ETV Bharat / state

अहमदनगर: महायुती होणार पण जागांचे वाटप नव्यानेच करावे लागणार - राम शिंदे - राम शिंदेंचे महायुतीवर भाष्य

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आणि राहाता या जागा सेनेकडे असल्या तरी भाजपत नव्याने दाखल झालेले आमदार वैभव पिचड आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासाठी या जागा शिवसेनेला सोडाव्या लागतील, अशी माहिती राम शिंदेंनी आज माध्यमांशी बोलताना दिली.

मंत्री राम शिंदे
author img

By

Published : Aug 21, 2019, 9:53 PM IST

अहमदनगर - महायुती होणार पण जागांचे वाटप नव्याने करावेच लागणार, असे वक्तव्य अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. त्यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनेच्या जागांवर भाजपचा डोळा असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे शिवसेना याला काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महायुतीच्या जागा वाटपाबाबत माहिती देताना मंत्री राम शिंदे

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी आणि सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात येणार आहे. त्यानिमित्त आज (बुधवारी) यात्रेच्या नियोजनासाठी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर बोलताना शिंदे यांनी विधानसभेसाठी युती होणार असली तरी जागांचे वाटप नव्याने करावेच लागणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यात २०१४ साली सेना-भाजप स्वतंत्र लढले. सध्या भाजपचे १२३ आमदार आहेत तर शिवसेनेचे ६३ आमदार असून सेना ज्या जागा कधीच जिंकली नाही, अशा अनेक ठिकाणी भाजपत नव्याने दाखल झालेल्यांसाठी या जागा सेनेला सोडाव्या लागतील, असे स्पष्ट केले. त्यासाठी त्यांनी राहात्याच्या जागेचे उदाहरण देत ही जागा राधाकृष्ण विखे यांच्यासाठी सोडावी लागेल, असे सांगितले.

जिल्ह्यातील अकोले आणि राहाता या जागा सेनेकडे असल्या तरी भाजपत नव्याने दाखल झालेले आमदार वैभव पिचड आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासाठी सद्यस्थितीत असलेली जागा सोडावी लागेल, अशी माहिती शिंदेंनी आज माध्यमांशी बोलताना दिली. त्याच बरोबर शिवसेनेचा बालेकिल्ला समजली जाणारी नगर शहराची जागा ही भाजपकडे यावी, यासाठी मोठी मोर्चे बांधणी सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री सोमवारी बोलतील, असे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले.

अहमदनगर - महायुती होणार पण जागांचे वाटप नव्याने करावेच लागणार, असे वक्तव्य अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी केले. त्यांच्या वक्तव्यावरुन शिवसेनेच्या जागांवर भाजपचा डोळा असल्याचे उघड होत आहे. त्यामुळे शिवसेना याला काय प्रतिक्रिया देते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

महायुतीच्या जागा वाटपाबाबत माहिती देताना मंत्री राम शिंदे

मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा रविवारी आणि सोमवारी अहमदनगर जिल्ह्यात येणार आहे. त्यानिमित्त आज (बुधवारी) यात्रेच्या नियोजनासाठी बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर बोलताना शिंदे यांनी विधानसभेसाठी युती होणार असली तरी जागांचे वाटप नव्याने करावेच लागणार असल्याचे सांगितले. तसेच राज्यात २०१४ साली सेना-भाजप स्वतंत्र लढले. सध्या भाजपचे १२३ आमदार आहेत तर शिवसेनेचे ६३ आमदार असून सेना ज्या जागा कधीच जिंकली नाही, अशा अनेक ठिकाणी भाजपत नव्याने दाखल झालेल्यांसाठी या जागा सेनेला सोडाव्या लागतील, असे स्पष्ट केले. त्यासाठी त्यांनी राहात्याच्या जागेचे उदाहरण देत ही जागा राधाकृष्ण विखे यांच्यासाठी सोडावी लागेल, असे सांगितले.

जिल्ह्यातील अकोले आणि राहाता या जागा सेनेकडे असल्या तरी भाजपत नव्याने दाखल झालेले आमदार वैभव पिचड आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्यासाठी सद्यस्थितीत असलेली जागा सोडावी लागेल, अशी माहिती शिंदेंनी आज माध्यमांशी बोलताना दिली. त्याच बरोबर शिवसेनेचा बालेकिल्ला समजली जाणारी नगर शहराची जागा ही भाजपकडे यावी, यासाठी मोठी मोर्चे बांधणी सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री सोमवारी बोलतील, असे सूतोवाचही त्यांनी यावेळी केले.

Intro:अहमदनगर- महायुती होणार पण जागांचे वाटप नव्याने करावेच लागणार -राम शिंदे
शिवसेनेच्या जागांवर भाजपचा डोळा !!Body:अहमदनगर- राजेंद्र त्रिमुखे
Slug-
mh_ahm_01_ram_shinde_on_yuti_bite_7204297

अहमदनगर- महायुती होणार पण जागांचे वाटप नव्याने करावेच लागणार -राम शिंदे
शिवसेनेच्या जागांवर भाजपचा डोळा !!

अहमदनगर- मुख्यमंत्र्यांची महाजनांदेश यात्रा येत्या रविवार-सोमवार नगर जिल्ह्यात असताना भारतीय जनता पक्षाला चांगलेच भरते आले आहे. त्याचा प्रत्येय आज बुधवारी झालेली यात्रेच्या नियोजन बैठकी नंतर बोलताना राम शिंदे यांच्या वक्तव्या वरून आलाय. विधानसभेसाठी युती होणार असली तरी जागांचे वाटप नव्याने करावेच लागणार असल्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी निक्षून सांगितले. राज्यात 2014 साली सेना-भाजप स्वतंत्र लढले. सध्या भाजपचे 123 आमदार आहेत तर शिवसेनेचे 63 आमदार असल्याचा दाखला देत शिंदे यांनी सेना ज्या जागा कधीच जिंकली नाही अशा अनेक ठिकाणी भाजपात नव्याने दाखल झालेल्यांसाठी या जागा भाजपला सोडाव्या लागतील असे स्पष्ट केले. त्यासाठी त्यांनी राहात्याच्या जागेचे उदाहरण देत ही जागा राधाकृष्ण विखे यांच्या साठी सोडावी लागेल असे सांगितले.
जिल्ह्यातील अकोले,राहाता या जागा शिवसेने कडे असल्या तरी भाजपात नव्याने दाखल झालेले आ.वैभव पिचड आणि मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या साठी सद्य स्थितित असलेली जागा सोडावी लागणार आहे. याचे स्पष्ट शब्दात संकेत पालकमंत्री राम शिंदे यांनी आज माध्यमांशी बोलताना दिले. त्याच बरोबर शिवसेनेचा बालेकिल्ला समजली जाणारी नगर शहराची जागा ही भाजप कडे यावी यासाठी मोठी मोर्चे बांधणी सुरू आहे. याबाबत मुख्यमंत्री सोमवारी बोलतील असे सूतोवाचही आज करण्यात आले.
मोठा भाऊ भाजपच !!

-राजेंद्र त्रिमुखे, अहमदनगर.Conclusion:अहमदनगर- महायुती होणार पण जागांचे वाटप नव्याने करावेच लागणार -राम शिंदे
शिवसेनेच्या जागांवर भाजपचा डोळा !!
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.