ETV Bharat / city

खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर शेतकऱ्यांच्या बांधावर ; सरसकट पंचनाम्याचे आदेश

author img

By

Published : Nov 15, 2019, 9:47 AM IST

करमाळा तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचा खासदार निंबाळकर यांनी पाहणी दौरा केला. यावेळी त्यानी पांडे, फिसरे, सालसे,आळसुंदे या गावांना भेटी दिल्या.

खासदार निंबाळकर यांचा पहाणी दौरा

सोलापूर - करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांद्यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांचे सरसकट फेर पंचनामे करण्याची सूचना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली आहे. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांना सरसकट जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी लोकसभेत पाठपुरावा करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी आश्वासन दिले.

खासदार निंबाळकर यांचा पहाणी दौरा

माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी पांडे, फिसरे, सालसे,आळसुंदे या गावांना भेटी दिल्या व पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी सवांद साधला. शेतकऱ्यांनी त्यांना पावसामुळे झालेली पिकांचे नुकसान व इतर झालेला खर्च याची माहिती दिली. या वेळी शेतकऱ्यांनी सरसकट मदत देण्याची मागणी केली.

पाहणी दरम्यान त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे पंचनामे झाले आहेत का असे विचारत होते. यावेळी काही ठिकाणी शेतकऱ्यांना पंचनामे झाल्याचे सांगितले तर आळसुंदे येथील शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी हे फक्त कांदा पिकांचे पंचनामे करत असल्याचे सांगितले. त्यावेळी खासदार निंबाळकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारून तालुक्यातील सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. राहिलेल्या पिकांचे फेर पंचनामे करावेत अशाही सूचना दिल्या. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची खासदारांना उत्तर देताना त्रेधातिरपीट उडाली, यामुळे कृषी अधिकाऱ्यांना खासदार व शेतकरी यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार नारायण पाटील, तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, महेश चिवटे, अफसर जाधव, राजकुमार पाटील, शाम शिंधी, मोहन शिंदे, नरेंद्र ठाकूर, रामभाऊ ढाणे, काकासाहेब सरडे, राजेश शिंदे, नानासाहेब ईवरे, अभिजीत मुरूमकर, विनोद इंदलकर, दादा पाठक, सागर शेळके, तसेच तहसीलदार समीर माने, सहायक गटविकास अधिकारी भोंग, एस. जे. पोळके, व शेतकरी उपस्थित होते.

सोलापूर - करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचे कांद्यासह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पिकांचे सरसकट फेर पंचनामे करण्याची सूचना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केली आहे. परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या पिकांना सरसकट जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी, यासाठी लोकसभेत पाठपुरावा करणार असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक- निंबाळकर यांनी आश्वासन दिले.

खासदार निंबाळकर यांचा पहाणी दौरा

माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी पांडे, फिसरे, सालसे,आळसुंदे या गावांना भेटी दिल्या व पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी सवांद साधला. शेतकऱ्यांनी त्यांना पावसामुळे झालेली पिकांचे नुकसान व इतर झालेला खर्च याची माहिती दिली. या वेळी शेतकऱ्यांनी सरसकट मदत देण्याची मागणी केली.

पाहणी दरम्यान त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे पंचनामे झाले आहेत का असे विचारत होते. यावेळी काही ठिकाणी शेतकऱ्यांना पंचनामे झाल्याचे सांगितले तर आळसुंदे येथील शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी हे फक्त कांदा पिकांचे पंचनामे करत असल्याचे सांगितले. त्यावेळी खासदार निंबाळकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारून तालुक्यातील सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. राहिलेल्या पिकांचे फेर पंचनामे करावेत अशाही सूचना दिल्या. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची खासदारांना उत्तर देताना त्रेधातिरपीट उडाली, यामुळे कृषी अधिकाऱ्यांना खासदार व शेतकरी यांच्या रोषाला सामोरे जावे लागले.

यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार नारायण पाटील, तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, महेश चिवटे, अफसर जाधव, राजकुमार पाटील, शाम शिंधी, मोहन शिंदे, नरेंद्र ठाकूर, रामभाऊ ढाणे, काकासाहेब सरडे, राजेश शिंदे, नानासाहेब ईवरे, अभिजीत मुरूमकर, विनोद इंदलकर, दादा पाठक, सागर शेळके, तसेच तहसीलदार समीर माने, सहायक गटविकास अधिकारी भोंग, एस. जे. पोळके, व शेतकरी उपस्थित होते.

Intro:Body:करमाळा - खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर करमाळयात शेतकऱ्यांच्या बांधावर ; सरसकट पंचनामे करण्याचे आदेश



Anchor - करमाळा तालुक्यातील कांदासह इतर पिकांचे नुकसान झालेले आहे. सरसकट पिकांचे फेर पंचनामे करण्याची सूचना केली आहे. तर परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या खरीप पिकांना सरसकट जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी लोकसभेत पाठपुरावा करणार असल्याचे माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

Vo - माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व माजी आमदार नारायण पाटील यांनी करमाळा तालुक्याच्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन नुकसान पाहणी दौरा केला. यावेळी त्यांनी पांडे, फिसरे, सालसे,आळसुंदे या गावांना भेटी दिल्या. यावेळी पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी सवांद साधला. शेतकऱ्यांनी पावसामुळे झालेली पिकांचे नुकसान व इतर झालेला खर्च याची माहिती दिली व शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मागणीही केली.

पाहणीदरम्यान त्यांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांना आपल्या पिकांचे पंचनामे झाले आहेत का असे विचारत होते. तर काही ठिकाणी शेतकऱ्यांना पंचनामे झाल्याचे सांगितले तर आळसुंदे येथील शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी हे फक्त कांदा पिकांचे पंचनामे करत असल्याचे सांगितले. त्यावेळी लागलीच खासदार निंबाळकर यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत जाब विचारून तालुक्यातील सर्वच पिकांचे सरसकट पंचनामे करण्याचे आदेश दिले. तर राहिलेल्या पिकांचे फेर पंचनामे करावेत अशाही सूचना दिल्या. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांची खासदारांना उत्तर देताना त्रेधातिरपीट उडाल्याचे दिसून आले. यावेळी कृषी अधिकाऱ्यांना खासदार व शेतकरी यांच्या रोषाला सामोरे जावे लागले. तसेच नुकसानीचे पंचनामे झालेलेचा आढावाही घेणार असल्याचे निंबाळकर यांनी सांगितले.
यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार नारायण पाटील, तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, महेश चिवटे, अफसर जाधव, राजकुमार पाटील, शाम शिंधी, मोहन शिंदे, नरेंद्र ठाकूर, रामभाऊ ढाणे, काकासाहेब सरडे, राजेश शिंदे, नानासाहेब ईवरे, अभिजीत मुरूमकर, विनोद इंदलकर, दादा पाठक, सागर शेळके, तसेच तहसीलदार समीर माने, सहायक गटविकास अधिकारी भोंग, एस. जे. पोळके, व शेतकरी उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.