ठाणे : राज्याच्या राजकारणात सत्ता परिवर्तन झाले असताना शिवसेनेचे दिवंगत नेते धर्मवीर आनंद दिघेच्या मृत्यूची चर्चा ( Anand Dighe death case ) सुरू झाली आहे. राज्यात सुरू असलेल्या या चर्चेमुळे अनेकांचे मनात प्रश्न पडला असून दिघेंच्या मृत्यचे गूढ ( suspect of Anand Dighe death case ) नेमके काय होते? याचा विचार आता ठाण्यातील जनता करू लागली आहे. दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Shindes speech on Anand Dighe ) यांनी मालेगावमधील भाषणात मी मुलाखत दिली तर देशात भूकंप होईल अशी गर्जना करत प्रथमच शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान दिले आहे. विशेष म्हणजे, शिंदे यांनी जाहीर भाषण करताना आनंद दिघे यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार आहे. याबाबत खासदार राजन विचारे यांनी दिवंगत नेते आनंद दिघे यांना पत्र लिहले ( MP Rajan Vichares emotional letter to Anand Dighe ) असून या पत्रात विचारे भावनिक होताना दिसून आले आहेत.
![MP Vichare's emotional letter to late Dighe](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-thn-01-rajan-patra-7204282_01082022132450_0108f_1659340490_484.jpg)
आज तुमची आठवण येतेय साहेब !- दरम्यान शिवसेनेसोबत असलेले ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी खऱ्या अर्थाने सक्रिय होते. खासदार विचारे यांनी दिवंगत नेते आनंद दिघे यांना पत्र लिहले असून या पत्रात विचारे भावनिक होताना दिसून आले आहेत. "साहेब आज मी जितका अस्वस्थ आहे ..तितका कधीच नव्हतो ..कारण आज एक अशी घटना घडलीये ज्या घटनेमुळे फक्त मीच नाही, शिवसैनिकच नाही तर एक शिवसेना बघितलेला सर्व सामान्य मराठी माणूस सुद्धा अस्वस्थ झालाय. आता तुम्हाला कुठल्या तोंडानं सांगू घात झाला दिघे साहेब घात झाला ! तो पण आपल्याच लोकांकडून. म्हणून आज तुमची आठवण येतेय साहेब. अश्या शब्दात राजन विचारेंनी आपले मन मोकळे केले आहे आणि आम्ही फक्त शिवसेनेसोबत असल्याची घ्यावी खासदार राजन विचारे यांनी यानिमित्ताने दिली आहे. दरम्यान धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या मे महिन्यात रिलीज झालेल्या चित्रपटाचा पुढचा रिमेक राज्याच्या राजकारणात सुरु झाला असल्याची चर्चा ठाण्यात सुरु झाली आहे.
दिघेंच्या मृत्यू संदर्भात संशय बळावला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान करून एकप्रकारे ठाण्यातील राजकारण ढवळून निघाले असून दिघेंच्या मृत्यू संदर्भात अनेकांचा संशय बळावला आहे. दरम्यान आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी दिघेंबद्दल काय घडलं हे माहित होतं तर गप्पा का बसलात ? २५ वर्षे गप्प बसून ठाणेकर आणि दिघे साहेबांशी खरी प्रतारणा तुम्ही केली आहे, सत्तेसाठी अजून किती खालच्या थराला जाणार, असे ट्विट करत त्यांनी थेट मुख्यमंत्री शिंदे यांच्या विरोधात दंड थोपटले आहे.
आनंद दिघेंचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने ? - आनंद दिघे यांच्या जीवनावरील चित्रपटाच्या निमित्ताने धर्मवीर आनंद दिघे हे मी २०२२ पासून मोठ्या प्रमाणात चर्चेत आले होते. चित्रपटाच्या रिलीज पासून त्यांच्या मृत्यूविषयी अनेक चर्चा सुरू झाल्या होत्या. काही जणांच्या म्हणण्यानुसार हा अपघात होता, तर काही जण घातपात असल्याचा दावा अनेकवेळा अनेकांनी केला. तेव्हाचे पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री आणि आनंद दिघे यांचे शिष्य एकनाथ शिंदे या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ठिकठिकाणी जात होते. दिघे यांचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हा प्रश्न जेव्हा एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात मंत्री शिंदे यांना विचारण्यात आला होता. तेव्हा ते म्हणले होते की, आनंद दिघे यांच्या पायाला अपघात झाला होता. पण निदान झालं की हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. दिघेसाहेब गेल्यामुळे आमचं खूप नुकसान झालं, पक्षाचं नुकसान झालं, संघटनेचं नुकसान झालं असही शिंदे यांनी स्पष्ट केले होते. दरम्यान मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्यावर थेट हल्ला केला नव्हता मात्र शुक्रवार पासून राज्याच्या दौऱ्यावर असलेल्या शिंदे यांनी शनिवारी मालेगावात जाहीर सभेत बोलताना ठाकरे याना थेट इशाराच दिला आहे. दरम्यान येत्या काही दिवसात आनंद दिघे यांच्यावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
कोणत्याही पदापेक्षा ..वैयक्तिक स्वार्थापेक्षा संघटना महत्वाची ..पक्ष महत्त्वाचा - तुमची ही शिकवण मानाने मिरवत पुढे घेऊन जाणारा तुमचा राजन आणि तुमचे सगळे सच्चे शिवसैनिक आहेत आपली संघटना उभारण्यासाठी.. कितीही जण गेले तरी तुमचे आणि बाळासाहेबांचे विचार आहेत आमच्या सोबत असा उल्लेख पत्रात करत आम्ही जीवाची बाजी लावू पण शिवसेनेचे ठाणे ... ठाण्याची शिवसेना .. हे ब्रीद पुसू देणार नाही असे यावेळी विचारे यांनी बंडखोरांना ठाकणावून सांगत एकप्रकारे इशारा दिला आहे. पुन्हा एकदा तुमचा सैनिक ह्या वादळात पहाडासारखा उभा राहणार आहे .कारण तुम्ही दिलेली ताकद आजही मनगटात शाबूत आहे. पुन्हा एकदा प्रवास खडतर असला तरी ह्या प्रवासात तुमचा आशीर्वाद आमच्या सोबत असू द्या.. आणि पुन्हा एकदा पाठीवर हात ठेवून साहेब फक्त लढ म्हणा ...असे भावनिक पत्र खासदार राजन विचारे यांनी धर्मवीर आनंद दिघे याना लिहले आहे.
हेही वाचा- Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांच्या कुटुंबियांची घेतली भेट