ETV Bharat / sports

भारत-ऑस्ट्रेलिया 'अ' संघातील सराव सामना अनिर्णित

भारत आणि ऑस्ट्रेलिया-अ संघातील दुसरा सराव सामना अनिर्णित राहिला.

author img

By

Published : Dec 13, 2020, 4:27 PM IST

India vs Australia A, 2nd Practice Match : McDermott, Wildermuth hit centuries; game ends in draw
भारत-ऑस्ट्रेलिया 'अ' संघातील सराव सामना अनिर्णित

सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया-अ संघातील दुसरा सराव सामना अनिर्णित राहिला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात बेन मॅकडर्मोट (107) आणि जॅक वाइल्डरमुथ (111) यांनी नाबाद शतक झळकावले.

नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण एकवेळ भारताची अवस्था 9 बाद 123 अशी झाली होती. तेव्हा जसप्रीत बुमराहने जबरदस्त अर्धशतक ठोकत संघाला 194 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया 108 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताने 86 धावांची आघाडी घेतली. पहिल्या दिवशी दोन्ही संघाचे मिळून एकूण 20 विकेट पडल्या. मात्र, दुसऱ्या डावात भारताने दमदार पुनरागमन केलं आणि ऑस्ट्रेलिया-अ संघाला बॅकफूटवर ढकलले.

पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर शुभमन गिल, मयांक अग्रवाल यांनी अर्धशतक ठोकले, तर हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांनी दुसऱ्या दिवशी शतकी खेळीनंतर नाबाद परतले. विहारीने नाबाद 104 तर पंतने नाबाद 103 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाअखेर भारताने 386-4 धावांवर डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियापुढे 473 धावांचे तगडे आव्हान ठेवले.

दुसऱ्या डावात देखील जो बर्न्स पुन्हा अपयशी ठरला. त्याची विकेट मोहम्मद शमीने घेतली. मार्कस हॅरिस देखील 5 धावाच करू शकला. निक मॅडिनसन 14 धावा केल्या. मात्र नंतर कर्णधार अ‍ॅलेक्स कॅरी आणि बेन मॅकडर्मोट यांनी शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. या दरम्यान कॅरीने अर्धशतक ठोकले, पण विहारीच्या चेंडूवर कुलदीप यादवकडे 58 धावांवर असताना झेलबाद होऊन माघारी परतला. भारताकडून शमीने 2 तर बुमराहने 1 गडी बाद केला.

हेही वाचा - सचिनच्या नावावर होणार स्टेडियम...खासदार मनोज तिवारी यांचा निर्धार

हेही वाचा - भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडवण्यासाठी 'हा' गोलंदाज संघात होणार दाखल

सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलिया-अ संघातील दुसरा सराव सामना अनिर्णित राहिला. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून दुसऱ्या डावात बेन मॅकडर्मोट (107) आणि जॅक वाइल्डरमुथ (111) यांनी नाबाद शतक झळकावले.

नाणेफेक जिंकून भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणेने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण एकवेळ भारताची अवस्था 9 बाद 123 अशी झाली होती. तेव्हा जसप्रीत बुमराहने जबरदस्त अर्धशतक ठोकत संघाला 194 धावांपर्यंत मजल मारून दिली. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया 108 धावांवर ऑलआऊट झाला आणि भारताने 86 धावांची आघाडी घेतली. पहिल्या दिवशी दोन्ही संघाचे मिळून एकूण 20 विकेट पडल्या. मात्र, दुसऱ्या डावात भारताने दमदार पुनरागमन केलं आणि ऑस्ट्रेलिया-अ संघाला बॅकफूटवर ढकलले.

पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर शुभमन गिल, मयांक अग्रवाल यांनी अर्धशतक ठोकले, तर हनुमा विहारी आणि ऋषभ पंत यांनी दुसऱ्या दिवशी शतकी खेळीनंतर नाबाद परतले. विहारीने नाबाद 104 तर पंतने नाबाद 103 धावा केल्या. दुसऱ्या दिवसाअखेर भारताने 386-4 धावांवर डाव घोषित केला आणि ऑस्ट्रेलियापुढे 473 धावांचे तगडे आव्हान ठेवले.

दुसऱ्या डावात देखील जो बर्न्स पुन्हा अपयशी ठरला. त्याची विकेट मोहम्मद शमीने घेतली. मार्कस हॅरिस देखील 5 धावाच करू शकला. निक मॅडिनसन 14 धावा केल्या. मात्र नंतर कर्णधार अ‍ॅलेक्स कॅरी आणि बेन मॅकडर्मोट यांनी शतकी खेळी करत संघाचा डाव सावरला. या दरम्यान कॅरीने अर्धशतक ठोकले, पण विहारीच्या चेंडूवर कुलदीप यादवकडे 58 धावांवर असताना झेलबाद होऊन माघारी परतला. भारताकडून शमीने 2 तर बुमराहने 1 गडी बाद केला.

हेही वाचा - सचिनच्या नावावर होणार स्टेडियम...खासदार मनोज तिवारी यांचा निर्धार

हेही वाचा - भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडवण्यासाठी 'हा' गोलंदाज संघात होणार दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.