ETV Bharat / sitara

सीमेवरील तणावाबद्दल ह्रतिक, अनुपमसह अनेक सेलेब्रिटिजनी व्यक्त केली चिंता

author img

By

Published : Jun 17, 2020, 12:49 PM IST

Updated : Jun 17, 2020, 5:00 PM IST

लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये भारतीय आणि चिनी सैन्य यांच्यात चकमक होऊन २० भारतीय जवानांना वीरमरण आले आहे. या पार्श्वभूमीवर बॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी भारतीय सैन्याला पाठिंबा देत चीनवर टीका केली आहे. सीमेवरील तणावाबद्दल चिंताही व्यक्त केली आहे.

hrithik-anupam-among-b-towners
सीमेवरील तणावाबद्दल व्यक्त केली चिंता

मुंबई - भारत - चीन सीमेवरील तणावातून भारताच्या २० जवानांना वीरमरण आले आहे. लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली होती. या घटनेवर बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनने दुःख व्यक्त केले आहे. लोक सध्या अशांततेच्या परिस्थितीला तोंड देत आहेत. त्यातच लडाखमध्ये झालेल्या भारतीय सैन्याच्या जीवितहानीमुळे दु:ख झाल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.

सीमेवर भारतीय जवान धैर्याने उभा असल्याचे सांगत हृतिकने देशाच्या सीमेचे रक्षण करताना वीरमरण आलेल्या जवानांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

  • It leaves me with a heavy heart to know of the lives lost in Ladakh & the unrest we are faced with. Our defence stands tall on ground. My highest respect to the martyred in the line of duty. Condolences & prayers for their families. May the departed & living find peace 🙏🏻

    — Hrithik Roshan (@iHrithik) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतीय सैन्यदलाला पाठिंबा दर्शविताना ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर म्हटले आहे, "भारतीय सेना की जय. जय हिंद." याद्वारे त्यांनी वीरमरण प्राप्त जवानांना आदरांजली वाहिली आहे.

  • भारतीय सेना की जय। जय हिन्द।🇮🇳

    — Anupam Kher (@AnupamPKher) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - सलमानच्या कुटुंबीयांनी माझं 'वाटोळं' केलं, 'दबंग' दिग्दर्शकाचा आरोप

सीमेवरील तणावामुळे खूप दु:खी झाल्याचे सांगत अक्षय कुमार याने म्हटले आहे, "गलवान व्हॅलीतील आमच्या बहाद्दरांच्या मृत्यूमुळे अतिव दु: ख झाले. देशाच्या अनमोल सेवेबद्दल आम्ही कायमचे त्यांचे ऋणी असल्याचे सांगत त्याने या सैनिकांच्या कुटुंबीयांबद्दल सहानभूती व्यक्त केली आहे."

  • Deeply saddened by the death of our bravehearts in #GalwanValley. We will forever be indebted to them for their invaluable service to the nation.
    My heartfelt condolences to their families 🙏🏻 pic.twitter.com/tGOGTU61X6

    — Akshay Kumar (@akshaykumar) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सैन्य आणि हुतात्मा जवानांना सलाम करीत अमिताभ बच्चन यांनीही लता मंगेशकरांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगों' या गीताच्या काही ओळी ट्विट करत आदरांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी, आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिल्याच्या भावना बच्चन यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच अभिनेता तुषार कपूर यानेही "आमच्या नायकांना, सीमेवरील सर्व शूर सैनिकांना अधिक बळ मिळो! आमच्या शहिदांना श्रद्धांजली!" असे ट्विट करून हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली आहे.

  • T 3565 - .... ज़रा आँख में भर लो पानी ; जो शहीद हुए हैं उनकी , ज़रा याद करो क़ुर्बानी .. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳they sacrificed their lives to protect our country , to keep us safe and secure. SALUTE Indian Army Officers and Jawans ! JAI HIND

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये १५ जून रोजी संध्याकाळी आणि रात्री चीनचा हिंसक चेहरा-समोर आला. ही परिस्थिती टाळता आली असती. चीनने उच्च स्तरावरील कराराचे काटेकोरपणे पालन केल्यास हे घडले नसते. या चकमकीत २० सैनिक ठार झाल्याची आणि १७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे

मुंबई - भारत - चीन सीमेवरील तणावातून भारताच्या २० जवानांना वीरमरण आले आहे. लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये सोमवारी रात्री ही घटना घडली होती. या घटनेवर बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशनने दुःख व्यक्त केले आहे. लोक सध्या अशांततेच्या परिस्थितीला तोंड देत आहेत. त्यातच लडाखमध्ये झालेल्या भारतीय सैन्याच्या जीवितहानीमुळे दु:ख झाल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे.

सीमेवर भारतीय जवान धैर्याने उभा असल्याचे सांगत हृतिकने देशाच्या सीमेचे रक्षण करताना वीरमरण आलेल्या जवानांबद्दल शोक व्यक्त केला आहे. तसेच त्यांच्या कुटुंबीयाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे.

  • It leaves me with a heavy heart to know of the lives lost in Ladakh & the unrest we are faced with. Our defence stands tall on ground. My highest respect to the martyred in the line of duty. Condolences & prayers for their families. May the departed & living find peace 🙏🏻

    — Hrithik Roshan (@iHrithik) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

भारतीय सैन्यदलाला पाठिंबा दर्शविताना ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर म्हटले आहे, "भारतीय सेना की जय. जय हिंद." याद्वारे त्यांनी वीरमरण प्राप्त जवानांना आदरांजली वाहिली आहे.

  • भारतीय सेना की जय। जय हिन्द।🇮🇳

    — Anupam Kher (@AnupamPKher) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - सलमानच्या कुटुंबीयांनी माझं 'वाटोळं' केलं, 'दबंग' दिग्दर्शकाचा आरोप

सीमेवरील तणावामुळे खूप दु:खी झाल्याचे सांगत अक्षय कुमार याने म्हटले आहे, "गलवान व्हॅलीतील आमच्या बहाद्दरांच्या मृत्यूमुळे अतिव दु: ख झाले. देशाच्या अनमोल सेवेबद्दल आम्ही कायमचे त्यांचे ऋणी असल्याचे सांगत त्याने या सैनिकांच्या कुटुंबीयांबद्दल सहानभूती व्यक्त केली आहे."

  • Deeply saddened by the death of our bravehearts in #GalwanValley. We will forever be indebted to them for their invaluable service to the nation.
    My heartfelt condolences to their families 🙏🏻 pic.twitter.com/tGOGTU61X6

    — Akshay Kumar (@akshaykumar) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

सैन्य आणि हुतात्मा जवानांना सलाम करीत अमिताभ बच्चन यांनीही लता मंगेशकरांनी गायलेले 'ए मेरे वतन के लोगों' या गीताच्या काही ओळी ट्विट करत आदरांजली वाहिली आहे. त्यांनी आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी, आम्हाला सुरक्षित ठेवण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिल्याच्या भावना बच्चन यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच अभिनेता तुषार कपूर यानेही "आमच्या नायकांना, सीमेवरील सर्व शूर सैनिकांना अधिक बळ मिळो! आमच्या शहिदांना श्रद्धांजली!" असे ट्विट करून हुतात्मा जवानांना आदरांजली वाहिली आहे.

  • T 3565 - .... ज़रा आँख में भर लो पानी ; जो शहीद हुए हैं उनकी , ज़रा याद करो क़ुर्बानी .. 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳they sacrificed their lives to protect our country , to keep us safe and secure. SALUTE Indian Army Officers and Jawans ! JAI HIND

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

लडाखच्या गलवान व्हॅलीमध्ये १५ जून रोजी संध्याकाळी आणि रात्री चीनचा हिंसक चेहरा-समोर आला. ही परिस्थिती टाळता आली असती. चीनने उच्च स्तरावरील कराराचे काटेकोरपणे पालन केल्यास हे घडले नसते. या चकमकीत २० सैनिक ठार झाल्याची आणि १७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती भारतीय लष्कराने दिली आहे

Last Updated : Jun 17, 2020, 5:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.