित झालेले औटी यांची कार्यपद्धती, जनतेशी फटकून वागण्याची पद्धत नाराजीचे कारण ठरले, आणि पाणी प्रश्न, बेरोजगारी आदी प्रश्न हाती घेत लंके यांनी मतदारसंघात रान उठवले. याच पार्श्वभूमीवर वजनदार समजल्या जाणाऱ्या औटी यांना मोठ्या मताधिक्याने मात देत निलेश लंके यांनी मिळवलेला विजय मोठा मानला जात आहे.

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- जोइंटकीलर निलेश लंकेनी घेतली अण्णा हजारेंचे आशीर्वाद..
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.