ETV Bharat / city

'बुलेट ट्रेनला विरोध म्हणजे ठाणे महापालिकेला सुचलेली दुर्बुद्धी'

author img

By

Published : Dec 26, 2020, 10:08 PM IST

बुलेट ट्रेनच्या ठाण्यातून जाणाऱ्या मौजे शिळ मार्गावरील काही गावांमधील शेतकऱ्यांना ७० टक्के मोबदला मिळाला असताना ठाणे महापालिकेला आताच दुर्बुद्धी सुचली, असा आरोप येथील भूधारक शेतकरी करीत आहेत.

thane
thane

ठाणे - केंद्र सरकारच्या महात्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा देण्याचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करून ठाणे महापालिकेतीत सत्ताधारी शिवसेनेने खोडा घातल्याने याचे पडसाद आता जनमानसात उमटु लागले आहेत. बुलेट ट्रेनच्या ठाण्यातून जाणाऱ्या मौजे शिळ मार्गावरील काही गावांमधील शेतकऱ्यांना ७० टक्के मोबदला मिळाला असताना ठाणे महापालिकेला आताच दुर्बुद्धी सुचली, असा आरोप येथील भूधारक शेतकरी करीत असून शिवसेना एकीकडे शेतकऱ्यांचे हित हवे आहे म्हणते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम करीत असल्याच्या संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

भूसंपादन योग्य मोबदला देऊन सुरू

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मुंबई अहमदाबाद हायस्पीड (बुलेट) ट्रेन हा प्रकल्प उभारला जात आहे. ठाणे, भिवंडी तालुक्यातील भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मुंबईपासून भूमिगत असलेला हा प्रकल्प शिळफाटा इथून उंच पुलावरून मार्गक्रमण करणार असून यासाठी मौजे शीळ सोबत डवले, पडले, माथर्डी, देसाई, आगासन आणि बेटावदे या गावांमधील जमिनीचे भूसंपादन योग्य मोबदला देऊन सुरू आहे. या प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेची जागा मिळवण्यासाठी महसूल विभागाकडून पत्रव्यवहार केल्याने त्या अनुशंगाने प्रशासनाकडून सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव दाखल केला होता. ठाणे महापालिकेच्या शीळ येथील ३ हजार ८४९ चौ. मी. जागेसाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून ६ कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मोबदला निश्चित करण्यात आला. तसा प्रस्ताव जानेवारी महिन्यापासून सातत्याने सर्वसाधारण सभेसमोर आणूनही शिवसेनेने या प्रकल्पास विरोध दर्शवत बुलेट प्रकल्पास जागा देण्याचा प्रस्ताव रोखून धरला होता. आता डिसेंबरमधील सर्वसाधारण सभेमध्ये चर्चाही न करता हा प्रस्तावच दफ्तरी दाखल करून शिवसेनेने खोडा घातल्याने या भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत.

'आमच्या पोटावर लाथ का मारता?'

शासनाच्या अखत्यारीतील १०० टक्के जागांचे भूसंपादन झाले असून ४५ टक्के खासगी जमिनीदेखील दिल्या आहेत. ठाणे महापालिका व इतर प्राधिकरणांच्या जमिनीही नॅशनल हायस्पीड योग्य मोबदला देऊन घेत आहे. असे असताना ठाणे महापालिकेने विरोध करून काय मिळवले, असा सवाल शेतकरी करीत आहेत. बुलेट ट्रेन झाली तरच या गावाचा आणि आमचाही विकास होईल. अन्यथा मिळणारा मोबदलाही रद्द होईल, अशी भीती व्यक्त करून शेतकऱ्यांनी आता आमच्या पोटावर लाथ का मारता, असा सवाल केला आहे.

ठाणे - केंद्र सरकारच्या महात्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी जागा देण्याचा प्रस्ताव दफ्तरी दाखल करून ठाणे महापालिकेतीत सत्ताधारी शिवसेनेने खोडा घातल्याने याचे पडसाद आता जनमानसात उमटु लागले आहेत. बुलेट ट्रेनच्या ठाण्यातून जाणाऱ्या मौजे शिळ मार्गावरील काही गावांमधील शेतकऱ्यांना ७० टक्के मोबदला मिळाला असताना ठाणे महापालिकेला आताच दुर्बुद्धी सुचली, असा आरोप येथील भूधारक शेतकरी करीत असून शिवसेना एकीकडे शेतकऱ्यांचे हित हवे आहे म्हणते आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पोटावर लाथ मारण्याचे काम करीत असल्याच्या संतप्त भावना शेतकरी व्यक्त करीत आहेत.

भूसंपादन योग्य मोबदला देऊन सुरू

नॅशनल हायस्पीड रेल कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मुंबई अहमदाबाद हायस्पीड (बुलेट) ट्रेन हा प्रकल्प उभारला जात आहे. ठाणे, भिवंडी तालुक्यातील भूसंपादन प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. मुंबईपासून भूमिगत असलेला हा प्रकल्प शिळफाटा इथून उंच पुलावरून मार्गक्रमण करणार असून यासाठी मौजे शीळ सोबत डवले, पडले, माथर्डी, देसाई, आगासन आणि बेटावदे या गावांमधील जमिनीचे भूसंपादन योग्य मोबदला देऊन सुरू आहे. या प्रकल्पासाठी ठाणे महापालिकेची जागा मिळवण्यासाठी महसूल विभागाकडून पत्रव्यवहार केल्याने त्या अनुशंगाने प्रशासनाकडून सर्वसाधारण सभेमध्ये प्रस्ताव दाखल केला होता. ठाणे महापालिकेच्या शीळ येथील ३ हजार ८४९ चौ. मी. जागेसाठी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशनकडून ६ कोटी ९२ लाख ८२ हजार रुपये मोबदला निश्चित करण्यात आला. तसा प्रस्ताव जानेवारी महिन्यापासून सातत्याने सर्वसाधारण सभेसमोर आणूनही शिवसेनेने या प्रकल्पास विरोध दर्शवत बुलेट प्रकल्पास जागा देण्याचा प्रस्ताव रोखून धरला होता. आता डिसेंबरमधील सर्वसाधारण सभेमध्ये चर्चाही न करता हा प्रस्तावच दफ्तरी दाखल करून शिवसेनेने खोडा घातल्याने या भागातील शेतकरी संतप्त झाले आहेत.

'आमच्या पोटावर लाथ का मारता?'

शासनाच्या अखत्यारीतील १०० टक्के जागांचे भूसंपादन झाले असून ४५ टक्के खासगी जमिनीदेखील दिल्या आहेत. ठाणे महापालिका व इतर प्राधिकरणांच्या जमिनीही नॅशनल हायस्पीड योग्य मोबदला देऊन घेत आहे. असे असताना ठाणे महापालिकेने विरोध करून काय मिळवले, असा सवाल शेतकरी करीत आहेत. बुलेट ट्रेन झाली तरच या गावाचा आणि आमचाही विकास होईल. अन्यथा मिळणारा मोबदलाही रद्द होईल, अशी भीती व्यक्त करून शेतकऱ्यांनी आता आमच्या पोटावर लाथ का मारता, असा सवाल केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.