ETV Bharat / sitara

सुशांत मृत्यू प्रकरण : ..तर पद्मश्री पुरस्कार परत करेन - कंगना रनौत

author img

By

Published : Jul 18, 2020, 3:47 PM IST

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूशी संबंधित जे काही बोलले आहे त्यात तथ्य आढळले नाही तर पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार असल्याचे वक्तव्य अभिनेत्री कंगना रनौतने केले आहे. तिने अलिकडे दिलेल्या एका मुलाखतीत हे विधान केले.

Kangana
कंगना रनौत

मुंबईः अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाबद्दल जे वक्तव्य केलंय ते सिध्द करण्यास अपयश आले तर पद्मश्री पुरस्कार परत करेन असे अभिनेत्री कंगना रनौतने म्हटलंय.

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचलित पॉवरप्ले आणि गैरप्रकारांबद्दल कंगना सतत बोलत आली आहे. कंगनाने बॉलिवूडमध्ये असलेल्या नेपोटिझ्मवर नेहमी आपला जोर दिला आहे. यामुळेच सुशांतने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिचे ठाम मत आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख करीत पुन्हा एकदा कंगनाने आपण करीत असलेले आरोप निराधार निघाले तर सरकारने दिलेला पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

एका आघाडीच्या न्यूज चॅनलशी बोलताना कंगना म्हणाली, "मुंबई पोलिसांनी मला बोलवले आणि मीही त्यांना सांगितले की मी मनालीमध्ये आहे. माझा जवाब घेण्यासाठी कोणाला तरी माझ्याकडे पाठवा, परंतु त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. मी तुम्हाला सांगते जर मी असे काही बोलले आहे ज्याचा मी पुरावा देऊ शकणार नाही, जे मी सिध्द करु शकत नाही आणि जे जनतेच्या हिताचे नाही, तर मी माझा पद्मश्री परत करेन. मी त्याच्यासाठी पात्र नाही. अशा प्रकारची विधाने करणारी मी व्यक्ती नाही आणि आतापर्यंत मी जे काही बोलली आहे ते जनतेच्या हिताचे आहे."

हेही वाचा - सुशांत सिंह राजपूत प्रकरण : आदित्य चोप्रा यांची पोलिसांकडून 3 तास चौकशी

सुशांतच्या सुसाईड नोटबद्दल कंगना खूप आक्रमक आहे आणि सतत बॉलिवूडमधील घराणेशाहीवर आरोप करत आली आहे. यापूर्वीही तिने व्हिडिओ शेअर करुन आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या.

सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. तो काही महिन्यापासून डिप्रेशनमध्ये होता, असे सांगितले जात आहे. पोलीस याचा सखोल तपास करीत आहेत. या अंतर्गत त्याच्या जळच्या आणि बॉलिवूडमधील अनेक लोकांची पोलिसांनी जवाब नंदवले आहेत.

मुंबईः अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या निधनाबद्दल जे वक्तव्य केलंय ते सिध्द करण्यास अपयश आले तर पद्मश्री पुरस्कार परत करेन असे अभिनेत्री कंगना रनौतने म्हटलंय.

हिंदी चित्रपटसृष्टीत प्रचलित पॉवरप्ले आणि गैरप्रकारांबद्दल कंगना सतत बोलत आली आहे. कंगनाने बॉलिवूडमध्ये असलेल्या नेपोटिझ्मवर नेहमी आपला जोर दिला आहे. यामुळेच सुशांतने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला असल्याचे तिचे ठाम मत आहे. या सर्व गोष्टींचा उल्लेख करीत पुन्हा एकदा कंगनाने आपण करीत असलेले आरोप निराधार निघाले तर सरकारने दिलेला पद्मश्री पुरस्कार परत करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

एका आघाडीच्या न्यूज चॅनलशी बोलताना कंगना म्हणाली, "मुंबई पोलिसांनी मला बोलवले आणि मीही त्यांना सांगितले की मी मनालीमध्ये आहे. माझा जवाब घेण्यासाठी कोणाला तरी माझ्याकडे पाठवा, परंतु त्यांच्याकडून काहीच उत्तर आले नाही. मी तुम्हाला सांगते जर मी असे काही बोलले आहे ज्याचा मी पुरावा देऊ शकणार नाही, जे मी सिध्द करु शकत नाही आणि जे जनतेच्या हिताचे नाही, तर मी माझा पद्मश्री परत करेन. मी त्याच्यासाठी पात्र नाही. अशा प्रकारची विधाने करणारी मी व्यक्ती नाही आणि आतापर्यंत मी जे काही बोलली आहे ते जनतेच्या हिताचे आहे."

हेही वाचा - सुशांत सिंह राजपूत प्रकरण : आदित्य चोप्रा यांची पोलिसांकडून 3 तास चौकशी

सुशांतच्या सुसाईड नोटबद्दल कंगना खूप आक्रमक आहे आणि सतत बॉलिवूडमधील घराणेशाहीवर आरोप करत आली आहे. यापूर्वीही तिने व्हिडिओ शेअर करुन आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या.

सुशांतसिंह राजपूतने १४ जून रोजी वांद्रे येथील त्याच्या घरी पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. तो काही महिन्यापासून डिप्रेशनमध्ये होता, असे सांगितले जात आहे. पोलीस याचा सखोल तपास करीत आहेत. या अंतर्गत त्याच्या जळच्या आणि बॉलिवूडमधील अनेक लोकांची पोलिसांनी जवाब नंदवले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.