ETV Bharat / sports

श्रीलंकन कर्णधार दासुन शनाकाचा तिन्ही सामने जिंकण्याचा निर्धार

author img

By

Published : Oct 19, 2021, 5:36 PM IST

आयसीसी टी -20 वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका म्हणाला, "तिन्ही सामने जिंकून निश्चितच आम्ही चांगल्या स्थितीत असू. यामुळे आम्हाला मुख्य स्पर्धेतील परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत होईल."

दासुन शनाकाचा तिन्ही सामने जिंकण्याचा निर्धार
दासुन शनाकाचा तिन्ही सामने जिंकण्याचा निर्धार

अबू धाबी - नामिबियाविरुद्ध आयसीसी टी -20 विश्वचषकाचा पहिला सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका म्हणाला की, त्याच्या संघाला सुरुवातीच्या टप्प्यातील सर्व तीन सामने जिंकून मुख्य स्पर्धेची तयारी करायला आवडेल.

"तीनही सामने जिंकून आम्ही नक्कीच चांगल्या स्थितीत असू. यामुळे आम्हाला मुख्य स्पर्धेतील परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत होईल," शनाकाने सामन्यानंतर पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना सांगितले. त्याने 'प्लेअर ऑफ द मॅच' महिष थिक्षणा याचे कौतुक केले आणि सांगितले की तो एक शानदार फिरकीपटू अजंथा मेंडिससोबत सराव करतो.

आपला दुसरा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या महिष थिक्षणा याने चार षटकांत 25 धावा देऊन तीन बळी घेतले. "थिक्षणाची कामगिरी विलक्षण आहे. तो अजंथा मेंडिससोबत सराव करतो आणि भविष्यात त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत," असे कर्णधार म्हणाला.

आपल्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना थिक्षणा म्हणाला, "देशाचे प्रतिनिधित्व करताना मला खरोखर आनंद झाला आहे." तो म्हणाला, "माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे कारण मी फक्त 21 वर्षांचा आहे. माझा स्टॉक बॉल ऑफ स्पिन आहे. मला माझ्या देशाचे अधिक प्रतिनिधित्व करायचे आहे पण मी एका वेळी एका सामन्याबद्दल विचार करत आहे."

नामिबियाचा कर्णधार एरार्ड इरास्मस म्हणाला की, सामना हरल्यानंतरही त्याचा संघ सकारात्मक गोष्टींचा विचार करेल. तो म्हणाला, "आम्हाला सकारात्मक घ्यावे लागेल. आम्हाला पुन्हा संघटित व्हावे लागेल कारण आमच्याकडे दोन अतिशय महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. मला वाटते श्रीलंकेचा गोलंदाजीचा मारा चांगला आहे. आम्ही फक्त 96 धावा करू शकलो, त्यामुळे फलंदाजांनी चांगले योगदान दिले पाहिजे. "

हेही वाचा - टी 20 विश्वचषक : भारत पाकिस्तान सामन्याला ग्रहण, राऊत ओवैसींसह या नेत्यांचा विरोध

अबू धाबी - नामिबियाविरुद्ध आयसीसी टी -20 विश्वचषकाचा पहिला सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेचा कर्णधार दासुन शनाका म्हणाला की, त्याच्या संघाला सुरुवातीच्या टप्प्यातील सर्व तीन सामने जिंकून मुख्य स्पर्धेची तयारी करायला आवडेल.

"तीनही सामने जिंकून आम्ही नक्कीच चांगल्या स्थितीत असू. यामुळे आम्हाला मुख्य स्पर्धेतील परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत होईल," शनाकाने सामन्यानंतर पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना सांगितले. त्याने 'प्लेअर ऑफ द मॅच' महिष थिक्षणा याचे कौतुक केले आणि सांगितले की तो एक शानदार फिरकीपटू अजंथा मेंडिससोबत सराव करतो.

आपला दुसरा टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या महिष थिक्षणा याने चार षटकांत 25 धावा देऊन तीन बळी घेतले. "थिक्षणाची कामगिरी विलक्षण आहे. तो अजंथा मेंडिससोबत सराव करतो आणि भविष्यात त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत," असे कर्णधार म्हणाला.

आपल्या कामगिरीबद्दल आनंद व्यक्त करताना थिक्षणा म्हणाला, "देशाचे प्रतिनिधित्व करताना मला खरोखर आनंद झाला आहे." तो म्हणाला, "माझ्यासाठी हा खूप मोठा क्षण आहे कारण मी फक्त 21 वर्षांचा आहे. माझा स्टॉक बॉल ऑफ स्पिन आहे. मला माझ्या देशाचे अधिक प्रतिनिधित्व करायचे आहे पण मी एका वेळी एका सामन्याबद्दल विचार करत आहे."

नामिबियाचा कर्णधार एरार्ड इरास्मस म्हणाला की, सामना हरल्यानंतरही त्याचा संघ सकारात्मक गोष्टींचा विचार करेल. तो म्हणाला, "आम्हाला सकारात्मक घ्यावे लागेल. आम्हाला पुन्हा संघटित व्हावे लागेल कारण आमच्याकडे दोन अतिशय महत्त्वाचे सामने खेळायचे आहेत. मला वाटते श्रीलंकेचा गोलंदाजीचा मारा चांगला आहे. आम्ही फक्त 96 धावा करू शकलो, त्यामुळे फलंदाजांनी चांगले योगदान दिले पाहिजे. "

हेही वाचा - टी 20 विश्वचषक : भारत पाकिस्तान सामन्याला ग्रहण, राऊत ओवैसींसह या नेत्यांचा विरोध

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.