ठाणे - असा दिवस कधी पाहिला नाही ना कधी अनुभवला देखील नाही. युद्धजन्य परिस्थितीत नितिष कुमारचे हे शब्द आहेत जे काळजाला लागून जातात. (Bomb blast in Kharkiv city) नितिष कुमार हा शिक्षण घेण्यासाठी खार्कीव्ह शहरामध्ये गेला असताना युद्धजन्य परिस्थितीत या शहरातून परतण्यासाठी अनेक पर्याय आणि अनेक मार्ग अवलंबत होता. परंतु, हे सर्व मार्ग ठप्प झाले असल्याने नितीश कुमारला आपल्या मायदेशी परत येण्यासाठी मोठे कष्ट करावे लागत आहेत. त्यात शेकडो विद्यार्थ्यांना आज तिथल्या मेट्रो स्थानकात स्थानिकांकडून मारहाणही झाली आहे.
रेल्वेमध्ये फक्त युक्रेन नागरिकांनाच प्रवेश देण्यात येत आहे
आजच भारतीय दूतावासाने खार्कीव्ह शहरातील विद्यार्थ्यांना शहर सोडण्याचे आदेश दिल्यानंतर जवळपास चारशे भारतीय विद्यार्थी हे खाजगी वाहनाने आणि पायी चालत तेथील शहरातून जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करत होते. (Bomb blast in Kharkiv) सकाळीच ते सर्व विद्यार्थी खार्कीव्ह येथील रेल्वे स्थानकावर गेल्यानंतर रेल्वेची प्रतीक्षा होती. परंतु रेल्वे आल्यानंतर देखील तेथे भारतीय विद्यार्थ्यांवर अन्याय झाला. रेल्वेमध्ये फक्त युक्रेन नागरिकांनाच प्रवेश देण्यात येत आहे. त्यामुळे जो मार्ग मिळेल त्या मार्गाने खार्कीव्ह सोडण्यासाठी या विद्यार्थ्यांची धडपड सुरू आहे.
मित्रांना या सर्व परिस्थितीचा खूप मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे
नितीश कुमार यांनी त्याच्या मित्रासह रस्त्यावरून चालत आणि काही ठिकाणी गाडीचा प्रवास करत खार्कीव्ह शहराच्या बाहेर पडत आहेत. परंतु. खार्कीव्ह शहराच्या बाहेर पडत असतांना देखील तीन मोठे बॉम्ब हल्ले झाल्याचे नितीश कुमार सांगत आहे. नितीश कुमार हा आपला जीव वाचवत बॉर्डरच्या दिशेने येत असताना कुठेही गोळीबार झाला तर जवळपासच्या बंकरमध्ये जाऊन त्यांना आसरा घ्यावा लागतो असे युद्धजन्य परिस्थितीत नितीश आणि त्याच्या मित्रांना या सर्व परिस्थितीचा खूप मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे असे देखील नितीश व्हिडिओच्या माध्यमातून सांगत आहे. त्यामुळे नितेशचे कुटुंबीय मोठ्या चिंतेत आहेत.
परिस्थिमुळे घरच्यांचे अन्न त्याग
नितेश च्या युक्रेन येथील परिस्थितीवरून नितेश च्या घरच्यांची देखील परिस्थिती काही भयावह झाले आहे आणि तिच्या घरात त्याच्या आई-वडिल वास्तव्यास आहेत परंतु जिव्हा पासून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे तेव्हापासून नितेश च्या आईने जेवण देखील त्याग केला आहे नितेश घरी यावा हीच इच्छा असून भारतीय सरकारने मोठा प्रमाणात मदत तेथील भडकलेल्या विद्यार्थ्यांची करावी अशी मागणी या वेळी मी तिच्या वडिलांनी बोलून दाखवली.
हेही वाचा - Restrictions more Relaxed : राज्यातील चौदा जिल्ह्याच्या निर्बंधात आणखी शिथिलता, 'ही' ठिकाणे पूर्णतः खुली