मुंबई - शाळांमध्ये शेतीचा विषय दीर्घकाळासाठी शिकवला गेला पाहिजे असे मत अभिनेत्री भूमी पडणेकरने व्यक्त केले आहे. लॉकडाऊन दरम्यान भूमीने घरी आईसह एक लहान किचन गार्डन बनविली आहे. मुलांनाही याबद्दल सांगितले पाहिजे, अशी तिची कल्पना आहे. भूमी म्हणते की, ''शाळांमध्ये शेतीचा विषय शिकवला तर भविष्यातील पिढ्या खरोखरच याचा सराव करू शकतील आणि फळे आणि भाज्या वाढवतील.''
तिच्या वैयक्तिक अनुभवाबद्दल बोलताना भूमी म्हणाली, "आज मला वाटते की जर मी शाळेमध्ये शाळेमध्ये शेती पिकवण्याबद्दल काही शिकले पाहिजे होते. यातून आपल्याला कळू शकते की झाडे, रोपे यांची देखभाल कशी करावी, खाद्या कसे उगवले जाऊ शकेल, रोपांची लावण कशी करायला पाहिजे. बरीच माहिती मिळवल्यानंतर मला आता थोडेफार समजले आहे.''
भूमी हिला असे वाटते आहे की केवळ देशातील शेतकरीच नाही तर सर्वांना शाश्वत शेतीची माहिती मिळाली पाहिजे.