ETV Bharat / entertainment

Kangana Ranaut on Salman's security : भारतात समस्या आहे म्हणणाऱ्या सलमानला कंगनाने लगावला टोला, म्हणाली...

author img

By

Published : May 1, 2023, 10:14 AM IST

सलमान खानने अनेक जीवे मारण्याच्या धमक्यांचा सामना कसा केला हे उघड केल्यानंतर, कंगना राणौत म्हणाली की काळजी करण्याचे काही कारण नाही. कारण सलमानला सरकारने सुरक्षा दिली आहे.

सलमानच्या सुरक्षेबाबत कंगना रणौत
सलमानच्या सुरक्षेबाबत कंगना रणौत

मुंबई - सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या संदर्भात अभिनेत्री कंगना रणौतने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षित हातात आहे आणि त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही', असे कंगना उत्तराखंडमधील हरिद्वार येथे म्हणाली.

कंगनाची प्रतिक्रिया - अभिनेत्री कंगना रणौत म्हणाली, 'आम्ही कलाकार आहोत. सलमान खानला केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून संरक्षण मिळत आहे. त्यामुळे त्याला घाबरण्यासारखे काही कारण नाही.' अभिनेत्री कंगना पुढे म्हणाली, 'जेव्हा मला धमकावण्यात आले, तेव्हा मला सरकारने सुरक्षाही दिली होती, आज देश सुरक्षित हातात आहे. आम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही.'

काय म्हणाला होता सलमान खान? - कंगनाची ही प्रतिक्रिया वरवर पाहता सलमानच्या एका टीव्ही शोमध्ये अलीकडील वक्तव्या संदर्भात आहे, जिथे तो जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दल बोलला होता. जीवे मारण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानला मुंबई पोलिसांनी वाय प्लस श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. शनिवारी, सलमानने त्याचा अनुभव आणि तो कसा हाताळत आहे हे सांगितले आणि उपहासाने म्हटले: 'दुबई पूर्णपणे सुरक्षित आहे, भारतात समस्या आहे.' 57 वर्षीय अभिनेता सलमान पुढे म्हणाला, 'सुरक्षा ही असुरक्षिततेपेक्षा चांगली आहे. एक गंभीर धोका आहे, म्हणूनच सुरक्षा आहे'.

सलमान खानला वाय प्लस सुरक्षा - धोक्याच्या जाणिवेचे मूल्यांकन केल्यानंतर खानला मुंबई पोलिसांनी वाय प्लस ( Y+ ) श्रेणी सुरक्षा प्रदान केली आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचे पत्र मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुपरस्टारसाठी सुरक्षा एस्कॉर्ट नियुक्त केले.

वर्कफ्रंटवर सलमान आणि कंगना - कामाच्या आघाडीवर, कंगना आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटातून स्वतंत्रपणे दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. ती तेजस, मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा, चंद्रमुखी 2, आणि द इनकारनेशन: सीता या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. सलमानबद्दल सांगायचे तर, तो यावर्षी ईदच्या दरम्यान किसी का भाई किसी की जानसह मोठ्या पडद्यावर परतला ज्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा - Rishi Kapoor Death Anniversary : नीतू कपूर, मुलगी रिद्धिमा कपूर यांनी दिवंगत ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर केले फोटो...

मुंबई - सलमान खानला जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्याच्या संदर्भात अभिनेत्री कंगना रणौतने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 'देश पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सुरक्षित हातात आहे आणि त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही', असे कंगना उत्तराखंडमधील हरिद्वार येथे म्हणाली.

कंगनाची प्रतिक्रिया - अभिनेत्री कंगना रणौत म्हणाली, 'आम्ही कलाकार आहोत. सलमान खानला केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून संरक्षण मिळत आहे. त्यामुळे त्याला घाबरण्यासारखे काही कारण नाही.' अभिनेत्री कंगना पुढे म्हणाली, 'जेव्हा मला धमकावण्यात आले, तेव्हा मला सरकारने सुरक्षाही दिली होती, आज देश सुरक्षित हातात आहे. आम्हाला काळजी करण्याची काहीच गरज नाही.'

काय म्हणाला होता सलमान खान? - कंगनाची ही प्रतिक्रिया वरवर पाहता सलमानच्या एका टीव्ही शोमध्ये अलीकडील वक्तव्या संदर्भात आहे, जिथे तो जीवे मारण्याच्या धमक्यांबद्दल बोलला होता. जीवे मारण्याच्या धमकीच्या पार्श्वभूमीवर सलमान खानला मुंबई पोलिसांनी वाय प्लस श्रेणीची सुरक्षा प्रदान केली आहे. शनिवारी, सलमानने त्याचा अनुभव आणि तो कसा हाताळत आहे हे सांगितले आणि उपहासाने म्हटले: 'दुबई पूर्णपणे सुरक्षित आहे, भारतात समस्या आहे.' 57 वर्षीय अभिनेता सलमान पुढे म्हणाला, 'सुरक्षा ही असुरक्षिततेपेक्षा चांगली आहे. एक गंभीर धोका आहे, म्हणूनच सुरक्षा आहे'.

सलमान खानला वाय प्लस सुरक्षा - धोक्याच्या जाणिवेचे मूल्यांकन केल्यानंतर खानला मुंबई पोलिसांनी वाय प्लस ( Y+ ) श्रेणी सुरक्षा प्रदान केली आहे. सलमान खानला लॉरेन्स बिश्नोई टोळीकडून धमकीचे पत्र मिळाल्यानंतर महाराष्ट्र सरकारने सुपरस्टारसाठी सुरक्षा एस्कॉर्ट नियुक्त केले.

वर्कफ्रंटवर सलमान आणि कंगना - कामाच्या आघाडीवर, कंगना आगामी 'इमर्जन्सी' या चित्रपटातून स्वतंत्रपणे दिग्दर्शनात पदार्पण करणार आहे. ती तेजस, मणिकर्णिका रिटर्न्स: द लीजेंड ऑफ दिड्डा, चंद्रमुखी 2, आणि द इनकारनेशन: सीता या चित्रपटांमध्ये देखील दिसणार आहे. सलमानबद्दल सांगायचे तर, तो यावर्षी ईदच्या दरम्यान किसी का भाई किसी की जानसह मोठ्या पडद्यावर परतला ज्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा - Rishi Kapoor Death Anniversary : नीतू कपूर, मुलगी रिद्धिमा कपूर यांनी दिवंगत ऋषी कपूर यांच्या पुण्यतिथीनिमित्त शेअर केले फोटो...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.