ETV Bharat / sports

Ind vs Ban १st t२०: नियोजित वेळापत्रकानूसार होणार दिल्लीतील भारत-बांगलादेश सामना - Delhi despite poor air quality

भारत-बांगलादेश संघामध्ये होणाऱ्या टी-२० मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या (फिरोज शाह कोटला) अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मात्र, ऐन दिवाळीत दिल्ली शहरातील वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. पण प्रदूषणाची पातळी अत्यंत खराब असूनही सामना खेळला जाईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

Ind vs Ban १st t२०: नियोजित वेळापत्रकानूसार दिल्लीतील भारत-बांगलादेश सामना होणार
author img

By

Published : Oct 28, 2019, 4:57 PM IST

नवी दिल्ली - भारत-बांगलादेश संघामध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. पण, मालिकेतील पहिलाच सामना दिल्लीतील प्रदूषणामुळे होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, बीसीसीआयने हा सामना नियोजित वेळापत्रकानूसार होईल, असे स्पष्ट केले आहे.

भारत-बांगलादेश संघामध्ये होणाऱ्या टी-२० मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या (फिरोज शाह कोटला) अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मात्र, ऐन दिवाळीत दिल्ली शहरातील वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. पण प्रदूषणाची पातळी अत्यंत खराब असूनही सामना खेळला जाईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

एअर क्वालिटी इंडेक्सनुसार, दिल्ली विद्यापीठात हवेची गुणवत्ता निकृष्ट असल्याची नोंद झाली. विशेष म्हणजे २०१७ मध्येही श्रीलंका क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी प्रदूषणामुळे कसोटी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करण्यास नकार दिला होता. त्यावेळी देखील, दिल्लीत प्रदूषणाची पातळी खूपच जास्त खालावली होती आणि बरेच श्रीलंकन खेळाडू मास्क घालून मैदानावर उतरले होते. सामना संपल्यानंतर काही खेळाडू तर आजारीही पडले होते.

पण बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनूसार, हा सामना नियोजित वेळापत्रकानूसार होणार आहे. बांगलादेशचा संघ नोव्हेंबरमध्ये भारताविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ३ तारखेला दिल्ली, ७ तारखेला राजकोट आणि १० तारखेला नागपूरमध्ये होणार आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धु..धु धुतले; कसुन राजिताच्या नावे झाला नकोसा विक्रम

हेही वाचा - टीम इंडिया बांगलादेश विरुध्द खेळणार पहिला दिवस-रात्र कसोटी सामना?

नवी दिल्ली - भारत-बांगलादेश संघामध्ये ३ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. पण, मालिकेतील पहिलाच सामना दिल्लीतील प्रदूषणामुळे होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, बीसीसीआयने हा सामना नियोजित वेळापत्रकानूसार होईल, असे स्पष्ट केले आहे.

भारत-बांगलादेश संघामध्ये होणाऱ्या टी-२० मालिकेतील पहिला सामना दिल्लीच्या (फिरोज शाह कोटला) अरुण जेटली मैदानावर खेळवण्यात येणार आहे. मात्र, ऐन दिवाळीत दिल्ली शहरातील वायू प्रदूषणाची पातळी वाढली आहे. पण प्रदूषणाची पातळी अत्यंत खराब असूनही सामना खेळला जाईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे.

एअर क्वालिटी इंडेक्सनुसार, दिल्ली विद्यापीठात हवेची गुणवत्ता निकृष्ट असल्याची नोंद झाली. विशेष म्हणजे २०१७ मध्येही श्रीलंका क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी प्रदूषणामुळे कसोटी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करण्यास नकार दिला होता. त्यावेळी देखील, दिल्लीत प्रदूषणाची पातळी खूपच जास्त खालावली होती आणि बरेच श्रीलंकन खेळाडू मास्क घालून मैदानावर उतरले होते. सामना संपल्यानंतर काही खेळाडू तर आजारीही पडले होते.

पण बीसीसीआयच्या सूत्रांच्या माहितीनूसार, हा सामना नियोजित वेळापत्रकानूसार होणार आहे. बांगलादेशचा संघ नोव्हेंबरमध्ये भारताविरुद्ध टी-२० मालिका खेळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ३ तारखेला दिल्ली, ७ तारखेला राजकोट आणि १० तारखेला नागपूरमध्ये होणार आहे. या मालिकेनंतर दोन्ही संघात दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे.

हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी धु..धु धुतले; कसुन राजिताच्या नावे झाला नकोसा विक्रम

हेही वाचा - टीम इंडिया बांगलादेश विरुध्द खेळणार पहिला दिवस-रात्र कसोटी सामना?

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.