ETV Bharat / sports

क्रीडा क्षेत्रातील तुमचे योगदान कायम स्मरणात राहील, मोदींनी वाहिली बलबीर सिंग यांना श्रद्धांजली

author img

By

Published : May 25, 2020, 7:47 PM IST

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून बलबीर सिंग यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

PM Narendra Modi pays rich tribute to hockey legend Balbir Singh Senior
क्रीडाक्षेत्रातील तुमचे योगदान कायम स्मरणात राहील, मोदींनी वाहिली बलबीर सिंग यांना श्रद्धांजली

मुंबई - ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भारताचे महान हॉकीपटू बलबीर सिंग दोसांज (बलबीर सिनियर) यांचे आज (दि. २५ मे) मोहालीमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. ८ मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून बलबीर सिंग यांना श्रद्धांजली वाहली आहे. ते त्याच्या ट्विटमध्ये म्हणतात, 'पद्मश्री बलबीर सिंग हे त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल नेहमीच लक्षात राहतील. त्यांनी अनेकदा अभिमानाने आणि धैर्याने आपल्या देशाचे नाव जागतिक पातळीवर मोठे केले. ते एक उत्कृष्ट हॉकीपटू होते. त्यासोबत त्यांनी एक मार्गदर्शक म्हणूनही विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाने मी अतिशय दुःखी झालो आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो.'

  • Padma Shri Balbir Singh Sr. Ji will be remembered for his memorable sporting performances. He brought home lots of pride and laurels. Undoubtedly a brilliant hockey player, he also made a mark as a great mentor. Pained by his demise. Condolences to his family and well wishers.

    — Narendra Modi (@narendramodi) May 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बलबीर सिंग १९४८, १९५२ आणि १९५६ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. ते १९५२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक बनले होते. या स्पर्धेत भारताने एकूण १३ गोल केले. यातील तब्बल ९ गोल बलबीर यांनी केले. यात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील हॅट्ट्रिकचा समावेश आहे. नेदरलँडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांनी ५ गोल केले. अंतिम सामन्यात एका खेळाडूने केलेले हे सर्वाधिक गोल आहेत. हा एक विक्रम आहे. आजघडीपर्यंत कोणत्याही हॉकीपटूला हा विक्रम मोडता आला नाही. भारताने हा सामना ६-१ने जिंकला होता. बलबीर सिंग १९७५ सालच्या विश्वकप विजेत्या संघाचे, संघ मॅनेजरही होते. या संघाचे नेतृत्व अजित पाल सिंग यांनी केले.

बलबीर यांना १९५६ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. भारत सरकारने त्यांना १९५७ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

मुंबई - ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते भारताचे महान हॉकीपटू बलबीर सिंग दोसांज (बलबीर सिनियर) यांचे आज (दि. २५ मे) मोहालीमध्ये निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. ८ मे रोजी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर मोहालीच्या फोर्टिस रुग्णालयात उपचार सुरू होते. आज पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांनी ट्विटच्या माध्यमातून बलबीर सिंग यांना श्रद्धांजली वाहली आहे. ते त्याच्या ट्विटमध्ये म्हणतात, 'पद्मश्री बलबीर सिंग हे त्यांच्या क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल नेहमीच लक्षात राहतील. त्यांनी अनेकदा अभिमानाने आणि धैर्याने आपल्या देशाचे नाव जागतिक पातळीवर मोठे केले. ते एक उत्कृष्ट हॉकीपटू होते. त्यासोबत त्यांनी एक मार्गदर्शक म्हणूनही विशेष ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाने मी अतिशय दुःखी झालो आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती ईश्वर देवो.'

  • Padma Shri Balbir Singh Sr. Ji will be remembered for his memorable sporting performances. He brought home lots of pride and laurels. Undoubtedly a brilliant hockey player, he also made a mark as a great mentor. Pained by his demise. Condolences to his family and well wishers.

    — Narendra Modi (@narendramodi) May 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बलबीर सिंग १९४८, १९५२ आणि १९५६ साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य होते. ते १९५२च्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक बनले होते. या स्पर्धेत भारताने एकूण १३ गोल केले. यातील तब्बल ९ गोल बलबीर यांनी केले. यात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यातील हॅट्ट्रिकचा समावेश आहे. नेदरलँडविरुद्धच्या अंतिम सामन्यात त्यांनी ५ गोल केले. अंतिम सामन्यात एका खेळाडूने केलेले हे सर्वाधिक गोल आहेत. हा एक विक्रम आहे. आजघडीपर्यंत कोणत्याही हॉकीपटूला हा विक्रम मोडता आला नाही. भारताने हा सामना ६-१ने जिंकला होता. बलबीर सिंग १९७५ सालच्या विश्वकप विजेत्या संघाचे, संघ मॅनेजरही होते. या संघाचे नेतृत्व अजित पाल सिंग यांनी केले.

बलबीर यांना १९५६ सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. भारत सरकारने त्यांना १९५७ साली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.