भोपाळ - बॉलिवूड अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर सर्वत्र शोक लहर पसरली आहे. सिने जगतातील अनेकजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करीत आहेत. इरफान यांचा भोपाळ शहराशी संपर्क होता. मध्य प्रदेश नाट्य विद्यालयाचे संचालक आलोक चटर्जी यांनी त्याच्या स्मृतीला उजाळा देण्याचा प्रयत्न ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे.
आलोक यांनी सांगितले, की इरफान हे रंगभूमीशी खूप काळ जोडले गेले होते. त्यांच्यासोबत आलोक यांनी कामही केले आहे. इरफान एक जिंदादिल माणूस होता. त्याने आपले एक स्वतंत्र स्थान निर्माण केले होते. त्यांनी सांगितले, की इरफान त्यांचे बॅचमेंट होते. त्याच्यासोबत त्यांनी कामही केले होते. त्यांच्या कुटुंबियांशीही ते जवळचे होते. त्याच्या अचानक जाण्याचा त्यांना धक्का बसलाय. इरफानच्या जाण्याने एक किंमती हिरा हरवल्याचे त्यांनी म्हटलंय.
इरफान यांचा भोपाळ शहराशी कसा जवळचा संबंध होता, याबद्दल त्यांनी ईटीव्हीला सविस्तर सांगितले आहे. त्याचा स्वभाव, मैत्री, कुटुंबीय यासर्वांच्या आठवणींना त्यांनी उजाळा दिलाय.