ETV Bharat / international

Pakistani woman Demand : 35 वर्षांपासून मिळाला नाही न्याय : पाकिस्तानी महिलेची स्वत:ला भारतात पाठवण्याची मागणी - 35 वर्षांपासून मिळाला नाही न्याय

पाकिस्तानातील एका महिलेच्या जमिनीवर 35 वर्षांपासून ( Occupied women's land for 35 years ) काही काही लोकांनी कब्जा केला आहे. तसेच न्याय न मिळाल्याने दुखावलेल्या महिलेने न्यायाधिशांना भारतात पाठवण्याची विनंती केली होती. त्यावर न्यायाधीशांनी काय उत्तर दिले, जाणून घ्या

author img

By

Published : Jun 2, 2022, 7:59 PM IST

इस्लामाबाद: तीन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही बळकावलेली जमीन न मिळाल्याने निराश झालेल्या एका पाकिस्तानी महिलेने मंगळवारी उच्च न्यायालयात तिला भारतात पाठवण्याची मागणी केली ( Pakistani woman demands sent to India ). पाकिस्तानच्या समा टेलिव्हिजन वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाब प्रांतातील शेखूपुरा जिल्ह्यातील रहिवासी सय्यदा शहनाज नावाची महिला आपली जमीन परत मिळवण्यासाठी घरोघरी भटकत आहे. सय्यदाच्या या जमिनीवर सुमारे 35 वर्षांपूर्वी काही प्रभावशाली लोकांनी कब्जा केला होता.

पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेबद्दल पूर्णपणे निराश, सय्यदा शहनाज (45) यांनी लाहोर उच्च न्यायालयाकडे ( Lahore High Court ) अधिकाऱ्यांना तिला भारतीय व्हिसा जारी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. सय्यदा सांगतात की, त्यांना कधीच त्यांची जमीन परत मिळेल असे वाटत नाही. याचिकाकर्त्याने ही विचित्र विनंती केली, तेव्हा एलएचसीचे मुख्य न्यायाधीश अमीर भाटी या प्रकरणाची सुनावणी करत होते.

घटनेचे वर्णन करताना सय्यदा शहनाज म्हणाल्या की, हे प्रकरण गेल्या 35 वर्षांपासून सुरू आहे. खटला सुरू झाला तेव्हा ती केवळ नऊ वर्षांची होती. जमीन न मिळाल्याने शेखपुरा येथे भाड्याच्या घरात राहण्यास भाग पाडल्याचेही सय्यदा यांनी न्यायालयाला सांगितले. समा टेलिव्हिजन वाहिनीच्या ( Sama Television Channel ) वृत्तानुसार, 'तिला तिची जमीन कधीच परत मिळेल अशी आशा नाही, त्यामुळे याचिकाकर्त्याने कोर्टाला विनंती केली की, तिला भारतात पाठवण्याचे आदेश द्यावेत.' याचिकाकर्त्याच्या या विनंतीवर न्यायमूर्तींनी ते त्यांच्या अधिकारक्षेत्रात नसल्याचे सांगितले.

हेही वाचा - Russia ICBM : रशियाने आपली आयसीबीएम अण्वस्त्रे काढली बाहेर

इस्लामाबाद: तीन दशकांहून अधिक काळ लोटल्यानंतरही बळकावलेली जमीन न मिळाल्याने निराश झालेल्या एका पाकिस्तानी महिलेने मंगळवारी उच्च न्यायालयात तिला भारतात पाठवण्याची मागणी केली ( Pakistani woman demands sent to India ). पाकिस्तानच्या समा टेलिव्हिजन वाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, पंजाब प्रांतातील शेखूपुरा जिल्ह्यातील रहिवासी सय्यदा शहनाज नावाची महिला आपली जमीन परत मिळवण्यासाठी घरोघरी भटकत आहे. सय्यदाच्या या जमिनीवर सुमारे 35 वर्षांपूर्वी काही प्रभावशाली लोकांनी कब्जा केला होता.

पाकिस्तानच्या न्यायव्यवस्थेबद्दल पूर्णपणे निराश, सय्यदा शहनाज (45) यांनी लाहोर उच्च न्यायालयाकडे ( Lahore High Court ) अधिकाऱ्यांना तिला भारतीय व्हिसा जारी करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. सय्यदा सांगतात की, त्यांना कधीच त्यांची जमीन परत मिळेल असे वाटत नाही. याचिकाकर्त्याने ही विचित्र विनंती केली, तेव्हा एलएचसीचे मुख्य न्यायाधीश अमीर भाटी या प्रकरणाची सुनावणी करत होते.

घटनेचे वर्णन करताना सय्यदा शहनाज म्हणाल्या की, हे प्रकरण गेल्या 35 वर्षांपासून सुरू आहे. खटला सुरू झाला तेव्हा ती केवळ नऊ वर्षांची होती. जमीन न मिळाल्याने शेखपुरा येथे भाड्याच्या घरात राहण्यास भाग पाडल्याचेही सय्यदा यांनी न्यायालयाला सांगितले. समा टेलिव्हिजन वाहिनीच्या ( Sama Television Channel ) वृत्तानुसार, 'तिला तिची जमीन कधीच परत मिळेल अशी आशा नाही, त्यामुळे याचिकाकर्त्याने कोर्टाला विनंती केली की, तिला भारतात पाठवण्याचे आदेश द्यावेत.' याचिकाकर्त्याच्या या विनंतीवर न्यायमूर्तींनी ते त्यांच्या अधिकारक्षेत्रात नसल्याचे सांगितले.

हेही वाचा - Russia ICBM : रशियाने आपली आयसीबीएम अण्वस्त्रे काढली बाहेर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.