ETV Bharat / sports

'अर्जुन' पुरस्कारासाठी डावलले; भडकलेला प्रणॉय म्हणाला...

author img

By

Published : Jun 4, 2020, 11:49 AM IST

प्रणॉय म्हणाला, 'अर्जुन पुरस्कारासाठी राष्ट्रकुल आणि आशिया स्पर्धेत पदके जिंकलेल्या खेळाडूंचा विचार केला जात नाही. ज्या खेळाडूंनी मोठ्या स्पर्धामध्ये यश मिळवलेले नाही, अशा खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली जाते. देशातील क्रीडा क्षेत्रासाठी ही हास्यास्पद बाब आहे.'

HS Prannoy hits out at Arjuna Award selection criteria
'अर्जुन' पुरस्कारासाठी डावलले; भडकलेला प्रणॉय म्हणाला...

मुंबई - क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या अर्जुन पुरस्कारासाठी नावाची शिफारस करण्यात न आल्याने, भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय प्रचंड नाराज झाला आहे. प्रणॉयने त्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेला खडेबोल सुनावले आहेत.

प्रणॉय म्हणाला, 'अर्जुन पुरस्कारासाठी राष्ट्रकुल आणि आशिया स्पर्धेत पदके जिंकलेल्या खेळाडूंचा विचार केला जात नाही. ज्या खेळाडूंनी मोठ्या स्पर्धामध्ये यश मिळवलेले नाही, अशा खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली जाते. देशातील क्रीडा क्षेत्रासाठी ही हास्यास्पद बाब आहे.'

भारताचा बॅडमिंटनपटू पी. कश्यपने प्रणॉयची पाठराखण केली आहे. पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी कोणते निकष वापरण्यात येतात, ते कळत नसल्याचे सांगत यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे, असे त्याने म्हटले आहे. पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करताना खेळाडूंची मागील चार वर्षांतील कामगिरी पाहण्यात येते, असे क्रीडा मंत्रालयाचे म्हणणे आहे.

प्रणॉयने मागील चार वर्षांमध्ये खासकरून २०१८ या साली सर्वात चांगली कामगिरी नोंदवली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र प्रकारात जिंकलेल्या सुवर्णपदक संघात प्रणॉयचा समावेश होता. त्याच वर्षी वुहान आशिया स्पर्धेत कांस्यपदक जिंकत त्याने कारकीर्दीत सर्वोत्तम आठवे स्थान मिळवले.

तथापि, बॅडमिंटन संघटनेने प्रणॉयऐवजी यंदा सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीच्या जोडीसह एकेरीतील खेळाडू समीर वर्माची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

हेही वाचा - कोरोनावर मात करण्यासाठी बॅडमिंटनपटू साई प्रणीतने दिले ४ लाख

हेही वाचा - “क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळ दाखवा”, स्टार बॅडमिंटनपटूने केली विनंती

मुंबई - क्रीडा क्षेत्रातील महत्वाच्या अर्जुन पुरस्कारासाठी नावाची शिफारस करण्यात न आल्याने, भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय प्रचंड नाराज झाला आहे. प्रणॉयने त्यासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेला खडेबोल सुनावले आहेत.

प्रणॉय म्हणाला, 'अर्जुन पुरस्कारासाठी राष्ट्रकुल आणि आशिया स्पर्धेत पदके जिंकलेल्या खेळाडूंचा विचार केला जात नाही. ज्या खेळाडूंनी मोठ्या स्पर्धामध्ये यश मिळवलेले नाही, अशा खेळाडूंना अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली जाते. देशातील क्रीडा क्षेत्रासाठी ही हास्यास्पद बाब आहे.'

भारताचा बॅडमिंटनपटू पी. कश्यपने प्रणॉयची पाठराखण केली आहे. पुरस्कारासाठी शिफारस करण्यासाठी कोणते निकष वापरण्यात येतात, ते कळत नसल्याचे सांगत यामध्ये बदल होणे अपेक्षित आहे, असे त्याने म्हटले आहे. पुरस्कारांसाठी नावांची शिफारस करताना खेळाडूंची मागील चार वर्षांतील कामगिरी पाहण्यात येते, असे क्रीडा मंत्रालयाचे म्हणणे आहे.

प्रणॉयने मागील चार वर्षांमध्ये खासकरून २०१८ या साली सर्वात चांगली कामगिरी नोंदवली. भारताने राष्ट्रकुल स्पर्धेत मिश्र प्रकारात जिंकलेल्या सुवर्णपदक संघात प्रणॉयचा समावेश होता. त्याच वर्षी वुहान आशिया स्पर्धेत कांस्यपदक जिंकत त्याने कारकीर्दीत सर्वोत्तम आठवे स्थान मिळवले.

तथापि, बॅडमिंटन संघटनेने प्रणॉयऐवजी यंदा सात्त्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या पुरुष दुहेरीच्या जोडीसह एकेरीतील खेळाडू समीर वर्माची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

हेही वाचा - कोरोनावर मात करण्यासाठी बॅडमिंटनपटू साई प्रणीतने दिले ४ लाख

हेही वाचा - “क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळ दाखवा”, स्टार बॅडमिंटनपटूने केली विनंती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.