ETV Bharat / sitara

मुंबईतील 26 जुलैच्या जलप्रलयात ऋतिक रोशन 'असा' ठरला होता सुपरहिरो - Mumbai latest news

26 जुलैच्या दिवशी ऋतिकने आपला मित्र अभिनेता अभिषेक बच्चन याचा बंगला ‘प्रतिक्षा’बाहेर एका वाहून जाणाऱ्या मुलीचे प्राण मोठ्या बहादूरिने वाचवले होते.

Hrithik Roshan
ऋतिक रोशन
author img

By

Published : Jul 28, 2020, 8:40 PM IST

मुंबई - मुंबईत 26 जुलै 2005 रोजी आलेल्या महाभयंकर पुराला नुकतीच 15 वर्ष झाली आहेेेत. तरीही मुंबईकरांच्या मनात त्या महाभयंकर पुराच्या आठवणी आजही एकदम ताज्या आहेत.

असाच एक अनुभव ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर, निशांत कौशिक याने शेअर केला आहे, ज्यात त्याने ऑनस्क्रीन क्रिश बनणारा सुपर हीरो ऋतिक रोशन याच्याबाबत एक किस्सा सांगितला आहे. यात त्याने अस सांगितल आहे की, 26 जुलैच्या त्या दिवशी ऋतिकने आपला मित्र अभिनेता अभिषेक बच्चन याचा बंगला ‘प्रतिक्षा’बाहेर कसे एका वाहून जाणाऱ्या मुलीचे प्राण मोठ्या बहादूरिने वाचवले होते.

या घटनेविषयी त्याने लिहिले की, “डीन ने आमच्यापैकी काहींना या मुलींना एनएमआयएमएस (NMIMS) मधून त्यांच्या जुहू हॉस्टेलवर सोडण्यास सांगितले होते. हॉस्टेलपासून केवळ दहा फूट अंतरावर, एका मुलीचा हात आमच्या मानवी साखळीतून सुटला आणि ती पाण्याखाली गेली. ऋतिक तेव्हा काही कारणामुळे तिथेच होता त्याने या मुलीला पाहिले आणि ‘प्रतीक्षा’ बंगल्यातून बाहेर येऊन तिला वाचवले. अभिनेता म्हणून स्क्रीनवर दिसणाऱ्या या अभिनेत्याच्या या कृतीतून दिसले की खऱ्या आयुष्यात हीरो असलेल्या व्यक्तीला प्रत्येक वेळी चांगलं काम करण्यासाठी समोर कॅमेऱ्याची गरज नसते."

हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील दृष्यापेक्षा कमी थरारक नव्हता, मात्र वास्तवात असे घडले होते आणि तेव्हा शहरामध्ये हा चर्चेचा विषय बनला होता. त्यावेळी काही वर्तमानपत्रांनी याची दखल घेतली होती. या पोस्टनंतर, हृतिकचे चाहते याविषयी अधिक जाणण्यासाठी कमेंट्स करायला लागले आणि त्यासोबत त्यांना ऋतिकचा अभिमान वाटत असल्याचे ट्विट करून म्हणायला लागले आहेत.

यानंतर, आणखी एका ट्विटर वापरकर्त्याने या गोष्टीला दुजोरा देत म्हटले की, होय ही घटना खरी आहे, एवढंच नाही आणि तर ही घटना घडल्यानंतर त्या एरियातील सर्व मुलींनी पुढचे काही दिवस त्या मैनहोलमध्ये पडण्याची इच्छा व्यक्त करायला सुरुवात केली होती की, जेणेकरून ऋतिक त्याना देखील वाचवायला येईल.

ऋतिक रोशन त्यावेळी त्या मुलीला वाचवण्यासाठी तिथे आला, जेव्हा त्याने अभिषेक बच्चनच्या बंगल्याच्या बाहेर तिला पाण्यात घसरताना पाहिले. अभिनेत्याने केवळ तिला त्यातून बाहेर काढले नाही तर तिचे प्राण देखील वाचवले होते आणि त्यानंतर तो तिला तिच्या होस्टेलवर सुखरूपपणे सोडून देखील आला हॊता.

आणखी एका ट्विटर यूजरने या घटनेला दुजोरा देत म्हटले की ती मुलगी, एनएमआईएमएस मध्ये शिकणारी त्याची बैचमेट होती. या घटनेनंतर फक्त पडद्यावर सुपरहिरोची भूमिका करणारा क्रिश खऱ्या आयुष्यात देखील एखाद्या सुपरहिरो पेक्षा कमी नाही याचा प्रत्यय त्यांचा चाहत्यांना आला आहे.

मुंबई - मुंबईत 26 जुलै 2005 रोजी आलेल्या महाभयंकर पुराला नुकतीच 15 वर्ष झाली आहेेेत. तरीही मुंबईकरांच्या मनात त्या महाभयंकर पुराच्या आठवणी आजही एकदम ताज्या आहेत.

असाच एक अनुभव ट्विटर या सोशल नेटवर्किंग साईटवर, निशांत कौशिक याने शेअर केला आहे, ज्यात त्याने ऑनस्क्रीन क्रिश बनणारा सुपर हीरो ऋतिक रोशन याच्याबाबत एक किस्सा सांगितला आहे. यात त्याने अस सांगितल आहे की, 26 जुलैच्या त्या दिवशी ऋतिकने आपला मित्र अभिनेता अभिषेक बच्चन याचा बंगला ‘प्रतिक्षा’बाहेर कसे एका वाहून जाणाऱ्या मुलीचे प्राण मोठ्या बहादूरिने वाचवले होते.

या घटनेविषयी त्याने लिहिले की, “डीन ने आमच्यापैकी काहींना या मुलींना एनएमआयएमएस (NMIMS) मधून त्यांच्या जुहू हॉस्टेलवर सोडण्यास सांगितले होते. हॉस्टेलपासून केवळ दहा फूट अंतरावर, एका मुलीचा हात आमच्या मानवी साखळीतून सुटला आणि ती पाण्याखाली गेली. ऋतिक तेव्हा काही कारणामुळे तिथेच होता त्याने या मुलीला पाहिले आणि ‘प्रतीक्षा’ बंगल्यातून बाहेर येऊन तिला वाचवले. अभिनेता म्हणून स्क्रीनवर दिसणाऱ्या या अभिनेत्याच्या या कृतीतून दिसले की खऱ्या आयुष्यात हीरो असलेल्या व्यक्तीला प्रत्येक वेळी चांगलं काम करण्यासाठी समोर कॅमेऱ्याची गरज नसते."

हा प्रसंग एखाद्या चित्रपटातील दृष्यापेक्षा कमी थरारक नव्हता, मात्र वास्तवात असे घडले होते आणि तेव्हा शहरामध्ये हा चर्चेचा विषय बनला होता. त्यावेळी काही वर्तमानपत्रांनी याची दखल घेतली होती. या पोस्टनंतर, हृतिकचे चाहते याविषयी अधिक जाणण्यासाठी कमेंट्स करायला लागले आणि त्यासोबत त्यांना ऋतिकचा अभिमान वाटत असल्याचे ट्विट करून म्हणायला लागले आहेत.

यानंतर, आणखी एका ट्विटर वापरकर्त्याने या गोष्टीला दुजोरा देत म्हटले की, होय ही घटना खरी आहे, एवढंच नाही आणि तर ही घटना घडल्यानंतर त्या एरियातील सर्व मुलींनी पुढचे काही दिवस त्या मैनहोलमध्ये पडण्याची इच्छा व्यक्त करायला सुरुवात केली होती की, जेणेकरून ऋतिक त्याना देखील वाचवायला येईल.

ऋतिक रोशन त्यावेळी त्या मुलीला वाचवण्यासाठी तिथे आला, जेव्हा त्याने अभिषेक बच्चनच्या बंगल्याच्या बाहेर तिला पाण्यात घसरताना पाहिले. अभिनेत्याने केवळ तिला त्यातून बाहेर काढले नाही तर तिचे प्राण देखील वाचवले होते आणि त्यानंतर तो तिला तिच्या होस्टेलवर सुखरूपपणे सोडून देखील आला हॊता.

आणखी एका ट्विटर यूजरने या घटनेला दुजोरा देत म्हटले की ती मुलगी, एनएमआईएमएस मध्ये शिकणारी त्याची बैचमेट होती. या घटनेनंतर फक्त पडद्यावर सुपरहिरोची भूमिका करणारा क्रिश खऱ्या आयुष्यात देखील एखाद्या सुपरहिरो पेक्षा कमी नाही याचा प्रत्यय त्यांचा चाहत्यांना आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.