ETV Bharat / city

ठाणे : बंदबाबत माहिती नसल्याने अनेकांची उडाली तारांबळ

author img

By

Published : Oct 12, 2021, 8:40 AM IST

Updated : Oct 12, 2021, 12:50 PM IST

लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 11) महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसैनिकांनी बससेवा बंद ठेवून ठाण्यातील बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. पण, अनेकांना बंद बद्दल माहिती नसल्याने त्यांची तारांबळ उडाली.

छायाचित्र
छायाचित्र

ठाणे - लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 11) महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसैनिकांनी बससेवा बंद ठेवून ठाण्यातील बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. पण, अनेकांना बंद बद्दल माहिती नसल्याने त्यांची तारांबळ उडाली.

बंदबाबत माहिती नसल्याने अनेकांची उडाली तारांबळ

महाराष्ट्र बंदच्या दिवशी कोणतीही पूर्व कल्पना न देता सत्ताधारी शिवसेनेने पालिकेची परिवहन सेवा बंद ठेवली. यामुळे नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांना स्थानकात गेल्यानंतर पालिकेची परिवहन सेवा बंद असल्याचे कळाले. तसेच परिवहन खात्याकडून प्रवाशांना पर्यायी व्यवस्थेने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.

काही ठिकाणी शिवसैनिकांनी दिला रिक्षाचालकांना चोप

महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर ठाण्यातील पालिकेची परिवहन सेवा तसेच बेस्ट बस सेवा बंद होती. त्यामुळे अनेकांना रिक्षावर अवलंबून रहावे लागले. अनेक रिक्षाचालकांनी प्रवाशांची आर्थिक लूट केली. काही ठिकाणी बंद झुगारून रिक्षा चालक व्यवसाय करत असल्याने शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना चोप दिला.

हेही वाचा - किरकोळ घटना वगळता दुपारपर्यत ठाणे जिल्ह्यात शांततेत बंद; शेकडो कार्यकर्त्यांनी धरपकड

ठाणे - लखीमपूर येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी (दि. 11) महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदचे आवाहन करण्यात आले होते. या बंदला महाराष्ट्रात संमिश्र प्रतिसाद मिळाला असून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात शिवसैनिकांनी बससेवा बंद ठेवून ठाण्यातील बंद यशस्वी करण्याचा प्रयत्न केला. पण, अनेकांना बंद बद्दल माहिती नसल्याने त्यांची तारांबळ उडाली.

बंदबाबत माहिती नसल्याने अनेकांची उडाली तारांबळ

महाराष्ट्र बंदच्या दिवशी कोणतीही पूर्व कल्पना न देता सत्ताधारी शिवसेनेने पालिकेची परिवहन सेवा बंद ठेवली. यामुळे नोकरीसाठी जाणाऱ्या नागरिकांना स्थानकात गेल्यानंतर पालिकेची परिवहन सेवा बंद असल्याचे कळाले. तसेच परिवहन खात्याकडून प्रवाशांना पर्यायी व्यवस्थेने प्रवास करण्याच्या सूचना देण्यात येत होत्या. त्यामुळे अनेकांना मनस्ताप सहन करावा लागला.

काही ठिकाणी शिवसैनिकांनी दिला रिक्षाचालकांना चोप

महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर ठाण्यातील पालिकेची परिवहन सेवा तसेच बेस्ट बस सेवा बंद होती. त्यामुळे अनेकांना रिक्षावर अवलंबून रहावे लागले. अनेक रिक्षाचालकांनी प्रवाशांची आर्थिक लूट केली. काही ठिकाणी बंद झुगारून रिक्षा चालक व्यवसाय करत असल्याने शिवसैनिकांनी रिक्षाचालकांना चोप दिला.

हेही वाचा - किरकोळ घटना वगळता दुपारपर्यत ठाणे जिल्ह्यात शांततेत बंद; शेकडो कार्यकर्त्यांनी धरपकड

Last Updated : Oct 12, 2021, 12:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.