तिरुवनंतपुरम - भारत आणि वेस्ट इंडीज संघातील दुसरा टी-२० सामना तिरुवनंतपुरमच्या ग्रिनफिल्ड आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात वेस्ट इंडीजने भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला. दरम्यान, या सामन्यात धोनीच्या नावे जयघोष करणाऱ्या प्रेक्षकांवर कर्णधार विराट कोहली चिडला. त्याने हातवारे करत प्रेक्षकांवर आपला राग व्यक्त केला.
घडलं असं की, महेंद्रसिंह धोनीचा वारसदार म्हणून ऋषभ पंतला पहिला जात आहे. मागील अनेक सामन्यात खराब कामगिरी करूनही पंत संघात कायम आहे. वेस्ट इंडीज विरुध्दच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात त्याने फलंदाजीत ३३ धावा केल्या. मात्र, त्यांची यष्टीमागील कामगिरी पुन्हा खराब ठरली. पंतने दुसऱ्या सामन्यात भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर झेल सोडला. त्यानंतर स्टेडियममधील प्रेक्षकांनी पंतला धोनीच्या नावाने चिडवायला सुरुवात केली.
- — NISHANT BARAI (@maibhiengineer_) December 8, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
— NISHANT BARAI (@maibhiengineer_) December 8, 2019
">— NISHANT BARAI (@maibhiengineer_) December 8, 2019