ETV Bharat / city

कारभार बघता महाराष्ट्राच्या दृष्टीने महाविकास आघाडी ही महाविनाश आघाडी - विनय सहस्रबुद्धे

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेला दोन वर्षे पूर्ण होत असताना भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपची भूमिका मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे (BJP MP Vinay Sahastrabuddhe) यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला

author img

By

Published : Nov 23, 2021, 6:56 PM IST

Updated : Nov 23, 2021, 7:16 PM IST

विनय सहस्रबुद्धे

पुणे- महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही धोरण स्पष्टता नाही. आघाडीचे नाव जरी महाविकास आघाडी असले तरी प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षाचा कारभार बघता महाराष्ट्राच्या दृष्टीने ही महाविनाश आघाडी म्हणून सिद्ध झाली आहे. अशी टीका भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सरकारवर केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेला दोन वर्षे पूर्ण होत असताना भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपची भूमिका मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

हेही वाचा- २६/११ terrorist attack मनीष तिवारी यांचा कबुलीजबाब तत्कालीन यूपीए सरकारकरिता दुर्भाग्यपूर्ण-राम कदम


कारभारात समन्वय व एकमुखी नेतृत्व नाही

खासदार विनय सहस्रबुद्धे म्हणाले, की राज्यात सत्तेत आलेले सरकार हे अपघाताने सत्तेवर आले आहे. या सरकारबाबत लोकांना अपेक्षा नव्हती. तसेच सरकारमध्ये सहभागी पक्षांची इच्छा नव्हती. ज्याप्रमाणे वीज कोसळावी तसे हे सरकार कोसळेल. हे सरकार पडेल का, हे विचारण्यात काहीही अर्थ नाही. मुळात हे सरकार उभेच नाही, हे वस्तुस्थिती आहे. कारभारात समन्वय व एकमुखी नेतृत्व नाही. राज्यकारभार चालविण्यासाठी एकसंध टीम नाही.

हेही वाचा- ST Worker Strike : संपावर निघणार तोडगा? राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण

महाराष्ट्राची जनता ही आज हतबल-

विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahstrabuddhe) म्हणाले, की या सरकारचा कारभार बघताना महाराष्ट्राची जनता ही आज हतबल झाली आहे. अनुनयवादाची कास आणि गुन्हेगारांना संरक्षण हा एकमेव कार्यक्रम घेऊन हे सरकार आज काम करताना दिसत आहे अमरावती आणि इतर ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. २०१२ मध्ये मुंबईत निघालेला मोर्चा आणि त्यावेळी तिथे हुतात्मा स्मारकावर झालेला हल्ला, त्याची मोडतोड या सगळ्या घटनांची राज्यातील जनतेला पुन्हा आठवण व्हावी अशा प्रकारचा हा अमरावतीचा सगळा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसा कारभार करण्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे.

हेही वाचा- जनतेच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी - पंकजा मुंडे

सरकारने पूर्णपणे गोंधळ निर्माण केलेला आहे

'परकीय गुंतवणूक, महिला सुरक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा अन्य आरोग्य विभागाच्या परीक्षांचे नियोजन, विद्यार्थ्यांचे प्रश्न, एसटी कामगारांचे प्रश्न, पीक विमासंदर्भात सरकारची कार्यवाही याबाबत महाविकास आघाडी सरकारने पूर्णपणे गोंधळ निर्माण केलेला आहे. महिला अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. महिला अत्याचार रोखण्यासाठी शक्ती बिल आणण्याची घोषणा झाली होती. त्याच्या बद्दलची कुठलीही चर्चा सरकारचे नेतृत्व करत नाहीत. फडणवीस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्त जनतेसाठी जो शासनादेश काढला होता त्यात आघाडी सरकारने कपात केल्याचे दिसत आहे. या सरकारच्या नेत्यांनी पूर्वी एसटीच्या कामगारांबद्दल खूपच संवेदनशील पद्धतीने मांडणी केली होती.

शिवसेनेने आपली हिंदुत्वाची भूमिका बाजूला ठेवली. परंतु नवीन कोणती भूमिका घ्यायची हे अजून ठरत नाही. सत्तेचे व्यसन लागलेले तिघेजण एकत्र येऊन आज सत्ता उपभोगत आहेत. परंतु त्यातून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होताना दिसत नाही. ते लोकांसमोर ठळकपणे राज्यातील जनतेच्या लक्षात आले आहे. हे सरकार संपूर्णपणे अंतर्विरोधाने ग्रस्त आहे. आज सरकार म्हणून यांचे अस्तित्व राहिलेले नाही, असेदेखील यावेळी (Vinay Sahstrabuddhe slammed Mahavikas Aghadi) सहस्त्रबुद्धे म्हणाले.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP leader Jagdish Mulik) , पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख संजय मयेकर, प्रसिद्धी प्रमुख हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर व प्रशांत कोतवाल उपस्थित होते.

पुणे- महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणतीही धोरण स्पष्टता नाही. आघाडीचे नाव जरी महाविकास आघाडी असले तरी प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षाचा कारभार बघता महाराष्ट्राच्या दृष्टीने ही महाविनाश आघाडी म्हणून सिद्ध झाली आहे. अशी टीका भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी सरकारवर केली आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेला दोन वर्षे पूर्ण होत असताना भाजपकडून जोरदार हल्लाबोल करण्यात येत आहे. भाजपची भूमिका मांडण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला.

हेही वाचा- २६/११ terrorist attack मनीष तिवारी यांचा कबुलीजबाब तत्कालीन यूपीए सरकारकरिता दुर्भाग्यपूर्ण-राम कदम


कारभारात समन्वय व एकमुखी नेतृत्व नाही

खासदार विनय सहस्रबुद्धे म्हणाले, की राज्यात सत्तेत आलेले सरकार हे अपघाताने सत्तेवर आले आहे. या सरकारबाबत लोकांना अपेक्षा नव्हती. तसेच सरकारमध्ये सहभागी पक्षांची इच्छा नव्हती. ज्याप्रमाणे वीज कोसळावी तसे हे सरकार कोसळेल. हे सरकार पडेल का, हे विचारण्यात काहीही अर्थ नाही. मुळात हे सरकार उभेच नाही, हे वस्तुस्थिती आहे. कारभारात समन्वय व एकमुखी नेतृत्व नाही. राज्यकारभार चालविण्यासाठी एकसंध टीम नाही.

हेही वाचा- ST Worker Strike : संपावर निघणार तोडगा? राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना चर्चेसाठी निमंत्रण

महाराष्ट्राची जनता ही आज हतबल-

विनय सहस्त्रबुद्धे (Vinay Sahstrabuddhe) म्हणाले, की या सरकारचा कारभार बघताना महाराष्ट्राची जनता ही आज हतबल झाली आहे. अनुनयवादाची कास आणि गुन्हेगारांना संरक्षण हा एकमेव कार्यक्रम घेऊन हे सरकार आज काम करताना दिसत आहे अमरावती आणि इतर ठिकाणी नागरिकांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. २०१२ मध्ये मुंबईत निघालेला मोर्चा आणि त्यावेळी तिथे हुतात्मा स्मारकावर झालेला हल्ला, त्याची मोडतोड या सगळ्या घटनांची राज्यातील जनतेला पुन्हा आठवण व्हावी अशा प्रकारचा हा अमरावतीचा सगळा प्रकार आहे. महाराष्ट्राच्या लौकिकाला साजेसा कारभार करण्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार संपूर्णपणे अपयशी ठरले आहे.

हेही वाचा- जनतेच्या प्रश्नावर महाविकास आघाडी सरकार पूर्णपणे अपयशी - पंकजा मुंडे

सरकारने पूर्णपणे गोंधळ निर्माण केलेला आहे

'परकीय गुंतवणूक, महिला सुरक्षा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या किंवा अन्य आरोग्य विभागाच्या परीक्षांचे नियोजन, विद्यार्थ्यांचे प्रश्न, एसटी कामगारांचे प्रश्न, पीक विमासंदर्भात सरकारची कार्यवाही याबाबत महाविकास आघाडी सरकारने पूर्णपणे गोंधळ निर्माण केलेला आहे. महिला अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे. महिला अत्याचार रोखण्यासाठी शक्ती बिल आणण्याची घोषणा झाली होती. त्याच्या बद्दलची कुठलीही चर्चा सरकारचे नेतृत्व करत नाहीत. फडणवीस सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्र सरकारने पूरग्रस्त जनतेसाठी जो शासनादेश काढला होता त्यात आघाडी सरकारने कपात केल्याचे दिसत आहे. या सरकारच्या नेत्यांनी पूर्वी एसटीच्या कामगारांबद्दल खूपच संवेदनशील पद्धतीने मांडणी केली होती.

शिवसेनेने आपली हिंदुत्वाची भूमिका बाजूला ठेवली. परंतु नवीन कोणती भूमिका घ्यायची हे अजून ठरत नाही. सत्तेचे व्यसन लागलेले तिघेजण एकत्र येऊन आज सत्ता उपभोगत आहेत. परंतु त्यातून महाराष्ट्राच्या जनतेमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होताना दिसत नाही. ते लोकांसमोर ठळकपणे राज्यातील जनतेच्या लक्षात आले आहे. हे सरकार संपूर्णपणे अंतर्विरोधाने ग्रस्त आहे. आज सरकार म्हणून यांचे अस्तित्व राहिलेले नाही, असेदेखील यावेळी (Vinay Sahstrabuddhe slammed Mahavikas Aghadi) सहस्त्रबुद्धे म्हणाले.

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक (BJP leader Jagdish Mulik) , पश्चिम महाराष्ट्र प्रसिद्धी प्रमुख संजय मयेकर, प्रसिद्धी प्रमुख हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर व प्रशांत कोतवाल उपस्थित होते.

Last Updated : Nov 23, 2021, 7:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.