ETV Bharat / sitara

'जिवलगा' मालिकेच्या टीमनं घेतलं पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन

author img

By

Published : Apr 21, 2019, 8:03 AM IST

“जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा.. ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा..” अशा आशयाची ही प्रेमकथा आहे

स्वप्नील आणि सिद्धार्थनं घेतलं दर्शन

मुंबई - अभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. निमित्त होतं स्टार प्रवाहवर २२ तारखेपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ मालिकेचं. त्यांची येणारी आगामी मालिका ‘जिवलगा’ ही महागणपतीच्या आशिर्वादाने यशस्वी होऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहचावी, यासाठी या कलाकारांनी गणपतीला साकडे घातले.

बऱ्याच वर्षांनंतर स्वप्नील आणि सिद्धार्थ टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. त्यामुळे ‘जिवलगा’ ही मालिका दोघांसाठीही अधिक खास आहे. मालिकेमध्ये या दोघांशिवाय आपल्या ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील ‘जिवलगा’मधून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेतून झळकणार आहे. मधुरा देशपांडेदेखील या मालिकेतून वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.


“जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा.. ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा..” अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सशक्त अभिनयासोबतच ग्लॅमरने ही मालिका सजली आहे. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेल्या या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे, तर उमेश नामजोशी यांचे दिग्दर्शन आहे.

मुंबई - अभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. निमित्त होतं स्टार प्रवाहवर २२ तारखेपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ मालिकेचं. त्यांची येणारी आगामी मालिका ‘जिवलगा’ ही महागणपतीच्या आशिर्वादाने यशस्वी होऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहचावी, यासाठी या कलाकारांनी गणपतीला साकडे घातले.

बऱ्याच वर्षांनंतर स्वप्नील आणि सिद्धार्थ टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. त्यामुळे ‘जिवलगा’ ही मालिका दोघांसाठीही अधिक खास आहे. मालिकेमध्ये या दोघांशिवाय आपल्या ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकरदेखील ‘जिवलगा’मधून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेतून झळकणार आहे. मधुरा देशपांडेदेखील या मालिकेतून वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.


“जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा.. ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा..” अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सशक्त अभिनयासोबतच ग्लॅमरने ही मालिका सजली आहे. डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेल्या या मालिकेची संकल्पना सतीश राजवाडे यांची आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे, तर उमेश नामजोशी यांचे दिग्दर्शन आहे.

Intro:अभिनयाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील रसिकांवर अधिराज्य गाजविणाऱ्या अभिनेता स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी नुकतंच पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचं दर्शन घेतलं. निमित्त होतं ते स्टार प्रवाहवर २२ तारखेपासून सुरु होणाऱ्या ‘जिवलगा’ मालिकेचं. त्यांची येणारी आगामी मालिका ‘जिवलगा’ ही महागणपतीच्या आशिर्वादाने यशस्वी होऊन महाराष्ट्रातील घराघरात पोहचावी, असे साकडे स्वप्नील जोशी आणि सिद्धार्थ चांदेकर यांनी दगडूशेठ हलवाई गणपतीच्या चरणी घातले. बऱ्याच वर्षांनंतर स्वप्निल आणि सिद्धार्थ टेलिव्हिजनवर कमबॅक करत आहेत. त्यामुळे ‘जिवलगा’ ही मालिका दोघांसाठीही खुपच स्पेशल आहे.

या मालिकेमध्ये या दोघांबरोबर आपल्या ग्लॅमरस अदाकारीने मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री अमृता खानविलकर ही ‘जिवलगा’ मधून पहिल्यांदाच दैनंदिन मालिकेतून झळकणार आहे. मधुरा देशपांडे सुद्धा या मालिकेतून वेगळ्या रुपात प्रेक्षकांसमोर येणार आहे.

सुपरस्टार कलाकारांचा भरणा असलेल्या ‘जिवलगा’ या अत्यंत महत्वाकांक्षी अशा मालिकेच्या माध्यमातून ‘स्टार प्रवाह’ वाहिनी प्रेक्षकांसमोर एक आगळी-वेगळी प्रेमकथा घेऊन येत आहे. “जो डोळे बंद केल्यावरही दिसतो, तो जिवलगा.. ज्याच्यामुळे आपण आहोत, तो जिवलगा..” अशा आशयाची ही प्रेमकथा आहे. स्वप्नील जोशी, सिद्धार्थ चांदेकर, अमृता खानविलकर आणि मधुरा देशपांडे यांच्या सशक्त अभिनयासोबतच ग्लॅमरने ही मालिका सजली आहे.



डॉ. चंद्रशेखर फणसळकरांच्या गोष्टीपासून प्रेरणा घेतलेली ही मालिका आहे. तर मालिकेची संकल्पना स्टार प्रवाहचे कॉन्टेन्ट अँड प्रोग्रामिंग विभागाचे प्रमुख सतीश राजवाडे यांची आहे. विद्याधर पाठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली असून पराग कुलकर्णी यांनी या मालिकेचे लेखन केले आहे. ही मालिका उमेश नामजोशी यांनी दिग्दर्शित केली आहे.

स्टार प्रवाह वहिनीने कात टाकल्यानंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणारी ही अत्यंत महत्वाकांक्षी मालिका आहे.त्यामुळे या मालिकेला कसा प्रतिसाद मिळतो याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे.Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.