ETV Bharat / sports

शिवमला तिसऱ्या क्रमाकांवर का पाठवलं, विराटनं दिलं 'हे' स्पष्टीकरण

author img

By

Published : Dec 9, 2019, 4:35 PM IST

शिवमला या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची विराटची रणनिती पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र, या योजनेमागील कारण विराटने सामन्यानंतर स्पष्ट केले.

IND VS WI 2nd t-20 : Virat Kohli explains the reason to send Shivam Dube at no.3
शिवमला तिसऱ्या क्रमाकांवर का पाठवलं, विराटनं दिलं 'हे' स्पष्टीकरण

तिरुवनंतरपुरम - ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेला भारत आणि वेस्ट इंडीज संघातील दुसरा टी-२० सामना विडींजने ८ गडी राखून जिंकला. या सामन्यात भारताकडून अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत अर्धशतकी खेळी केली. त्याला या सामन्यात फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली होती.

शिवमला या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची विराटची रणनिती पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र, या योजनेमागील कारण विराटने सामन्यानंतर स्पष्ट केले.

विराट म्हणाला, 'आम्ही ग्रिनफिल्डची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल, असे गृहीत धरले होते. यामुळे आम्ही आमच्या रणनितीमध्ये ऐनवेळी बदल केला आणि शिवमला लवकर फलंदाजीसाठी पाठवलं. त्याला फिरकीपटूंवर आक्रमण करण्यास सांगितले. ही योजना यशस्वी ठरली.'

शिवमने तिसऱ्या क्रमाकांवर बढती मिळाल्यानंतर ३० चेंडूत ५४ धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक ठरले. शिवमने कर्णधार विराट कोहलीसह तिसऱ्या गड्यासाठी ४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही रचली.

दरम्यान, भारतीय संघाने शिवमचे अर्धशतक आणि ऋषभ पंतच्या नाबाद ३३ धावांच्या जोरावर निर्धारीत २० षटकात ७ बाद १७० धावा केल्या होत्या आणि वेस्ट इंडीजला १७१ धावांचे आव्हान दिले होते. भारताचे हे आव्हान वेस्ट इंडीजने १८.३ षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

भारत आणि वेस्ट इंडीज संघात ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला, तर दुसरा सामना विडींजने जिंकला. अखेरचा निर्णायक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे.

हेही वाचा - रणजी सामन्यात चक्क सापाची 'एन्ट्री'!..पाहा व्हिडिओ

हेही वाचा - रणजीचा आजपासून रंगणार थरार, 'या' नवीन संघाकडे सर्वांचे लक्ष!

तिरुवनंतरपुरम - ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर रंगलेला भारत आणि वेस्ट इंडीज संघातील दुसरा टी-२० सामना विडींजने ८ गडी राखून जिंकला. या सामन्यात भारताकडून अष्टपैलू क्रिकेटपटू शिवम दुबेने शानदार फलंदाजीचे प्रदर्शन करत अर्धशतकी खेळी केली. त्याला या सामन्यात फलंदाजीसाठी तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळाली होती.

शिवमला या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवण्याची विराटची रणनिती पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. मात्र, या योजनेमागील कारण विराटने सामन्यानंतर स्पष्ट केले.

विराट म्हणाला, 'आम्ही ग्रिनफिल्डची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांना मदत करेल, असे गृहीत धरले होते. यामुळे आम्ही आमच्या रणनितीमध्ये ऐनवेळी बदल केला आणि शिवमला लवकर फलंदाजीसाठी पाठवलं. त्याला फिरकीपटूंवर आक्रमण करण्यास सांगितले. ही योजना यशस्वी ठरली.'

शिवमने तिसऱ्या क्रमाकांवर बढती मिळाल्यानंतर ३० चेंडूत ५४ धावांची आक्रमक खेळी केली. या खेळीत त्याने ३ चौकार आणि ४ षटकार मारले. त्याचे हे आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिलेच अर्धशतक ठरले. शिवमने कर्णधार विराट कोहलीसह तिसऱ्या गड्यासाठी ४१ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारीही रचली.

दरम्यान, भारतीय संघाने शिवमचे अर्धशतक आणि ऋषभ पंतच्या नाबाद ३३ धावांच्या जोरावर निर्धारीत २० षटकात ७ बाद १७० धावा केल्या होत्या आणि वेस्ट इंडीजला १७१ धावांचे आव्हान दिले होते. भारताचे हे आव्हान वेस्ट इंडीजने १८.३ षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात सहज पूर्ण केले.

भारत आणि वेस्ट इंडीज संघात ३ सामन्यांची टी-२० मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला, तर दुसरा सामना विडींजने जिंकला. अखेरचा निर्णायक सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे.

हेही वाचा - रणजी सामन्यात चक्क सापाची 'एन्ट्री'!..पाहा व्हिडिओ

हेही वाचा - रणजीचा आजपासून रंगणार थरार, 'या' नवीन संघाकडे सर्वांचे लक्ष!

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.