ETV Bharat / sports

Ind vs Aus test series : 75 वर्षांपूर्वी खेळला गेला भारत ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटचा पहिला सामना; जाणून घ्या काय इतिहास

author img

By

Published : Feb 6, 2023, 3:08 PM IST

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिला कसोटी सामना कधी खेळला गेला आणि त्याचा इतिहास काय? पहिल्या सामन्यात भारतीय संघाचे नशीब कामी आले नाही आणि टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला.

Ind vs Aus test series
भारत ऑस्ट्रेलिया कसोटी क्रिकेटचा इतिहास

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर तीन महिन्यांनी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटचा पहिला सामना 75 वर्षांपूर्वी खेळला गेला होता. टीम इंडिया ऑस्ट्रेलियात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेली होती. या मालिकेतील पहिला सामना 28 नोव्हेंबर 1947 रोजी ब्रिस्बेन येथे खेळला गेला. टीम इंडिया इंग्लंडशिवाय दुसऱ्या देशाविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळत असताना भारतासाठी ही पहिलीच संधी होती. त्या काळात लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ब्रिस्बेन क्रिकेट स्टेडियमवर पूर्ण ताकद लावत होती. दुसरीकडे, महान फलंदाज डोनाल्ड ब्रॅडमन ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते.

टीम इंडिया सुरुवातीपासूनच खिळखिळी : या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बॅडमॅनने शानदार फलंदाजी करताना 185 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने 8 गडी गमावून 382 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज किथ मिलरने 58, लिंडसे हॅसेटने 48 आणि आर्थर मॉरिसने 47 धावा केल्या. भारताचा कर्णधार लाला अमरनाथने 4 आणि विनू मंकडने 3 बळी घेतले. याशिवाय चंदू सरवटेलाही एक विकेट मिळाली. त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा पहिल्याच चेंडूवर विनू मंकड बाद झाला. अशाप्रकारे टीम इंडिया सुरुवातीपासूनच खिळखिळी झाली. भारताचा गुल मोहम्मदही शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

98 धावा करून ऑलआऊट : भारतीय संघ 100 धावाही करू शकला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतासाठी काही खास नव्हता. चंदू सरवटे 26 धावा करून भारताचा 9वा विकेट म्हणून बाद झाला. अशाप्रकारे टीम इंडिया केवळ 98 धावा करून ऑलआऊट झाली आणि 100 धावाही करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाने भारताचा 226 धावांनी पराभव केला. याशिवाय पुढील चार कसोटी सामन्यांमध्येही भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर 0-5 असा विजय मिळवला होता.

येणारी कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया जिंकू शकतो : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारी रोजी नागपुरात खेळवला जाणार आहे. ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाहीत. या दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. चॅपलने 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'मध्ये लिहिले की, ऑस्ट्रेलिया मालिका जिंकू शकतो. ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे भारतीय संघ कमकुवत दिसत आहे. विराट कोहलीवर खूप काही दडपण असणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने रणजी ट्रॉफीद्वारे पुनरागमन केले असून, गुरुवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी तो संघात आहे. टर्निंग विकेट्सवर नॅथन लायनपेक्षा ॲश्टन आगरला प्राधान्य द्यायला हवे, असे चॅपल म्हणाले.

हेही वाचा : India vs Australia Test Series : कसोटी मालिकेत भारताला करावी लागणार मेहनत; अन्यथा पराभवाचा धोका : ग्रेग चॅपल

नवी दिल्ली : स्वातंत्र्यानंतर तीन महिन्यांनी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी क्रिकेटचा पहिला सामना 75 वर्षांपूर्वी खेळला गेला होता. टीम इंडिया ऑस्ट्रेलियात 5 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी गेली होती. या मालिकेतील पहिला सामना 28 नोव्हेंबर 1947 रोजी ब्रिस्बेन येथे खेळला गेला. टीम इंडिया इंग्लंडशिवाय दुसऱ्या देशाविरुद्ध कसोटी क्रिकेट खेळत असताना भारतासाठी ही पहिलीच संधी होती. त्या काळात लाला अमरनाथ यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया ब्रिस्बेन क्रिकेट स्टेडियमवर पूर्ण ताकद लावत होती. दुसरीकडे, महान फलंदाज डोनाल्ड ब्रॅडमन ऑस्ट्रेलियाचे कर्णधार होते.

टीम इंडिया सुरुवातीपासूनच खिळखिळी : या सामन्यात ऑस्ट्रेलियन कर्णधाराने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार बॅडमॅनने शानदार फलंदाजी करताना 185 धावा केल्या. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने 8 गडी गमावून 382 धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज किथ मिलरने 58, लिंडसे हॅसेटने 48 आणि आर्थर मॉरिसने 47 धावा केल्या. भारताचा कर्णधार लाला अमरनाथने 4 आणि विनू मंकडने 3 बळी घेतले. याशिवाय चंदू सरवटेलाही एक विकेट मिळाली. त्यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला तेव्हा पहिल्याच चेंडूवर विनू मंकड बाद झाला. अशाप्रकारे टीम इंडिया सुरुवातीपासूनच खिळखिळी झाली. भारताचा गुल मोहम्मदही शून्यावर बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतला.

98 धावा करून ऑलआऊट : भारतीय संघ 100 धावाही करू शकला नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना भारतासाठी काही खास नव्हता. चंदू सरवटे 26 धावा करून भारताचा 9वा विकेट म्हणून बाद झाला. अशाप्रकारे टीम इंडिया केवळ 98 धावा करून ऑलआऊट झाली आणि 100 धावाही करू शकले नाहीत. ऑस्ट्रेलियाने भारताचा 226 धावांनी पराभव केला. याशिवाय पुढील चार कसोटी सामन्यांमध्येही भारतीय संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारतावर 0-5 असा विजय मिळवला होता.

येणारी कसोटी मालिका ऑस्ट्रेलिया जिंकू शकतो : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना ९ फेब्रुवारी रोजी नागपुरात खेळवला जाणार आहे. ऋषभ पंत आणि जसप्रीत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळणार नाहीत. या दोन महत्त्वाच्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला याचा नक्कीच फायदा होणार आहे. चॅपलने 'सिडनी मॉर्निंग हेराल्ड'मध्ये लिहिले की, ऑस्ट्रेलिया मालिका जिंकू शकतो. ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह या प्रमुख खेळाडूंच्या दुखापतींमुळे भारतीय संघ कमकुवत दिसत आहे. विराट कोहलीवर खूप काही दडपण असणार आहे. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरल्यानंतर अष्टपैलू रवींद्र जडेजाने रणजी ट्रॉफीद्वारे पुनरागमन केले असून, गुरुवारपासून नागपुरात सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी तो संघात आहे. टर्निंग विकेट्सवर नॅथन लायनपेक्षा ॲश्टन आगरला प्राधान्य द्यायला हवे, असे चॅपल म्हणाले.

हेही वाचा : India vs Australia Test Series : कसोटी मालिकेत भारताला करावी लागणार मेहनत; अन्यथा पराभवाचा धोका : ग्रेग चॅपल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.