ETV Bharat / sports

...म्हणून राहुल-बुमराह-डी कॉकला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये संधी मिळाली नाही!

मुंबई आणि पंजाब यांच्यातील सामन्यात दुसऱ्यांदा ज्यावेळी सुपर ओव्हर खेळवण्यात आली, त्यावेळी फलंदाजीसाठी क्विंटन डी कॉक तसेच केएल राहुल फलंदाजीला उतरला नव्हता. तसेच मुंबईने जसप्रीत बुमराहला गोलंदाजी दिली नाही. याला आयपीएलचा एक नियम कारणीभूत आहे. वाचा काय आहे सुपर ओव्हरचा तो नियम...

author img

By

Published : Oct 19, 2020, 12:48 PM IST

Updated : Oct 19, 2020, 1:19 PM IST

IPL 2020: Explained - Rules of Tied Super Over Between and Why Bumrah Couldn't Bowl Again
...म्हणून राहुल-बुमराह-डी कॉकला दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये संधी मिळाली नाही, 'हा' आहे नियम

मुंबई - आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी एकाच दिवशी तीन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. तर, दुसऱ्या सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात हा सामना झाला. यात पहिल्यांदा दोन्ही संघांनी समान धावा केल्या. यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. तेव्हा सुपर ओव्हर देखील बरोबरीत सुटली. यामुळे पुन्हा आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यात पंजाबने बाजी मारली. या सामन्यात दुसऱ्यांदा ज्यावेळी सुपर ओव्हर खेळवण्यात आली, त्यावेळी फलंदाजीसाठी क्विंटन डी कॉक तसेच केएल राहुल फलंदाजीला उतरला नव्हता. तसेच मुंबईने जसप्रीत बुमराहला गोलंदाजी दिली नाही. याला आयपीएलचा एक नियम कारणीभूत आहे. वाचा काय आहे सुपर ओव्हरचा तो नियम...

काय आहेत सुपर ओव्हरचे नियम -

  • एखादा खेळाडू सुपर ओव्हरमध्ये बाद झाला तर, त्याला त्या सामन्यात आणखी एखादी सुपर ओव्हर झाल्यास, त्यामध्ये फलंदाजी करता येणार नाही.
  • एका गोलंदाजांला एका सामन्यात एकच सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करता येईल.
  • याशिवाय दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पहिल्या सुपर ओव्हरचे सर्व नियम लागू राहतील.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात पहिल्या सुपर ओव्हरमध्ये राहुल, पूरम आणि क्विंटन डी कॉक बाद झाले होते. यामुळे ते फलंदाजीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. गोलंदाजीत बुमराह आणि शमी यांनी आपापल्या संघासाठी पहिली सुपर ओव्हर टाकली होती. यामुळे ते पुढील दुसरी सुपर ओव्हर टाकू शकले नाहीत.

रविवारी सायंकाळी झालेल्या सामन्यात मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १७६ धावा केल्या. तेव्हा पंजाबने देखील प्रत्युत्तरादाखल १७६ धावा केल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये बुमराहने भेदक मारा करत ५ धावा देऊन २ बळी घेतले. या धावसंख्येचा पंजाबच्या मोहम्मद शमीने यशस्वी बचाव केला. शमीने शेवटच्या चेंडूवर एक धावं दिली. सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्याने एकाच सामन्यात दुसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यावेळी पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने गोलंदाजी करत ११ धावा दिल्या. १२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेलने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार खेचत मयांक अग्रवालने पंजाब संघाला विजय मिळवून दिला.

मुंबई - आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच रविवारी एकाच दिवशी तीन सुपर ओव्हर खेळवण्यात आल्या. पहिल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादचा पराभव केला. तर, दुसऱ्या सामन्यात दोन सुपर ओव्हर झाल्या. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्यात हा सामना झाला. यात पहिल्यांदा दोन्ही संघांनी समान धावा केल्या. यामुळे सुपर ओव्हर खेळवण्यात आली. तेव्हा सुपर ओव्हर देखील बरोबरीत सुटली. यामुळे पुन्हा आणखी एक सुपर ओव्हर खेळवण्यात आली. यात पंजाबने बाजी मारली. या सामन्यात दुसऱ्यांदा ज्यावेळी सुपर ओव्हर खेळवण्यात आली, त्यावेळी फलंदाजीसाठी क्विंटन डी कॉक तसेच केएल राहुल फलंदाजीला उतरला नव्हता. तसेच मुंबईने जसप्रीत बुमराहला गोलंदाजी दिली नाही. याला आयपीएलचा एक नियम कारणीभूत आहे. वाचा काय आहे सुपर ओव्हरचा तो नियम...

काय आहेत सुपर ओव्हरचे नियम -

  • एखादा खेळाडू सुपर ओव्हरमध्ये बाद झाला तर, त्याला त्या सामन्यात आणखी एखादी सुपर ओव्हर झाल्यास, त्यामध्ये फलंदाजी करता येणार नाही.
  • एका गोलंदाजांला एका सामन्यात एकच सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी करता येईल.
  • याशिवाय दुसऱ्या सुपर ओव्हरमध्ये पहिल्या सुपर ओव्हरचे सर्व नियम लागू राहतील.

मुंबईविरुद्धच्या सामन्यात पहिल्या सुपर ओव्हरमध्ये राहुल, पूरम आणि क्विंटन डी कॉक बाद झाले होते. यामुळे ते फलंदाजीसाठी पात्र ठरू शकले नाहीत. गोलंदाजीत बुमराह आणि शमी यांनी आपापल्या संघासाठी पहिली सुपर ओव्हर टाकली होती. यामुळे ते पुढील दुसरी सुपर ओव्हर टाकू शकले नाहीत.

रविवारी सायंकाळी झालेल्या सामन्यात मुंबईने पहिल्यांदा फलंदाजी करताना २० षटकांत १७६ धावा केल्या. तेव्हा पंजाबने देखील प्रत्युत्तरादाखल १७६ धावा केल्या. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये बुमराहने भेदक मारा करत ५ धावा देऊन २ बळी घेतले. या धावसंख्येचा पंजाबच्या मोहम्मद शमीने यशस्वी बचाव केला. शमीने शेवटच्या चेंडूवर एक धावं दिली. सुपर ओव्हर बरोबरीत सुटल्याने एकाच सामन्यात दुसऱ्यांदा सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यावेळी पंजाबकडून ख्रिस जॉर्डनने गोलंदाजी करत ११ धावा दिल्या. १२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ख्रिस गेलने पहिल्याच चेंडूवर षटकार लगावला. त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर चौकार खेचत मयांक अग्रवालने पंजाब संघाला विजय मिळवून दिला.

Last Updated : Oct 19, 2020, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.