ETV Bharat / state

संगमनेर तालुक्यात दुष्काळाची दाहकता वाढली; शेळ्या-मेंढ्यांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

author img

By

Published : Mar 31, 2019, 7:27 PM IST

संगमनेर तालुक्यातील पठारभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील शेळ्या-मेंढ्यांना खाण्यासाठी काहीच नसल्यामुळे त्यांना बाभळीचे डहाळे करून आपली भूक भागवावी लागत आहे.

संगमनेर तालुक्यातील गंभीर दुष्काळी परिस्थिती

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील पठारभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील शेळ्या-मेंढ्यांना खाण्यासाठी काहीच नसल्यामुळे त्यांना बाभळीचे डहाळे करून आपली भूक भागवावी लागत आहे. दुष्काळी परिस्थितीत पशुधन कसे सांभाळायचे यासाठी कसरत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

संगमनेर तालुक्याचा पठारभाग हा डोंगराळ असल्याने या परिसरातील काही भागात नेहमीच दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो. पठारभागातील वनकुटे, कुरकुंडी, रणखांब, पिंपळगाव देपा, पोखरी बाळेश्वर, सारोळे पठार, बोटा, साकुर, अकलापूर, माळेगाव पठार आदी गावांच्या वाड्यावस्त्यांवर येथील जनता पाणी टंचाईने हैराण झाली आहे. दररोज टँकर येतात. मात्र ते अपुरे पडतात. त्यामुळे पशुधन कसे सांभाळायचे असा प्रश्न येथील पशुपालक शेतकऱ्यांना पडला आहे.

उन्हाळा संपयाला अजून तीन ते चार महिने आहेत. हा काळ कसा काढायचा असाही यक्षप्रश्न येथील शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे. आम्ही मुलांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला. सोबतच जनावरांवर केलेला खर्च वसूल होत नसल्याने उदरनिर्वाह कसा करावा, मुलांचे शिक्षण आणि जनावरांचा चारा व पिण्यासाठीचे पाणी अशा संकटांचा सामना कसा करावा या चिंतेत येथील शेतकरी वर्ग आहे.

अहमदनगर - संगमनेर तालुक्यातील पठारभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. या परिसरातील शेळ्या-मेंढ्यांना खाण्यासाठी काहीच नसल्यामुळे त्यांना बाभळीचे डहाळे करून आपली भूक भागवावी लागत आहे. दुष्काळी परिस्थितीत पशुधन कसे सांभाळायचे यासाठी कसरत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

संगमनेर तालुक्याचा पठारभाग हा डोंगराळ असल्याने या परिसरातील काही भागात नेहमीच दुष्काळ पाचवीला पुजलेला असतो. पठारभागातील वनकुटे, कुरकुंडी, रणखांब, पिंपळगाव देपा, पोखरी बाळेश्वर, सारोळे पठार, बोटा, साकुर, अकलापूर, माळेगाव पठार आदी गावांच्या वाड्यावस्त्यांवर येथील जनता पाणी टंचाईने हैराण झाली आहे. दररोज टँकर येतात. मात्र ते अपुरे पडतात. त्यामुळे पशुधन कसे सांभाळायचे असा प्रश्न येथील पशुपालक शेतकऱ्यांना पडला आहे.

उन्हाळा संपयाला अजून तीन ते चार महिने आहेत. हा काळ कसा काढायचा असाही यक्षप्रश्न येथील शेतकऱयांसमोर उभा ठाकला आहे. आम्ही मुलांच्या शिक्षणावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला. सोबतच जनावरांवर केलेला खर्च वसूल होत नसल्याने उदरनिर्वाह कसा करावा, मुलांचे शिक्षण आणि जनावरांचा चारा व पिण्यासाठीचे पाणी अशा संकटांचा सामना कसा करावा या चिंतेत येथील शेतकरी वर्ग आहे.

Intro:

Shirdi_ Ravindra Mahale

ANCHOR_ संगमनेर तालुक्यातील पठारभागात दुष्काळी स्थिती निर्माण झाल्याने शेळ्या-मेंढ्यांना खाण्यासाठी काहीच नसल्यामुळे त्यांना बाभळीचे डहाळे करून भूक भागवावी लागत आहे..दुष्काळी परिस्थितीत पशुधन कसे सांभाळायचे यासाठी कसरत करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे....


VO_ संगमनेर तालुक्याचा पठारभाग हा डोंगराळ भागात असल्याने काही भागात नेहमीच दुष्काळ पाचवीलाच पुजलेला असतो.पठारभागातील वनकुटे,कुरकुंडी,रणखांब, पिंपळगाव देपा,पोखरी बाळेश्वर,सारोळे पठार,बोटा,साकुर,अकलापूर, माळेगाव पठार आदी गावांच्या वाड्यावस्त्यांवर येथील जनता पाणी टंचाईच्या हैराण झाली आहे.दररोज टँकर येतात.मात्र ते पुरत नाही त्यामुळे पशुपालकांना पशुधन कसे सांभाळायचे या संकटात शेतकरी सापडले आहेत.अजून तीन ते चार महिने कसे काढायचे या विचाराने शेतकरी चिंताग्रस्त आहेत.आतापासूनच खऱ्या उन्हाळ्याच्या झळा पठारभागातील जनतेला सोसावे लागत आहे.शेतकऱ्यांनी केलेला खर्चही वसूल होत नसल्याने उदरनिर्वाह कसा करावा,मुलांचे शिक्षण व मोठा प्रश्न म्हणजे जनावरांचा चारा व पिण्यासाठी पाणी अशा संकटांचा सामना कसा करावा याची चिंता अधिक सतावत आहे....Body:31 March Shirdi Sangamner DroughtConclusion:31 March Shirdi Sangamner Drought
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.