ETV Bharat / elections

तुम्हाला 'मजबूर' पंतप्रधान पाहिजे की, 'मजबूत' पंतप्रधान - नितीन गडकरी

पश्चिम घाटातून वाहून जाणारे पाणी नद्यांमध्ये आणणार आहोत. ही ४० हजार कोटींची योजना असून, ते पाणी जायकवाडीला देण्याचे नियोजन होईल. डीपीआर तयार आहे, कॅनॉल ऐवजी पाईपलाईनने ते पाणी द्यायचा विचार आहे. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, असे गडकरी म्हणाले.

author img

By

Published : Apr 20, 2019, 3:27 PM IST

नितीन गडकरी

औरंगाबाद - दहशतवाद्यांसमोर घुडघे टेकणारा 'मजबूर' पंतप्रधान पाहिजे, की दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणारा 'मजबूत' पंतप्रधान पाहिजे, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना विचारला. जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांची पैठण तालुक्यात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

औरंगाबादच्या सभेत नितीन गडकरी


आम्ही गंगा स्वच्छ केली नसती तर प्रियंका मॅडम तुम्हाला प्यायला पाणी मिळाले असत का? आज पाण्यावरची वाहतूक तयार केली म्हणूनच तुम्हाला वाराणसीला बोटीतून जाता आले, असे म्हणत नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, आम्ही अनेक योजना लागू केल्या. उज्वला गॅस योजना असो, की आयुष्यमान योजना असो, कधी जात बघून लाभ दिला नाही. तर मतदान देताना जात का पाहता असा प्रश्न नितीन गडकरी यांनी मतदारांना केला.


पश्चिम घाटातून वाहून जाणारे पाणी नद्यांमध्ये आणणार आहोत. ही ४० हजार कोटींची योजना असून, ते पाणी जायकवाडीला देण्याचे नियोजन होईल. डीपीआर तयार आहे, कॅनॉल ऐवजी पाईपलाईनने ते पाणी द्यायचा विचार आहे. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, असे गडकरी म्हणाले. अर्धवट रखडलेले प्रकल्प केंद्राची मदत घेऊन पूर्ण करू, असे आश्वासन गडकरींनी दिले.


मराठवाड्यासह देशात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे नदीजोड प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी ६० हजार कोटींची योजना असून ४० टक्क्यांपर्यंत सिंचन वाढणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी सभेत दिली. काँग्रेस नेहमी 'गरिबी हटाव'चा नारा देत आहे. माझ्या विभागात झालेल्या कामात एकही भ्रष्टाचार झाला नाही. रस्त्यावर २०० वर्षे खड्डा पडणार नाही, असे काम कल्याचे देखील गडकरी यांनी पैठणच्या सभेत सांगत भाजपला मत देण्याचे आवाहन मतदारांना केले.

औरंगाबाद - दहशतवाद्यांसमोर घुडघे टेकणारा 'मजबूर' पंतप्रधान पाहिजे, की दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देणारा 'मजबूत' पंतप्रधान पाहिजे, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थितांना विचारला. जालना लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांची पैठण तालुक्यात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.

औरंगाबादच्या सभेत नितीन गडकरी


आम्ही गंगा स्वच्छ केली नसती तर प्रियंका मॅडम तुम्हाला प्यायला पाणी मिळाले असत का? आज पाण्यावरची वाहतूक तयार केली म्हणूनच तुम्हाला वाराणसीला बोटीतून जाता आले, असे म्हणत नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर टीका केली. ते म्हणाले की, आम्ही अनेक योजना लागू केल्या. उज्वला गॅस योजना असो, की आयुष्यमान योजना असो, कधी जात बघून लाभ दिला नाही. तर मतदान देताना जात का पाहता असा प्रश्न नितीन गडकरी यांनी मतदारांना केला.


पश्चिम घाटातून वाहून जाणारे पाणी नद्यांमध्ये आणणार आहोत. ही ४० हजार कोटींची योजना असून, ते पाणी जायकवाडीला देण्याचे नियोजन होईल. डीपीआर तयार आहे, कॅनॉल ऐवजी पाईपलाईनने ते पाणी द्यायचा विचार आहे. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही, असे गडकरी म्हणाले. अर्धवट रखडलेले प्रकल्प केंद्राची मदत घेऊन पूर्ण करू, असे आश्वासन गडकरींनी दिले.


मराठवाड्यासह देशात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई आहे. त्यामुळे नदीजोड प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यासाठी ६० हजार कोटींची योजना असून ४० टक्क्यांपर्यंत सिंचन वाढणार आहे, अशी माहिती नितीन गडकरी यांनी सभेत दिली. काँग्रेस नेहमी 'गरिबी हटाव'चा नारा देत आहे. माझ्या विभागात झालेल्या कामात एकही भ्रष्टाचार झाला नाही. रस्त्यावर २०० वर्षे खड्डा पडणार नाही, असे काम कल्याचे देखील गडकरी यांनी पैठणच्या सभेत सांगत भाजपला मत देण्याचे आवाहन मतदारांना केले.

Intro:आतंकवाद्या समोर घुडगे टेकणार मजबूर पंतप्रधान पाहिजे की आतंकवादयांना सडेतोड देणारा मजबूत पंतप्रधान पाहिजे, असा प्रश्न केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी उपस्थित केला. Body:जालना लोकसभा मतदार संघाचे उमेदवार आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या प्रचारासाठी नितीन गडकरी यांची पैठण तालुक्यात जाहीर सभा घेण्यात आली. या सभेत त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली.Conclusion:आम्ही गंगा स्वच्छ केली नसती तर प्रियंका मॅडम तुम्हाला प्यायला पाणी मिळालं असत का? आज पाण्यावरची वाहतूक तयार केली म्हणूनच तुम्हाला वाराणसीला बोटीत जाता आले ना असा प्रश्न नितीन गडकरी यांनी उपस्थित करत, काँग्रेसचं जातीवाद करत असल्याची टीका केली. आम्ही अनेक योजना लागू केल्या, उज्वला गॅस योजना असो की आरोग्य दायी योजना कधी जात बघुन लाभ दिला नाही. तर मतदान देताना जात का पाहता असा प्रश्न नितीन गडकरी यांनी मतदारांना केला. पश्चिम घाटातून वाहून जाणार पाणी नद्यांमध्ये आणणार आहोत, 40 हजार कोटींची योजना असून ते पाणी जायकवाडीला देण्याचं नियोजन होईल, डीपीआर तयार आहे, कॅनॉल ऐवजी पाईपलाईनने ते पाणी द्यायचा विचार आहे. मराठवाड्यातील पाण्याचा प्रश्न सोडवल्याशिवाय राहणार नाही. अर्धवट रखडलेली प्रकल्प केंद्राची मदत घेऊन पूर्ण करू, मराठवाड्यासह देशात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई आहे त्यामुळे नदीजोड प्रकल्प हाती घेतलेत, त्यासाठी 60 हजार कोटींची असून 40 टक्क्यांपर्यंत सिंचन वाढणार आहे. अशी माहिती नितीन गडकरी यांनी सभेत दिली. काँग्रेस नेहमी गरिबी हटावचा नारा देत आहेत, पुन्हा भूलथापा मारत आहे, मागच्या 70 वर्षात गरिबी हटली नाही, गरिबी त्यांच्या चलेचपट्यांची हटली आहे. असा टोला देखील नितीन गडकरी यांनी काँग्रेसला लगावला. माझ्या विभागात झालेल्या कामात एकही भ्रष्टाचार झाला नाही, रस्त्यावर 200 वर्ष खड्डा पडणार नाही असे काम कल्याच देखील गडकरी यांनी पैठणच्या सभेत सांगत भाजपला मत देण्याचं आवाहन मतदारांना केलं.

Byte - नितीन गडकरी - भाजप नेते तथा केंद्रीय मंत्री
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.