ETV Bharat / city

ठाण्यात पुराने स्थलांतरित झालेल्या कुटुंबांना होणार अन्नधान्याचा वाटप; महापालिकेचा निर्णय

ठाणे शहरात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांना स्थलांतरित करण्यात आले. त्यांचा अन्नधान्याचा प्रश्न मिटावा याकरिता महापालिकेकडून स्थलांतरित कुटुंबांना अन्नधान्याची पाकिटे वाटण्यात येणार आहेत.

author img

By

Published : Aug 6, 2019, 11:00 AM IST

संग्रहित छायाचित्र

ठाणे - बारवी धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी घरात पाणी भरले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्या कुटुंबांना अन्न-धान्याची पाकिटे देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विस्थापितांना तातडीने मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, शहरातील साफसफाई, वैद्यकिय सुविधा आणि रस्ते दुरूस्ती आदि कामेही युद्धपातळीवर करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरात पाणी भरले, त्या सर्व ठिकाणच्या नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, डॅाक्सीसायक्लीन गोळ्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करून देणे, पाण्याचा निचरा झाल्यानंतर तेथील चिखल, कचरा तत्काळ उचलणे तसेच या सर्व ठिकाणी फवारणी करणे आदी कामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे.

दरम्यान, स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांना ५ किलो गहू, ३ किलो तांदूळ, १ किलो साखर, २ किलो बटाटे, १ लिटर खाद्यतेल आणि १ ब्लँकेट पुरविण्यात येणार आहेत. यासंदर्भात आयुक्त जयस्वाल यांनी स्थानिक आमदार, नगरसेवक यांच्याशी समन्वय साधून ही मदत देण्यात यावी, अशा सूचनाही केल्या आहेत.

ठाणे - बारवी धरणातून अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने अनेक ठिकाणी घरात पाणी भरले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे. त्या कुटुंबांना अन्न-धान्याची पाकिटे देण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे.

ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विस्थापितांना तातडीने मदत देण्यात येणार आहे. दरम्यान, शहरातील साफसफाई, वैद्यकिय सुविधा आणि रस्ते दुरूस्ती आदि कामेही युद्धपातळीवर करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर जयस्वाल यांनी सर्व अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरात पाणी भरले, त्या सर्व ठिकाणच्या नागरिकांसाठी आरोग्य शिबिरांचे आयोजन करणे, डॅाक्सीसायक्लीन गोळ्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करून देणे, पाण्याचा निचरा झाल्यानंतर तेथील चिखल, कचरा तत्काळ उचलणे तसेच या सर्व ठिकाणी फवारणी करणे आदी कामे युद्धपातळीवर करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहे.

दरम्यान, स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांना ५ किलो गहू, ३ किलो तांदूळ, १ किलो साखर, २ किलो बटाटे, १ लिटर खाद्यतेल आणि १ ब्लँकेट पुरविण्यात येणार आहेत. यासंदर्भात आयुक्त जयस्वाल यांनी स्थानिक आमदार, नगरसेवक यांच्याशी समन्वय साधून ही मदत देण्यात यावी, अशा सूचनाही केल्या आहेत.

Intro:पावसाच्या पाण्यामुळे स्थलांतरित केलेल्या कुटुंबियाना महापालिकेतर्फे मोफत अन्न-धान्य

पालकमंत्र्यांशी चर्चेनंतर मानवतेच्या दृष्टीकोनातून आयुक्तांचा निर्णय

साफसफाई, वैद्यकिय सुविधांना प्राधान्य-रस्ते दुरूस्ती युद्धपातळीवर करण्याचे निर्देशBody:



गेले दोन पडत असलेला मुसळधार पाऊस, बारवी धरणातून सोडलेले अतिरिक्त पाणी यामुळे ज्या ठिकाणी घरात पाणी भरल्याने तेथील नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले आहे त्या कुटुंबियांना मानवतेच्या दृष्टीकोनातून अन्न-धान्याची पाकिटे देण्याचा महत्वाचा निर्णय महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी घेतला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशीही चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असून विस्थापितांना तातडीने ही मदत देण्यात येणार आहे. दरम्यान शहरातील साफसफाई, वैद्यकिय सुविधा, रस्ते दुरूस्ती आदी कामे युद्धपातळीवर करण्याचे निर्देशही जयस्वाल यांनी सर्व अधिका-यांना दिले.
दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज जयस्वाल यांनी सर्व अधिका-यांची तातडीची बैठक घेवून आज तातडीने करावयाच्या कामांच्या सूचना दिल्या. यामध्ये ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरात पाणी भरले होते त्या सर्व ठिकाणा नागरिकांना तातडीने वैद्यकिय सुविधा देण्यासाठी त्या त्या परिसरामध्ये आरोग्य शिबीरांचे आयोजन करणे, डॅाक्सीसायक्लीन गोळ्या सर्व आरोग्य केंद्रामध्ये उपलब्ध करून देणे, पाण्याचा निचरा झाल्यानंतर तेथील चिखल, कचरा तात्काळ उचलणे तसेच या सर्व ठिकाणी फवारणी करणे आदी कामे युद्ध पातळीवर करण्याच्या सूचना त्यांनी सर्व संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.
दरम्यान या अतिवृष्टीमध्ये शहरात ज्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबियाना ५ किलो गहू, ३ किलो तांदूळ, १ किलो साखर, २ किलो बटाटे, १ लिटर खाद्यतेल आणि १ ब्लँकेट पुरविण्यात येणार आहेत. यासंदर्भात श्री. जयस्वाल यांनी स्थानिक आमदार, नगरसेवक यांच्याशी समन्वय साधून ही मदत देण्यात यावी अशा सूचनाही दिल्या आहेत.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.