ETV Bharat / sports

कगिसो रबाडाकडे परतली 'पर्पल कॅप'

author img

By

Published : Nov 3, 2020, 3:17 PM IST

'पर्पल' कॅप मिळवणाऱ्या रबाडाने १४ सामन्यांमध्ये एकूण २५ बळी घेतले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मुंबईचा बुमराह असून त्याने १३ सामन्यात २३ बळी घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने १४ सामन्यात २० बळी घेत तिसरे स्थान राखले आहे.

ipl 2020 orange cap and purple cap holders
कगिसो रबाडाकडे परतली 'पर्पल कॅप'

नवी दिल्ली - आयपीएलच्या ५५व्या सामन्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' स्वत:कडे राखली आहे. तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे परतली आहे. रबाडाने मुंबईच्या जसप्रीत बुमराहकडून 'पर्पल कॅप' स्वत:कडे घेतली आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.

यंदाच्या हंगामात राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने १४ सामन्यांत ६७० धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर दिल्लीचा शिखर धवन असून त्याच्या खात्यात १४ सामन्यात ५२५ धावा आहेत. तिसऱ्या स्थानी बंगळुरूचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल असून त्याने १४ सामन्यात ४७२ धावा केल्या आहेत.

तर, 'पर्पल' कॅप मिळवणाऱ्या रबाडाने १४ सामन्यांमध्ये एकूण २५ बळी घेतले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मुंबईचा बुमराह असून त्याने १३ सामन्यात २३ बळी घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने १४ सामन्यात २० बळी घेत तिसरे स्थान राखले आहे.

गुणतालिकेची सद्यस्थिती -

सद्याच्या घडीला मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. तर, कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात प्लेऑफच्या चौथ्या स्थानासाठी झुंज आहे.

नवी दिल्ली - आयपीएलच्या ५५व्या सामन्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार लोकेश राहुलने 'ऑरेंज कॅप' स्वत:कडे राखली आहे. तर, 'पर्पल' कॅप दिल्ली कॅपिटल्सच्या कगिसो रबाडाकडे परतली आहे. रबाडाने मुंबईच्या जसप्रीत बुमराहकडून 'पर्पल कॅप' स्वत:कडे घेतली आहे. लीगमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला 'ऑरेंज कॅप' देण्यात येते. तर, सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला 'पर्पल कॅप' देण्यात येते.

यंदाच्या हंगामात राहुलने सर्वाधिक धावा केल्या आहेत. राहुलने १४ सामन्यांत ६७० धावा केल्या आहेत. या यादीमध्ये दुसर्‍या क्रमांकावर दिल्लीचा शिखर धवन असून त्याच्या खात्यात १४ सामन्यात ५२५ धावा आहेत. तिसऱ्या स्थानी बंगळुरूचा सलामीवीर फलंदाज देवदत्त पडिक्कल असून त्याने १४ सामन्यात ४७२ धावा केल्या आहेत.

तर, 'पर्पल' कॅप मिळवणाऱ्या रबाडाने १४ सामन्यांमध्ये एकूण २५ बळी घेतले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर मुंबईचा बुमराह असून त्याने १३ सामन्यात २३ बळी घेतले आहेत. राजस्थान रॉयल्सच्या जोफ्रा आर्चरने १४ सामन्यात २० बळी घेत तिसरे स्थान राखले आहे.

गुणतालिकेची सद्यस्थिती -

सद्याच्या घडीला मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहे. तर, कोलकाता नाइट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात प्लेऑफच्या चौथ्या स्थानासाठी झुंज आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.