ETV Bharat / city

Fire cloth factory At Bhiwandi : भिवंडीत पुन्हा अग्नीतांडव, बंद कपड्याच्या कंपनीत लागली आग - Fire cloth factory At Bhiwandi

एका बंद कपड्याच्या कंपनीत आग लागल्याने खळबळ उडाली. (Fire cloth factory At Bhiwandi ) या आगीत कंपनीतील करोडो रुपयाचा ऐवज जळून खाक झाला.

Massive Fire Broke Out In Bhiwandi
बंद कपड्याच्या कंपनीत लागली आग
author img

By

Published : Jan 17, 2022, 8:43 AM IST

Updated : Jan 17, 2022, 10:14 AM IST

ठाणे - भिवंडीत आगीचे सत्र सुरूच असून आज पहाटेच्या सुमारास शहरातील काजी कंपाऊंड परिसरामध्ये असलेल्या एका यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. (Fire cloth factory At Bhiwandi ) भिवंडीतील काजी कंपाऊंडमध्ये हा (Fire cloth factory At Bhiwandi ) यंत्रमाग कारखाना असून या कारखान्यात कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा साठवून ठेवण्यात आला आहे. तर, कारखान्याच्या आजूबाजूला सुमारे ४० ते ५० रहिवाशी घरे आहेत.

व्हिडिओ

परिसरातील वीजपुरवठा खंडित

आग लागतच रहिवासी परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही आग एवढी भीषण आहे की कारखानाच्या छताचे पत्रे तुटून हवेत उडत होते. त्यामुळे आजूबाजू राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, खबदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. शिवाय पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.

आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी २ तास लागणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र, आगीचे कारण अद्यापही समोर आले नसून आतापर्यत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.

हेही वाचा - BJP Yuvati Morcha Agitation : भाजप युवती मोर्चाचे उदय सामंत यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन

ठाणे - भिवंडीत आगीचे सत्र सुरूच असून आज पहाटेच्या सुमारास शहरातील काजी कंपाऊंड परिसरामध्ये असलेल्या एका यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. (Fire cloth factory At Bhiwandi ) भिवंडीतील काजी कंपाऊंडमध्ये हा (Fire cloth factory At Bhiwandi ) यंत्रमाग कारखाना असून या कारखान्यात कपड्यांचा मोठ्या प्रमाणात साठा साठवून ठेवण्यात आला आहे. तर, कारखान्याच्या आजूबाजूला सुमारे ४० ते ५० रहिवाशी घरे आहेत.

व्हिडिओ

परिसरातील वीजपुरवठा खंडित

आग लागतच रहिवासी परिसरात एकच खळबळ उडाली होती. ही आग एवढी भीषण आहे की कारखानाच्या छताचे पत्रे तुटून हवेत उडत होते. त्यामुळे आजूबाजू राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, खबदारीचा उपाय म्हणून परिसरातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. शिवाय पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली होती.

आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु

या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी आणखी २ तास लागणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. मात्र, आगीचे कारण अद्यापही समोर आले नसून आतापर्यत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु आहे.

हेही वाचा - BJP Yuvati Morcha Agitation : भाजप युवती मोर्चाचे उदय सामंत यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन

Last Updated : Jan 17, 2022, 10:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.