ETV Bharat / state

जन आधार सामाजिक संघटनेने नगर-जामखेड रोडवरील पॅचिंगचे काम पाडले बंद

author img

By

Published : Nov 8, 2020, 2:44 PM IST

रस्त्याचे पॅचिंगचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत काम बंद पाडून जन आधार सामाजिक संघटनेच्यावतीने नगर-जामखेड रोड बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

jan-aadhar-sanghatna-agitation-in-ahmednagar
जन आधार सामाजिक संघटनेने नगर-जामखेड रोडवरील निकृष्ट पॅचींगचे काम पाडले बंद

राहुरी - नगर-जामखेड रोड येथे राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत जामखेड नाका ते आठवड या 19 किलोमीटर रस्त्याचे पॅचिंगचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत काम बंद पाडून जन आधार सामाजिक संघटनेच्यावतीने रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मागील महिन्यात जामखेड नाका ते आठवड या रस्त्यावर 19 किलोमीटरपर्यंत रस्ता पॅचिंगच्या कामाचे उद्घाटन झाले. खड्डे बुजवण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून, खड्डे फक्त खडी टाकून बुजवले जात आहे. त्या खड्ड्यांमध्ये डांबर सुद्धा वापरले जात नसल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. खड्डे बुजविण्याचे काम योग्य पध्दतीने न झाल्यास रस्त्यावर टाकण्यात येणारी लेयरदेखील जास्त काळ टिकणार नाही. रस्त्यासाठी सुमारे 15 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. एवढा खर्च करुन देखील रस्ता चांगला न झाल्यास पुढील वर्षी हीच समस्या उद्भवणार आहे. अशा निकृष्ट कामामुळे जनतेच्या पैशांची एकप्रकारे उधळपट्टी सुरू असल्याचे पोटे यांनी म्हटले. आंदोलनाची दखल न घेतल्यास नॅशनल हायवेच्या अभियंत्यास खुर्चीला बांधून ठेऊ, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

राहुरी - नगर-जामखेड रोड येथे राष्ट्रीय महामार्गाअंतर्गत जामखेड नाका ते आठवड या 19 किलोमीटर रस्त्याचे पॅचिंगचे काम निकृष्ट होत असल्याचा आरोप करत काम बंद पाडून जन आधार सामाजिक संघटनेच्यावतीने रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मागील महिन्यात जामखेड नाका ते आठवड या रस्त्यावर 19 किलोमीटरपर्यंत रस्ता पॅचिंगच्या कामाचे उद्घाटन झाले. खड्डे बुजवण्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत असून, खड्डे फक्त खडी टाकून बुजवले जात आहे. त्या खड्ड्यांमध्ये डांबर सुद्धा वापरले जात नसल्याचा आरोप संघटनेच्यावतीने करण्यात आला आहे. खड्डे बुजविण्याचे काम योग्य पध्दतीने न झाल्यास रस्त्यावर टाकण्यात येणारी लेयरदेखील जास्त काळ टिकणार नाही. रस्त्यासाठी सुमारे 15 कोटी रुपये निधी मंजूर झालेला आहे. एवढा खर्च करुन देखील रस्ता चांगला न झाल्यास पुढील वर्षी हीच समस्या उद्भवणार आहे. अशा निकृष्ट कामामुळे जनतेच्या पैशांची एकप्रकारे उधळपट्टी सुरू असल्याचे पोटे यांनी म्हटले. आंदोलनाची दखल न घेतल्यास नॅशनल हायवेच्या अभियंत्यास खुर्चीला बांधून ठेऊ, असा इशारा संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.

हेही वाचा- लोप पावत चाललेली अल्मोडाची 'काष्ठ कला'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.