इंदूर - भारत आणि बांगलादेश संघामध्ये पहिला कसोटी सामना इंदूरच्या होळकर मैदानात रंगला आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. कर्णधार मोमिनुलच्या हा निर्णय बांगलादेशच्या अंगलट आला. भारतीय गोलंदाजीसमोर बांगलादेशचा पहिला डाव अवघ्या १५० धावांत आटोपला. भारतीय खेळाडूंनी पहिल्या डावात ५ झेल सोडले. तरी या संधीचा फायदा बांगलादेशी खेळाडूंना उचलता आला नाही.
भारताची वेगवान तिकडी शमी, इशांत आणि उमेश यांनी बांगलादेशी फलंदाजीची धूळदाण उडवली. तिघांनी मिळून ८ गडी बाद केले. भारताकडून पहिल्या डावात सर्वाधिक ३ गडी मोहम्मद शमीने बाद केले. तर अश्विन, इशांत शर्मा आणि उमेश यादवने प्रत्येकी दोन गडी बाद केले.
गोलंदाजीत यशस्वी ठरलेला भारतीय संघ क्षेत्ररक्षणात मात्र निष्प्रभ ठरला. पहिल्या डावात भारतीय खेळाडूंनी तब्बल पाच झेल सोडले. या सामन्यात भारताचा कर्णधार विराट कोहलीच्या हातून एक झेल सुटला. तर तब्बल तीन झेल उपकर्णधार अजिंक्य रहाणेच्या हातातून सुटले.
एक झेल तर रहाणे आणि यष्टीरक्षक वृद्धिमान साहा या दोघांनाही घेण्यासारखा होता. पण या दोघांनाही हा झेल टिपता आला नाही. पण तरीही बांगलादेशचा संघ एवढे जीवदान मिळूनही फेल झाल्याचेच पाहायला मिळाले.
हेही वाचा - Ind vs Ban : भारत पहिल्या दिवसाअखेर १ बाद ८६
हेही वाचा - Ind vs Ban: ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्याला अमित शाह उपस्थित राहणार