ETV Bharat / international

काश्मिरी मुलांना पुन्हा शाळेत पाठवण्यासाठी मदत करा; मलालाची संयुक्त राष्ट्राला विनंती

author img

By

Published : Sep 15, 2019, 3:11 PM IST

गेल्या ४० दिवसांहून अधिक काश्मीर खोऱ्यातील मुलांना शाळेत जाता आलेले नाही. शाळकरी मुली घरातच अडकून पडल्या आहेत, त्यांना बाहेर पडायला भीती वाटत आहे. या बाबतची माहिती देणारा अहवाल मला मिळाल्यापासून मी खूपच व्यथित झाले आहे.

मलाला

लंडन - नोबेल पारितोषिक विजेती आणि पाकिस्तानमधील शिक्षण हक्कासाठी लढा देणारी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझईने काश्मिरी मुलांना पुन्हा शाळेत पाठवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. काश्मीर खोऱ्यात असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती तिने केली आहे.

हेही वाचा - जम्मू-काश्मीरबाबत नेहरूंचा दृष्टिकोन चुकीचा; सरदार पटेलांचा दृष्टिकोन योग्य - रविशंकर प्रसाद

गेल्या ४० दिवसांहून अधिक काश्मीर खोऱ्यातील मुलांना शाळेत जाता आलेले नाही. शाळकरी मुली घरातच अडकून पडल्या आहेत, त्यांना बाहेर पडायला भीती वाटत आहे. या बाबतची माहिती देणारा अहवाल मला मिळाल्यापासून मी खूपच व्यथित झाले आहे. संयुक्त राष्ट्रांनी येथील शांततेसाठी प्रयत्न करावेत, काश्मीरी लोकांना काय वाटते, त्यांची मते जाणून घेतली पाहिजेत आणि मुलांना सुरक्षितरित्या शाळेत जाता आले पाहिजे, असे मलाला म्हणाली.

हेही वाचा - लेह-कारगिलसह राज्यातील जिल्ह्याची स्थिती सामान्य, डीजीपी दिलबाग सिंह यांची माहिती

संवादाच्या साधनांवर गदा आणल्याने काश्मीरी लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आहे. मला तेथील परिस्थितीची माहिती थेट शाळकरी मुलींकडून ऐकायची आहे. शनिवारी ४१ दिवस झाले काश्मीरमधील दुकाने, उद्योग-धंदे, इंटरनेट सेवा बंद आहेत. सरकारी वाहतूक सुविधाही बंद करण्यात आल्या आहेत, असे ती म्हणाली.

हेही वाचा - राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला चेतावणी, बंदा करा दहशतवाद नाहीतर होतील तुकडे-तुकडे

येथील राज्य सरकारने शाळा उघडण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र परिस्थिती चांगली नसल्याने विद्यार्थ्यांचे पालक मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी घरात थांबवणे पसंत करत आहेत. एकंदरितच तेथील सामान्य जीवन ५ ऑगस्टनंतर आर्टिकल ३७० हटवल्यापासून नाहीसे झाले असून ते पूर्वपदावर आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी प्रयत्न करायला हवेत, असे मलालाने म्हटले आहे.

लंडन - नोबेल पारितोषिक विजेती आणि पाकिस्तानमधील शिक्षण हक्कासाठी लढा देणारी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझईने काश्मिरी मुलांना पुन्हा शाळेत पाठवण्यासाठी संयुक्त राष्ट्राने प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. काश्मीर खोऱ्यात असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती तिने केली आहे.

हेही वाचा - जम्मू-काश्मीरबाबत नेहरूंचा दृष्टिकोन चुकीचा; सरदार पटेलांचा दृष्टिकोन योग्य - रविशंकर प्रसाद

गेल्या ४० दिवसांहून अधिक काश्मीर खोऱ्यातील मुलांना शाळेत जाता आलेले नाही. शाळकरी मुली घरातच अडकून पडल्या आहेत, त्यांना बाहेर पडायला भीती वाटत आहे. या बाबतची माहिती देणारा अहवाल मला मिळाल्यापासून मी खूपच व्यथित झाले आहे. संयुक्त राष्ट्रांनी येथील शांततेसाठी प्रयत्न करावेत, काश्मीरी लोकांना काय वाटते, त्यांची मते जाणून घेतली पाहिजेत आणि मुलांना सुरक्षितरित्या शाळेत जाता आले पाहिजे, असे मलाला म्हणाली.

हेही वाचा - लेह-कारगिलसह राज्यातील जिल्ह्याची स्थिती सामान्य, डीजीपी दिलबाग सिंह यांची माहिती

संवादाच्या साधनांवर गदा आणल्याने काश्मीरी लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आहे. मला तेथील परिस्थितीची माहिती थेट शाळकरी मुलींकडून ऐकायची आहे. शनिवारी ४१ दिवस झाले काश्मीरमधील दुकाने, उद्योग-धंदे, इंटरनेट सेवा बंद आहेत. सरकारी वाहतूक सुविधाही बंद करण्यात आल्या आहेत, असे ती म्हणाली.

हेही वाचा - राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला चेतावणी, बंदा करा दहशतवाद नाहीतर होतील तुकडे-तुकडे

येथील राज्य सरकारने शाळा उघडण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र परिस्थिती चांगली नसल्याने विद्यार्थ्यांचे पालक मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी घरात थांबवणे पसंत करत आहेत. एकंदरितच तेथील सामान्य जीवन ५ ऑगस्टनंतर आर्टिकल ३७० हटवल्यापासून नाहीसे झाले असून ते पूर्वपदावर आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी प्रयत्न करायला हवेत, असे मलालाने म्हटले आहे.

Intro:Body:

काश्मीरी मुलांना पुन्हा शाळेत पाठवण्यासाठी मदत करा; मलालाची संयुक्त राष्ट्रांना विनंती



लंडन - नोबेल पारितोषिक विजेती आणि पाकिस्तानमधील शिक्षण हक्कासाठी लढा देणारी सामाजिक कार्यकर्ती मलाला युसूफझईने काश्मीरी मुलांना पुन्हा शाळेत पाठवण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. काश्मीर खोऱ्यात असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे मुले शिक्षणापासून वंचित राहत आहेत, येथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी प्रयत्न करावेत, अशी विनंती तिने केली आहे.



गेल्या ४० दिवसांहून अधिक काश्मीर खोऱ्यातील मुलांना शाळेत जाता आलेले नाही. शाळकरी मुली घरातच अडकून पडल्या आहेत, त्यांना बाहेर पडायला भीती वाटत आहे. या बाबतची माहिती देणारा अहवाल मला मिळाल्यापासून मी खूपच व्यथित झाले आहे. संयुक्त राष्ट्रांनी येथील शांततेसाठी प्रयत्न करावेत, काश्मीरी लोकांना काय वाटते, त्यांची मते जाणून घेतली पाहिजेत आणि मुलांना सुरक्षितरित्या शाळेत जाता आले पाहिजे, असे मलाला म्हणाली.



संवादाच्या साधनांवर गदा आणल्याने काश्मीरी लोकांचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटला आहे. मला तेथील परिस्थितीची माहिती थेट शाळकरी मुलींकडून ऐकायची आहे. शनिवारी ४१ दिवस झाले काश्मीरमधील दुकाने, उद्योग-धंदे, इंटरनेट सेवा बंद आहेत. सरकारी वाहतूक सुविधाही बंद करण्यात आल्या आहेत, असे ती म्हणाली.



येथील राज्य सरकारने शाळा उघडण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र परिस्थिती चांगली नसल्याने विद्यार्थ्यांचे पालक मुलांना शाळेत पाठवण्याऐवजी घरात थांबवणे पसंत करत आहेत. एकंदरितच तेथील सामान्य जीवन ५ ऑगस्टनंतर आर्टिकल ३७० हटवल्यापासून नाहीसे झाले असून ते पूर्वपदावर आणण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी प्रयत्न करायला हवेत, असे मलालाने म्हटले आहे.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.