ETV Bharat / state

कारगिल विजय दिनानिमित्त अहमदनगरमध्ये अभिवादन रॅली

अहमदनगर शहरातील जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने कारगिल विजय दिनानिमित्त रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी हातात तिरंगा घेत रॅलीतील युवकांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. श्रीराम चौक येथे कारगिलच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली.

author img

By

Published : Jul 28, 2019, 10:16 AM IST

jay-hind-sainik-seva-foundation-paid-tribute-to-kargil-martyrs-in-ahemadnagar

अहमदनगर - कारगिल विजय दिनानिमित्त जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. "भारत माता की जय!", "जय हिंद..!", "शहीद जवान अमर रहे!" अशा घोषणा देत, अबालवृद्धांनी कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली.

कारगिल विजय दिनानिमित्त अहमदनगरमध्ये अभिवादन रॅली


अहमदनगर शहरातील पाऊलबुद्धे विद्यालयातून निघालेली रॅली, सावेडी उपनगरातील रत्यावरून फिरत श्रीराम चौकात आली. या दरम्यान हातात तिरंगा घेत रॅलीतील युवकांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. श्रीराम चौक येथे कारगिलच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी आमदार शिवाजी कर्डीले, महापौर बाबासाहेब वाकळे, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पालवे आणि सामाजिक कार्यकर्त्या आशा साठे आदी उपस्थित होते.


पाकिस्तानने कारगिलमध्ये केलेली घुसखोरी भारतीय जवानांनी प्राणाची शर्थ करत शौर्याने हुसकावून लावली होती. या युद्धात पाचशेहून अधिक भारतीय जवानांनी देशासाठी आपले प्राणार्पण केले. या सर्वांच्या स्मृतींना उजाळा देत कारगिल विजयी दिन देशभरात साजरा केला जातो.

अहमदनगर - कारगिल विजय दिनानिमित्त जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. "भारत माता की जय!", "जय हिंद..!", "शहीद जवान अमर रहे!" अशा घोषणा देत, अबालवृद्धांनी कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांना आदरांजली वाहिली.

कारगिल विजय दिनानिमित्त अहमदनगरमध्ये अभिवादन रॅली


अहमदनगर शहरातील पाऊलबुद्धे विद्यालयातून निघालेली रॅली, सावेडी उपनगरातील रत्यावरून फिरत श्रीराम चौकात आली. या दरम्यान हातात तिरंगा घेत रॅलीतील युवकांनी देशभक्तीपर घोषणा दिल्या. श्रीराम चौक येथे कारगिलच्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी आमदार शिवाजी कर्डीले, महापौर बाबासाहेब वाकळे, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पालवे आणि सामाजिक कार्यकर्त्या आशा साठे आदी उपस्थित होते.


पाकिस्तानने कारगिलमध्ये केलेली घुसखोरी भारतीय जवानांनी प्राणाची शर्थ करत शौर्याने हुसकावून लावली होती. या युद्धात पाचशेहून अधिक भारतीय जवानांनी देशासाठी आपले प्राणार्पण केले. या सर्वांच्या स्मृतींना उजाळा देत कारगिल विजयी दिन देशभरात साजरा केला जातो.

Intro:अहमदनगर- कारगिल विजयी दिनानिमित्ताने
जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनची शहरातून भव्य अभिवादन रॅली..Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_kargil_rally_pkg_7204297

अहमदनगर- कारगिल विजयी दिनानिमित्ताने
जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनची शहरातून भव्य अभिवादन रॅली..

अहमदनगर- भारत माता की जय, जय हिंद.. शहीद जवान अमर रहें.. आदी घोषणा देत जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनच्या वतीने काढण्यात आलेल्या रॅलीतील युवकांनी परिसर देशभक्तीमय करून टाकला.. आज विसावा कारगील विजयी दिन देशभर उत्साहात साजरा होत असताना शहीद जवानांबद्दल आदरांजली वाहण्यात येत आहे. पाकिस्तानने कारगिल मधे केलेली घुसखोरी भारतीय जवानांनी प्राणाची शर्थ करत शौर्याने हुसकावून लावली. हिमालयाच्या दुर्गम बर्फ़ाळलेल्या उणे तापमानात भारतीय सैनिकांनी केलेली कामगिरी ही अतुलनीय आणि देशाची मान उंचावणारी अशीच आहे. या कारवाईत पाचशेच्या वर भारतीय जवानांनी आपले प्राणार्पण देशासाठी केले. या सर्वांची स्मृती ला आज उजाळा देत कारगिल विजयी दिन साजरा होत आहे. अहमदनगर शहरातील पाऊलबुद्धे विद्यालयातून निघालेली रॅली सावेडी उपनगरातील रत्यावरून फिरत श्रीराम चौकात आली. या दरम्यान हातात तिरंगा झेंडा घेत रॅलीतील युवकांनी देशप्रेमाच्या घोषणा दिल्या.. श्रीराम चौक इथे कारगिल शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. आ.शिवाजी कर्डीले, महापौर बाबासाहेब वाकळे, संस्थेचे अध्यक्ष शिवाजी पालवे, सामाजिक कार्यकर्त्या आशा साठे आदी यावेळी उपस्थित होते..

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- कारगिल विजयी दिनानिमित्ताने
जय हिंद सैनिक सेवा फाउंडेशनची शहरातून भव्य अभिवादन रॅली..
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.