ETV Bharat / international

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान संसद भवन हल्ला प्रकरणात निर्दोष - इम्रान खान पाक संसद हल्ला बातमी

इस्लामाबादस्थित एटीसीने २०१४ च्या संसद भवन हल्ला प्रकरणात पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची निर्दोष सुटका केली. त्यांच्यावर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळल्यामुळे कोर्टाने राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याविरूद्धची कार्यवाही देखील थांबवली.

इम्रान खान
इम्रान खान
author img

By

Published : Oct 29, 2020, 5:40 PM IST

इस्लामाबाद - दहशतवादविरोधी कोर्टाने (एटीसी) गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची २०१४ च्या संसद भवन हल्ला प्रकरणात निर्दोष सुटका केली. एटीसीचे न्यायाधीश राजा जावाद अब्बास हसन यांनी हा निर्णय जाहीर केल्याची माहिती जिओ न्यूजने दिली आहे.

फेडरल सरकारच्या वकिलाने खान यांच्या निर्दोषतेसाठी याचिका दाखल केली होती. सरकारी वकिलांनी शेवटच्या सुनावणीच्या वेळी हा खटला राजकीय कारणावरून चालवण्यात आला असून त्यामुळे "कोर्टाचा वेळ वाया जाईल" असा युक्तिवाद केला होता.

न्यायाधीशांनी आपला वकील अब्दुल्ला बाबर अवान यांच्यामार्फत कोर्टाला माहिती दिली होती की फिर्यादी हा दोषमुक्त होण्याच्या बाजूने आहेत. राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळल्यामुळे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याविरूद्धची कारवाई थांबविण्याचाही निर्णय कोर्टाने घेतला.

या केसप्रकरणी कोर्टाने आणखी काही जणांवर दोषारोपपत्र दाखल केले आहेत. ज्यात परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी, संरक्षणमंत्री परवेझ खट्टक, शिक्षणमंत्री शफकत मेहमूद, आणि नियोजनमंत्री असद उमर, तसेच पक्षाचे प्रख्यात नेते अलीम खान आणि त्यांचे माजी निकटवर्तीय प्रीमियर, जहांगीर खान तारीन यांचीही नावे ठेवण्याचा निर्णय कोर्टाने घेतला.

जिओ न्यूजच्या अहवालानुसार, ऑगस्ट २०१४ मध्ये इस्लामाबादच्या बैठकीत संसद भवन आणि पाकिस्तान दूरचित्रवाणी महामंडळाच्या (पीटीव्ही) कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप झाल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पीएमएल-एन सरकार पाडण्याच्या प्रयत्नात राजकारण्यांनी संसद आणि पंतप्रधान यांच्या घराकडे कूच केली होती. हा निषेध 100 दिवसांपेक्षा जास्त काळ सुरू होता.

इस्लामाबाद - दहशतवादविरोधी कोर्टाने (एटीसी) गुरुवारी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांची २०१४ च्या संसद भवन हल्ला प्रकरणात निर्दोष सुटका केली. एटीसीचे न्यायाधीश राजा जावाद अब्बास हसन यांनी हा निर्णय जाहीर केल्याची माहिती जिओ न्यूजने दिली आहे.

फेडरल सरकारच्या वकिलाने खान यांच्या निर्दोषतेसाठी याचिका दाखल केली होती. सरकारी वकिलांनी शेवटच्या सुनावणीच्या वेळी हा खटला राजकीय कारणावरून चालवण्यात आला असून त्यामुळे "कोर्टाचा वेळ वाया जाईल" असा युक्तिवाद केला होता.

न्यायाधीशांनी आपला वकील अब्दुल्ला बाबर अवान यांच्यामार्फत कोर्टाला माहिती दिली होती की फिर्यादी हा दोषमुक्त होण्याच्या बाजूने आहेत. राष्ट्रपतीपदाची धुरा सांभाळल्यामुळे राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याविरूद्धची कारवाई थांबविण्याचाही निर्णय कोर्टाने घेतला.

या केसप्रकरणी कोर्टाने आणखी काही जणांवर दोषारोपपत्र दाखल केले आहेत. ज्यात परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी, संरक्षणमंत्री परवेझ खट्टक, शिक्षणमंत्री शफकत मेहमूद, आणि नियोजनमंत्री असद उमर, तसेच पक्षाचे प्रख्यात नेते अलीम खान आणि त्यांचे माजी निकटवर्तीय प्रीमियर, जहांगीर खान तारीन यांचीही नावे ठेवण्याचा निर्णय कोर्टाने घेतला.

जिओ न्यूजच्या अहवालानुसार, ऑगस्ट २०१४ मध्ये इस्लामाबादच्या बैठकीत संसद भवन आणि पाकिस्तान दूरचित्रवाणी महामंडळाच्या (पीटीव्ही) कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप झाल्यानंतर पंतप्रधान इम्रान खान आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर दहशतवादविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पीएमएल-एन सरकार पाडण्याच्या प्रयत्नात राजकारण्यांनी संसद आणि पंतप्रधान यांच्या घराकडे कूच केली होती. हा निषेध 100 दिवसांपेक्षा जास्त काळ सुरू होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.