ETV Bharat / sports

Chetan Sharma Resign : स्टिंग ऑपरेशनच्या वादानंतर चेतन शर्मा यांचा तत्काळ राजीनामा; क्रिकेट विश्वात खळबळ

भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता आणि माजी भारतीय वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांनी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमुळे भारतात खळबळ उडाली आहे. मुख्य निवडकर्ता चेतन शर्मा गेल्या 12 तासांपासून मीडियाच्या चर्चेत आहे. या खुलाशाचा परिणाम अनेक खेळाडूंसह त्यांच्यावरही दिसून येणार होता, असे मानले जात आहे. अशातच चेतन शर्मा यांनी राजीनामा दिला आहे.

author img

By

Published : Feb 17, 2023, 11:15 AM IST

Updated : Feb 17, 2023, 7:58 PM IST

Chetan Sharma Resign
चेतन शर्मा राजीनामा

नवी दिल्ली : भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता आणि माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर निश्चितच भारतीय क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मोठ्या गौप्यस्फोटानंतर अनेक दिग्गज खेळाडूंचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. तसेच, बीसीसीआयच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. त्यामुळे बीसीसीआय चेतन शर्मांवर कारवाई करण्याची शक्यता असतानाच, चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

बीसीसीआयच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह : स्टिंग ऑपरेशनदरम्यान त्यांच्या मोठ्या गौप्यस्फोटामुळे चेतन शर्माचे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद नक्कीच धोक्यात आले आहे. परंतु, बीसीसीआय त्यांच्या कारकिर्दीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी देऊ शकते. परंतु, हा एक तर्क असणार आहे. कारण त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नक्कीच क्रिकेट विश्वात मोठा भूकंप होणार आहे. त्यामुळे पूर्ण जगात मान्यता असलेल्या बीसीसीआयच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. त्यामुळे चेतन शर्मा यांच्या 100 टक्के कारवाई होणार हे निर्विवाद आहे. या गोष्टी होण्याअगोदरच चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

क्रिकेट खेळाडू फिटनेससाठी घेतात इंजेक्शन : भारतीय खेळाडू टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी फिटनेस नसतानादेखील इंजेक्शनद्वारे आपला फिटनेस 100 टक्के दाखवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये मोठ मोठे स्टार खेळाडूसुद्धा सामील आहेत. या स्टींग आॅपरेशनमुळे अनेक खेळाडूंच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. या खेळाडूंना त्यांचे डाॅक्टरदेखील साहाय्य करतात, असा दावा चेतन शर्मा यांनी आपल्या स्टींग आॅपरेशनमध्ये केला आहे. त्यांनी आणखी खेळाडूंवर आरोप केला की, फिटनेस 100 टक्के असेल तर मॅच खेळण्यास परवानगी दिली जाते. परंतु, खेळाडून 60-70 टक्के फिट असतील, तर ते बाजूला जाऊन इंजेक्शन घेतात आणि स्वतः 100 टक्के फिट दाखवण्याचा प्रयत्न करतात. ही मोठी फसवणूक आहे, यामध्ये खेळाडू असे इंजेक्शन घेतात की, जे डोपिंगमध्ये सापडणार नाही. यामुळे अनेक खेळाडूंचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे.

चेतन शर्मा यांनी विश्वास गमावला : चेतनला स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडले गेल्याने बीसीसीआयच्या उच्चपदस्थांना हे अजिबात रुचणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार हे नक्कीच. पण, या घटनेचा एकीकडे मीडिया आणि दुसरीकडे भारतीय संघ आणि निवडकर्ते यांच्यातील संबंधांवर मोठा परिणाम होणार आहे. बीसीसीआयच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह यामुळे उभे राहणार आहे. या घटनेने चेतन शर्मा यांनी भारतीय संघाच्या खेळाडूंचा विश्वास निश्चितच गमावला असे एका कार्यक्रमात दिसून आले.

बीसीसीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह : आले या स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआयच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. यामुळे क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि मजबूत संस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्याचा प्रकार झाला आहे. यामुळे क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आले आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी मोठ्या खेळाडूंच्या फिटनेससह बीसीसीआयला या गोष्टींची माहिती असताना, या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.

हेही वाचा : Asia Cup Host : यजमानपद वाचवण्यासाठी पाकिस्तानची कसरत, भारताला युएईमध्ये खेळण्याची ऑफर देण्याची शक्यता

नवी दिल्ली : भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता आणि माजी वेगवान गोलंदाज चेतन शर्मा यांच्या स्टिंग ऑपरेशननंतर निश्चितच भारतीय क्रिकेट विश्वात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांच्या मोठ्या गौप्यस्फोटानंतर अनेक दिग्गज खेळाडूंचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. तसेच, बीसीसीआयच्या कार्यशैलीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. त्यामुळे बीसीसीआय चेतन शर्मांवर कारवाई करण्याची शक्यता असतानाच, चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

बीसीसीआयच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह : स्टिंग ऑपरेशनदरम्यान त्यांच्या मोठ्या गौप्यस्फोटामुळे चेतन शर्माचे राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्षपद नक्कीच धोक्यात आले आहे. परंतु, बीसीसीआय त्यांच्या कारकिर्दीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी त्यांना स्वतःचा बचाव करण्याची संधी देऊ शकते. परंतु, हा एक तर्क असणार आहे. कारण त्यांनी केलेल्या गौप्यस्फोटामुळे नक्कीच क्रिकेट विश्वात मोठा भूकंप होणार आहे. त्यामुळे पूर्ण जगात मान्यता असलेल्या बीसीसीआयच्या विश्वसार्हतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारा आहे. त्यामुळे चेतन शर्मा यांच्या 100 टक्के कारवाई होणार हे निर्विवाद आहे. या गोष्टी होण्याअगोदरच चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

क्रिकेट खेळाडू फिटनेससाठी घेतात इंजेक्शन : भारतीय खेळाडू टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी फिटनेस नसतानादेखील इंजेक्शनद्वारे आपला फिटनेस 100 टक्के दाखवण्याचा प्रयत्न करतात. यामध्ये मोठ मोठे स्टार खेळाडूसुद्धा सामील आहेत. या स्टींग आॅपरेशनमुळे अनेक खेळाडूंच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते. या खेळाडूंना त्यांचे डाॅक्टरदेखील साहाय्य करतात, असा दावा चेतन शर्मा यांनी आपल्या स्टींग आॅपरेशनमध्ये केला आहे. त्यांनी आणखी खेळाडूंवर आरोप केला की, फिटनेस 100 टक्के असेल तर मॅच खेळण्यास परवानगी दिली जाते. परंतु, खेळाडून 60-70 टक्के फिट असतील, तर ते बाजूला जाऊन इंजेक्शन घेतात आणि स्वतः 100 टक्के फिट दाखवण्याचा प्रयत्न करतात. ही मोठी फसवणूक आहे, यामध्ये खेळाडू असे इंजेक्शन घेतात की, जे डोपिंगमध्ये सापडणार नाही. यामुळे अनेक खेळाडूंचे भवितव्यावर प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे.

चेतन शर्मा यांनी विश्वास गमावला : चेतनला स्टिंग ऑपरेशनमध्ये पकडले गेल्याने बीसीसीआयच्या उच्चपदस्थांना हे अजिबात रुचणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार हे नक्कीच. पण, या घटनेचा एकीकडे मीडिया आणि दुसरीकडे भारतीय संघ आणि निवडकर्ते यांच्यातील संबंधांवर मोठा परिणाम होणार आहे. बीसीसीआयच्या विश्वासार्हतेवर मोठे प्रश्नचिन्ह यामुळे उभे राहणार आहे. या घटनेने चेतन शर्मा यांनी भारतीय संघाच्या खेळाडूंचा विश्वास निश्चितच गमावला असे एका कार्यक्रमात दिसून आले.

बीसीसीआयच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह : आले या स्टिंग ऑपरेशननंतर बीसीसीआयच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहणार आहे. यामुळे क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी आणि मजबूत संस्थेची लक्तरे वेशीवर टांगल्याचा प्रकार झाला आहे. यामुळे क्रिकेट विश्वातील अनेक दिग्गज खेळाडूंचे भवितव्य धोक्यात आले आहे. या स्टिंग ऑपरेशनमध्ये चेतन शर्मा यांनी मोठ्या खेळाडूंच्या फिटनेससह बीसीसीआयला या गोष्टींची माहिती असताना, या प्रकाराकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे बीसीसीआयच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार आहे.

हेही वाचा : Asia Cup Host : यजमानपद वाचवण्यासाठी पाकिस्तानची कसरत, भारताला युएईमध्ये खेळण्याची ऑफर देण्याची शक्यता

Last Updated : Feb 17, 2023, 7:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.