ETV Bharat / elections

आतापर्यंत फक्त काँग्रेसच्या चेल्या-चपाट्यांची गरिबी हटली - गडकरी

गडकरी म्हणाले, की देशातील सर्व पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर पालिका, महापालिका, दिल्ली आणि मुंबई सगळीकडची सत्ता काँग्रेसकडे होती. काँग्रेसच्या काळात त्यांच्या नेत्यांनी आणि चेल्याचपाट्यांनी वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, वेगवेगळ्या संस्था मिळवल्या.

author img

By

Published : Apr 16, 2019, 11:10 AM IST

नितीन गडकरी

अमरावती - इंदिरा गांधी यांच्यापासून गरिबी हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजीव आणि सोनिया गांधी यांनी देखील गरिबी हटावची भाषा केली. गेल्या ७२ वर्षात देशाची गरिबी तर हटली नाही. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची गरिबी हटली. असे म्हणून भाजप नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते अमरावती येथे बोलत होते.

अमरावतीच्या सभेत बोलताना नितीन गडकरी

गडकरी म्हणाले, की देशातील सर्व पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर पालिका, महापालिका, दिल्ली आणि मुंबई सगळीकडची सत्ता काँग्रेसकडे होती. काँग्रेसच्या काळात त्यांच्या नेत्यांनी आणि चेल्याचपाट्यांनी वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, वेगवेगळ्या संस्था मिळवल्या. यातून त्यांची गरिबी हटली. पण, देशातील सर्वसमान्य माणूस, दलित, मुस्लिम समाज मागास राहिला. त्यामुळे ही निवडणूक सर्वसामान्यांच्या भवितव्याचा निर्णय करण्याची आहे.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार देशात आल्यावर खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत अशी भीती काँग्रेस दलित आणि मुस्लिमांना दाखवत आहेत. वास्तवात आमच्या सरकारने देशात सर्वाधिक जनहिताच्या योजना आणल्या. या योजनांचा लाभ देताना कधीही कोणाची जात किंवा धर्म पाहिला नाही. आज देशाच्य विकासासोबत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. देशाच्या हितासाठी मोदी हेच सक्षम पर्याय असल्याचे गडकरी म्हणाले.

अमरावती - इंदिरा गांधी यांच्यापासून गरिबी हटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राजीव आणि सोनिया गांधी यांनी देखील गरिबी हटावची भाषा केली. गेल्या ७२ वर्षात देशाची गरिबी तर हटली नाही. पण, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची गरिबी हटली. असे म्हणून भाजप नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ते अमरावती येथे बोलत होते.

अमरावतीच्या सभेत बोलताना नितीन गडकरी

गडकरी म्हणाले, की देशातील सर्व पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर पालिका, महापालिका, दिल्ली आणि मुंबई सगळीकडची सत्ता काँग्रेसकडे होती. काँग्रेसच्या काळात त्यांच्या नेत्यांनी आणि चेल्याचपाट्यांनी वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, वेगवेगळ्या संस्था मिळवल्या. यातून त्यांची गरिबी हटली. पण, देशातील सर्वसमान्य माणूस, दलित, मुस्लिम समाज मागास राहिला. त्यामुळे ही निवडणूक सर्वसामान्यांच्या भवितव्याचा निर्णय करण्याची आहे.

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील सरकार देशात आल्यावर खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोत अशी भीती काँग्रेस दलित आणि मुस्लिमांना दाखवत आहेत. वास्तवात आमच्या सरकारने देशात सर्वाधिक जनहिताच्या योजना आणल्या. या योजनांचा लाभ देताना कधीही कोणाची जात किंवा धर्म पाहिला नाही. आज देशाच्य विकासासोबत अंतर्गत आणि बाह्य सुरक्षेसाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. देशाच्या हितासाठी मोदी हेच सक्षम पर्याय असल्याचे गडकरी म्हणाले.

Intro:गरिबी हटाविण्याचे प्रयत्न देशाचे पाहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून सुरू झालेत.इंदिरा गांधी यांनी 20 कलमी, 40 कलमी,60 कलमी कार्यक्रम आखून गरिबी हत्वचा नारा दिला. राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांनीही गरिबी हटविण्याचे प्रयत्न करू अशी भाषा बोलली. आज नेहरूंनाचे पणतू राहुल गांधी पुन्हा एकदा गरिबी हटऊ म्हणताहेत. वास्तवात 72 वर्षाच्या देशात केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या चेल्याचपट्यांची गरिबी हटली अशी टीका केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नियीन गडकरी यांनी अमरावतीत आयोजित जाहीर सभेत केली.


Body:भाजप- शिवसेना आणि रिपाइं महायुतीचे उमेदवार आनंदराव अडसूळ यांच्या प्रचारनिमित्त अमरावतीच्या दसरा मैदान येथे नितीन गडकरी यांनी आज जाहीर सभेला समबोधित केले. यावेळी आनंदराव अडसूळ, वर्ध्याचे खासदार रामदास तडस आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार प्रकाश भरसकळे,माजी खासदार अनंत गुढे, आमदार श्रीकांत देशपांडे, माजी आमदार अरुण अडसड आदी उपस्थिय होते.
सभेला समबोधित करताना गडकरी म्हणाले, देशात सर्व पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर पालिका, महापालिका, दिल्ली आणि मुंबई सारं काही कंग्रेसकडे होते. कंग्रेसच्या काळात त्यांचे नेते आणि चिल्याचपाट्यांना वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविदयलाय, विविध महाविद्यालय मिळालेत. त्या माध्यमातून त्यांची गरिबी हटली. देशातील सर्वदांनी माणूस, दलित, मुस्लिम घटक आहे तसाच मागास राहिला. यामुळे ही निवडणूक राजकीय पक्षांनाच्या भवितव्याची नव्हे तर, सर्वसमन्यांच्या भवितव्याचा निर्णय करण्याची आहे. त्यामुळे आज देशाला मजबूर नव्हे तर मजबूत सरकारची गरज असल्याचर नितीन गडकरी म्हणाले.
नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार देशात आल्यावर खऱ्या अर्थाने विकासाला सुरुवात झाली आहे. आम्ही हिंदुत्ववादी आहोय अशी भीती काँग्रेस दलित आणि मुस्लिमांना दाखवते. वास्तवात आमच्या सरकारने देशात सर्वाधिक जनहिताच्या योजना आणल्या. या योजनांचा लाभ देताना कधीही कोणाची जात किंवा धर्म पाहिला गेला नाही हे वस्तभ आहे.आज देशाच्या विकासासोबतच अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी कणखर नेतृत्वाची गरज आहे. देशाच्या होतासाठी मोदी हेच सक्षम पर्याय असल्याचे गडकरी म्हणालेत.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.