ETV Bharat / sitara

स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पूर्ण केल्यानंतर अभिनयातून विश्रांती घेणार - अमोल कोल्हे

author img

By

Published : Mar 12, 2019, 2:26 PM IST

डॉ. अमोल कोल्हे हे अलिकडेच नाशिकच्या मालेगाव येथे गेले होते. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या १५६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अमोल कोल्हे यांना सयाजी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यानच त्यांनी काही काळ मालिकेतून विश्रांती घेत असल्याचे सांगितले.

अमोल कोल्हे

मुंबई - छोट्या पडद्यावरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेले डॉ. अमोल कोल्हे यांचीही प्रतिमा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. अलिकडेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ही मालिका पूर्ण झाल्यानंतर काही काळ अभिनयातून विश्रांती घेणार असल्याचे वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केले आहे.

डॉ. अमोल कोल्हे हे अलिकडेच नाशिकच्या मालेगाव येथे गेले होते. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या १५६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अमोल कोल्हे यांना सयाजी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यानच त्यांनी काही काळ मालिकेतून विश्रांती घेत असल्याचे सांगितले.

त्यांच्या या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये ते 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतून बाहेर पडत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अमोल कोल्हे हे सध्यातरी ही मालिका सोडणार नाहीत. अमोल कोल्हे यांनी सयाजीरावांच्या जीवनावर एखादी मालिका, नाटक किंवा चित्रपटात भूमिका साकारण्याचेही आश्वासनही चाहत्यांना दिले आहे.


अलिकडेच लोकसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना शिरूर मतदार संघाची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मालिकेच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अमोल कोल्हे एक्झिट घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

मुंबई - छोट्या पडद्यावरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेले डॉ. अमोल कोल्हे यांचीही प्रतिमा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. अलिकडेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ही मालिका पूर्ण झाल्यानंतर काही काळ अभिनयातून विश्रांती घेणार असल्याचे वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केले आहे.

डॉ. अमोल कोल्हे हे अलिकडेच नाशिकच्या मालेगाव येथे गेले होते. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या १५६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अमोल कोल्हे यांना सयाजी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यानच त्यांनी काही काळ मालिकेतून विश्रांती घेत असल्याचे सांगितले.

त्यांच्या या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये ते 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतून बाहेर पडत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अमोल कोल्हे हे सध्यातरी ही मालिका सोडणार नाहीत. अमोल कोल्हे यांनी सयाजीरावांच्या जीवनावर एखादी मालिका, नाटक किंवा चित्रपटात भूमिका साकारण्याचेही आश्वासनही चाहत्यांना दिले आहे.


अलिकडेच लोकसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना शिरूर मतदार संघाची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मालिकेच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अमोल कोल्हे एक्झिट घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Intro:Body:

Amol Kolhe will exit from swarajya rakshak sambhaji serial







स्वराज्य रक्षक संभाजी मालिका पूर्ण केल्यानंतर अभिनयातून विश्रांती घेणार - अमोल कोल्हे





मुंबई - छोट्या पडद्यावरील 'स्वराज्य रक्षक संभाजी' या मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेले डॉ. अमोल कोल्हे यांचीही प्रतिमा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय आहे. अलिकडेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे ही मालिका पूर्ण झाल्यानंतर काही काळ अभिनयातून विश्रांती घेणार असल्याचे वक्तव्य अमोल कोल्हे यांनी केले आहे.



डॉ. अमोल कोल्हे हे अलिकडेच नाशिकच्या मालेगाव येथे गेले होते. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या १५६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात अमोल कोल्हे यांना सयाजी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यानच त्यांनी काही काळ मालिकेतून विश्रांती घेत असल्याचे सांगितले.



त्यांच्या या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये ते 'स्वराज्य रक्षक संभाजी' मालिकेतून बाहेर पडत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, अमोल कोल्हे हे सध्यातरी ही मालिका सोडणार नाहीत. अमोल कोल्हे यांनी सयाजीरावांच्या जीवनावर एखादी मालिका, नाटक किंवा चित्रपटात भूमिका साकारण्याचेही आश्वासनही चाहत्यांना दिले आहे.





अलिकडेच लोकसभा निवडणुकीच्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. अमोल कोल्हे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर त्यांना शिरूर मतदार संघाची उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे मालिकेच्या महत्त्वाच्या टप्प्यावर अमोल कोल्हे एक्झिट घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरेल.




Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.