ETV Bharat / opinion

भारत बांगलादेश संबंध : परस्परांसाठी फायदेशीर

author img

By

Published : Mar 31, 2021, 8:16 PM IST

बांगलादेशच्या स्थापना दिनानिमित्ताने भारतप्रती कृतज्ञतेच्या संदेशात शेख मुजीबुर रहमान म्हणाले होते की ‘भारतीय सैनिकांनी आमच्यासाठी त्यांचे बलिदान दिले. आमचे नागरिक त्यांच्या बलिदानाची नेहमी आठवण ठेवतील.’ बांगलादेशच्या निर्मात्यांना महात्मा गांधी शांती पुरस्काराने सन्मानित करण्यासाठीचा पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय बांगलादेश दौरा ऐतिहासिक होता.

भारत बांगलादेश संबंध : परस्परांसाठी फायदेशीर
भारत बांगलादेश संबंध : परस्परांसाठी फायदेशीर

बांगलादेशच्या स्थापना दिनानिमित्ताने भारतप्रती कृतज्ञतेच्या संदेशात शेख मुजीबुर रहमान म्हणाले होते की ‘भारतीय सैनिकांनी आमच्यासाठी त्यांचे बलिदान दिले. आमचे नागरिक त्यांच्या बलिदानाची नेहमी आठवण ठेवतील.’ बांगलादेशच्या निर्मात्यांना महात्मा गांधी शांती पुरस्काराने सन्मानित करण्यासाठीचा पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय बांगलादेश दौरा ऐतिहासिक होता.

सीमेव्यतिरिक्त बांगलादेशचा ऐतिहासिक, सामाजिक, संस्कृती आणि अध्यात्मिक असादेखील भारताशी संबंध आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्याने हे सिद्ध केले की राष्ट्र, धर्मापेक्षा भाषेने अधिक बांधलेले असते. बांगलादेशची निर्मिती ही आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्यामागील प्रेरणा म्हणजे आहे. हेन्री किसिंजर यांनी बांगलादेशच्या स्थापनेच्यावेळी संभावना केली असली तरी बांगलादेशने पाकिस्तानच्या तुलनेत सर्वच विकास निर्देशांकात आघाडी घेतली आहे. म्हणूनच हा बांगलादेशसाठी खराखुरा सुवर्ण महोत्सव आहे.

इंदिरा गांधी आणि मुजीबुर रहमान यांनी बांगला करारावर १९७५ साली स्वाक्षरी केली, त्यानंतर तीव्र चढउतार पाहण्यात आले. निर्वासित आणि नदीच्या पाण्याचे वाटप, सीमा वाद आणि सीमेवर विस्कळीत वातावरण, बांगलादेशात भारतविरोधी सैन्याची शिबिरे, बांगलादेशला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांसाठी भारतावरच दोषारोप या सर्व मुद्द्यांमुळे भारत आणि बांगलादेशमधील संबंध बिघडत गेले. बांगलादेशात लष्करी शासन संपुष्टात आल्यानंतर लोकशाहीची मुळे रुजली असल्याने दोन्ही शेजार्‍यांमधील गैरसमज कमी होऊ लागले. जमीनीचा वाद तर 2015 साली कायमस्वरुपी निकालात निघाला. दहा वर्ष जुना तीस्ता नदीच्या पाण्याच्या वाटणीचा करारदेखील रुळावर आल्यास, उपखंडात प्रगतीचा नवा इतिहास लिहिला जाईल.

1980च्या दशकापासून बांगलादेशच्या विकास दराला वेग आला आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतही त्याने भारताशी स्पर्धा करण्यास सुरवात केली. बांगलादेशने मिळवलेले औद्योगिक यश खरोखरच आश्चर्यकारक आहे.सुमारे चाळीस वर्षांपूर्वी बांगलादेशच्या जीडीपीमध्ये शेतीचा हिस्सा 33.२ टक्के होता. आता कृषी योगदानाचा आकडा १४.२ टक्क्यांवर आला आहे आणि जीडीपीमध्ये उद्योगांचे योगदान १७ टक्क्यांवरून वाढून 36..6 टक्के झाले आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी, यूएनच्या विकास धोरणावरील समितीने बांगलादेशला सर्वात कमी विकसित देशांच्या यादीतून हटवून त्यास विकसनशील देशांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली. ही शिफारस मान्य केल्यास बांगलादेशला कर आणि निर्यातीच्या कोट्याची पर्वा न करता प्रगत देशांशी व्यापार करता येईल.

बांगलादेशमधून चीनला आपल्या उत्पादनांची कोणत्याही कराशिवा 97 टक्के निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. चीनने असेही म्हटले आहे की यामुळे बांगलादेशला 140 अमेरिकन डॉलर्सची कमाई होईल.

भारताच्या आजूबाजूच्या सर्व देशांना रस्तेबांधणीच्या निमित्ताने चीन आपल्या नियंत्रणाखाली ठेवत आहे. या प्रक्रियेत चीनने बांगलादेशलादेखील बाजूला ठेवले नाही. पंतप्रधान मोदींनी 'लुक ईस्ट' धोरणात अनेक सुधारणा केल्या आणि 'कृती पूर्व' धोरण स्वीकारले. त्यांनी बांगलादेशाशी असलेल्या संबंधांना नवीन दिशा देणार्‍या अनेक योजना सुरू केल्या आहेत. लस निर्यातीसाठी भारताने बांगलादेशला प्रथम प्राधान्य दिले. ढाक्याशी संबंध दृढ केल्याने म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनामशी आपले संबंध बळकट होतील, या वस्तुस्थितीकडे भारताने दुर्लक्ष केले नाही.

जागतिक अर्थव्यवस्थेत वेगाने विकास होत असलेल्या बांगलादेशशी संबंध दृढ करणे हे भारतासाठी फायदेशीर ठरेल.

बांगलादेशच्या स्थापना दिनानिमित्ताने भारतप्रती कृतज्ञतेच्या संदेशात शेख मुजीबुर रहमान म्हणाले होते की ‘भारतीय सैनिकांनी आमच्यासाठी त्यांचे बलिदान दिले. आमचे नागरिक त्यांच्या बलिदानाची नेहमी आठवण ठेवतील.’ बांगलादेशच्या निर्मात्यांना महात्मा गांधी शांती पुरस्काराने सन्मानित करण्यासाठीचा पंतप्रधान मोदींचा दोन दिवसीय बांगलादेश दौरा ऐतिहासिक होता.

सीमेव्यतिरिक्त बांगलादेशचा ऐतिहासिक, सामाजिक, संस्कृती आणि अध्यात्मिक असादेखील भारताशी संबंध आहे. बांगलादेशच्या स्वातंत्र्याने हे सिद्ध केले की राष्ट्र, धर्मापेक्षा भाषेने अधिक बांधलेले असते. बांगलादेशची निर्मिती ही आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्यामागील प्रेरणा म्हणजे आहे. हेन्री किसिंजर यांनी बांगलादेशच्या स्थापनेच्यावेळी संभावना केली असली तरी बांगलादेशने पाकिस्तानच्या तुलनेत सर्वच विकास निर्देशांकात आघाडी घेतली आहे. म्हणूनच हा बांगलादेशसाठी खराखुरा सुवर्ण महोत्सव आहे.

इंदिरा गांधी आणि मुजीबुर रहमान यांनी बांगला करारावर १९७५ साली स्वाक्षरी केली, त्यानंतर तीव्र चढउतार पाहण्यात आले. निर्वासित आणि नदीच्या पाण्याचे वाटप, सीमा वाद आणि सीमेवर विस्कळीत वातावरण, बांगलादेशात भारतविरोधी सैन्याची शिबिरे, बांगलादेशला भेडसावणाऱ्या सर्व समस्यांसाठी भारतावरच दोषारोप या सर्व मुद्द्यांमुळे भारत आणि बांगलादेशमधील संबंध बिघडत गेले. बांगलादेशात लष्करी शासन संपुष्टात आल्यानंतर लोकशाहीची मुळे रुजली असल्याने दोन्ही शेजार्‍यांमधील गैरसमज कमी होऊ लागले. जमीनीचा वाद तर 2015 साली कायमस्वरुपी निकालात निघाला. दहा वर्ष जुना तीस्ता नदीच्या पाण्याच्या वाटणीचा करारदेखील रुळावर आल्यास, उपखंडात प्रगतीचा नवा इतिहास लिहिला जाईल.

1980च्या दशकापासून बांगलादेशच्या विकास दराला वेग आला आहे. दरडोई उत्पन्नाच्या बाबतीतही त्याने भारताशी स्पर्धा करण्यास सुरवात केली. बांगलादेशने मिळवलेले औद्योगिक यश खरोखरच आश्चर्यकारक आहे.सुमारे चाळीस वर्षांपूर्वी बांगलादेशच्या जीडीपीमध्ये शेतीचा हिस्सा 33.२ टक्के होता. आता कृषी योगदानाचा आकडा १४.२ टक्क्यांवर आला आहे आणि जीडीपीमध्ये उद्योगांचे योगदान १७ टक्क्यांवरून वाढून 36..6 टक्के झाले आहे. सुमारे एक महिन्यापूर्वी, यूएनच्या विकास धोरणावरील समितीने बांगलादेशला सर्वात कमी विकसित देशांच्या यादीतून हटवून त्यास विकसनशील देशांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस केली. ही शिफारस मान्य केल्यास बांगलादेशला कर आणि निर्यातीच्या कोट्याची पर्वा न करता प्रगत देशांशी व्यापार करता येईल.

बांगलादेशमधून चीनला आपल्या उत्पादनांची कोणत्याही कराशिवा 97 टक्के निर्यात करण्याची परवानगी देण्यात आली आहे. चीनने असेही म्हटले आहे की यामुळे बांगलादेशला 140 अमेरिकन डॉलर्सची कमाई होईल.

भारताच्या आजूबाजूच्या सर्व देशांना रस्तेबांधणीच्या निमित्ताने चीन आपल्या नियंत्रणाखाली ठेवत आहे. या प्रक्रियेत चीनने बांगलादेशलादेखील बाजूला ठेवले नाही. पंतप्रधान मोदींनी 'लुक ईस्ट' धोरणात अनेक सुधारणा केल्या आणि 'कृती पूर्व' धोरण स्वीकारले. त्यांनी बांगलादेशाशी असलेल्या संबंधांना नवीन दिशा देणार्‍या अनेक योजना सुरू केल्या आहेत. लस निर्यातीसाठी भारताने बांगलादेशला प्रथम प्राधान्य दिले. ढाक्याशी संबंध दृढ केल्याने म्यानमार, थायलंड, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनामशी आपले संबंध बळकट होतील, या वस्तुस्थितीकडे भारताने दुर्लक्ष केले नाही.

जागतिक अर्थव्यवस्थेत वेगाने विकास होत असलेल्या बांगलादेशशी संबंध दृढ करणे हे भारतासाठी फायदेशीर ठरेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.