ETV Bharat / sports

विराट सेनेचा कारनामा: टी-२०त २ वर्ष अजिंक्य, सलग ६ मालिका जिंकण्याचा केला पराक्रम

भारतीय संघ टी-२० प्रकारात दोन वर्षांपासून अजिंक्य आहे. भारताने सलग सहा टी-२० मालिका जिंकण्याचा पराक्रम केला आहे.

author img

By

Published : Mar 21, 2021, 9:53 PM IST

Updated : Mar 21, 2021, 10:44 PM IST

indian cricket team registered consecutive sixth t20-series-win and-many-records-during-england-series
विराट सेनेचा कारनामा: टी-२०त २ वर्ष अजिंक्य, सलग ६ मालिका जिंकण्याचा केला पराक्रम

मुंबई - टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची रंगीत तालिम म्हणून पहिले जात असलेल्या मालिकेत भारताने इंग्लंडचा ३-२ ने धुव्वा उडवला. उभय संघात झालेल्या १८ सामन्यातील भारताचा हा १०वा विजय आहे. भारतीय संघ टी-२० प्रकारात दोन वर्षांपासून अजिंक्य आहे. भारताचा हा सलग सहावा मालिका विजय आहे.

टी-२० मालिकेत टीम इंडियाचा 'विजय रथ'

  • बांगलादेशचा भारत दौरा: तीन सामन्याची टी-२० मालिका २०१९, भारत २-१ ने विजयी
  • वेस्ट इंडीजचा भारत दौरा: तीन सामन्याची टी-२० मालिका २०१९, भारत २-१ ने विजयी
  • श्रीलंकेचा भारत दौरा: तीन सामन्याची टी-२० मालिका २०२०, भारत २-० ने विजयी
  • भारताचा न्यूझीलंड दौरा: पाच सामन्याची टी-२० मालिका २०२०, भारत ५-० ने विजयी
  • भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा: तीन सामन्याची टी-२० मालिका २०२०, भारत २-१ ने विजयी
  • इंग्लंडचा भारत दौरा: पाच सामन्याची टी-२० मालिका २०२१, भारत ३-२ ने विजयी

इंग्लंडचा संघ मागील ९ वर्षांपासून भारतामध्ये टी-२० मालिका जिंकू शकलेला नाही. इंग्लंडने भारताला ऑक्टोबर २०११ मध्ये पराभूत केलं होतं.

भारताने अखेरचा निर्णायक सामना असा जिंकला -

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ३६ धावांनी विजय मिळवला आणि मालिका ३-२ने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर विजयासाठी २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद ८० धावा केल्या. तर रोहितने ३४ चेंडूत ६४ धावांची तुफानी खेळी केली. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या संघाला २० षटकात ८ बाद १८८ धावांपर्यंत मजल मारता आली.

हेही वाचा - IND vs ENG : मालिका विजयानंतर भारतीय संघाला बसला फटका, विराटने केली चूक मान्य

हेही वाचा - Ind vs Eng: कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत केले 'विराट' विक्रम

मुंबई - टी-२० विश्वकरंडक स्पर्धेची रंगीत तालिम म्हणून पहिले जात असलेल्या मालिकेत भारताने इंग्लंडचा ३-२ ने धुव्वा उडवला. उभय संघात झालेल्या १८ सामन्यातील भारताचा हा १०वा विजय आहे. भारतीय संघ टी-२० प्रकारात दोन वर्षांपासून अजिंक्य आहे. भारताचा हा सलग सहावा मालिका विजय आहे.

टी-२० मालिकेत टीम इंडियाचा 'विजय रथ'

  • बांगलादेशचा भारत दौरा: तीन सामन्याची टी-२० मालिका २०१९, भारत २-१ ने विजयी
  • वेस्ट इंडीजचा भारत दौरा: तीन सामन्याची टी-२० मालिका २०१९, भारत २-१ ने विजयी
  • श्रीलंकेचा भारत दौरा: तीन सामन्याची टी-२० मालिका २०२०, भारत २-० ने विजयी
  • भारताचा न्यूझीलंड दौरा: पाच सामन्याची टी-२० मालिका २०२०, भारत ५-० ने विजयी
  • भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा: तीन सामन्याची टी-२० मालिका २०२०, भारत २-१ ने विजयी
  • इंग्लंडचा भारत दौरा: पाच सामन्याची टी-२० मालिका २०२१, भारत ३-२ ने विजयी

इंग्लंडचा संघ मागील ९ वर्षांपासून भारतामध्ये टी-२० मालिका जिंकू शकलेला नाही. इंग्लंडने भारताला ऑक्टोबर २०११ मध्ये पराभूत केलं होतं.

भारताने अखेरचा निर्णायक सामना असा जिंकला -

इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या निर्णायक टी-२० सामन्यात भारताने ३६ धावांनी विजय मिळवला आणि मालिका ३-२ने जिंकली. भारताने प्रथम फलंदाजी करत इंग्लंडसमोर विजयासाठी २२५ धावांचे आव्हान ठेवले होते. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने सर्वाधिक नाबाद ८० धावा केल्या. तर रोहितने ३४ चेंडूत ६४ धावांची तुफानी खेळी केली. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडच्या संघाला २० षटकात ८ बाद १८८ धावांपर्यंत मजल मारता आली.

हेही वाचा - IND vs ENG : मालिका विजयानंतर भारतीय संघाला बसला फटका, विराटने केली चूक मान्य

हेही वाचा - Ind vs Eng: कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या टी-२० मालिकेत केले 'विराट' विक्रम

Last Updated : Mar 21, 2021, 10:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.