पुणे - स्वराज्यातून गवताची एक काडी सुद्धा हरवता कामा नये, असा आदेश देणाऱ्या छत्रपतींच्या राज्यातून ते ही राजभवनातून कागदपत्रे गायब होतात आणि ते निर्ल्लजपणे मान्य केले जाते, हा महाराष्ट्र आणि महाराज या दोघांचा अपमान आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी शिवसेना पुणे शहरच्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे.
चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी -
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राज्यपाल यांना राजभवनात जाऊन सरकारच्या वतीने विधान परिषदेवर १२ सदस्यांची नियुक्ती करणेबाबत महाराष्ट्र राज्य सरकारमधील शिवसेना व मित्रपक्षांच्या (महाविकास आघाडी) वतीने १२ व्यक्तींच्या नावाची यादी राज्यपाल यांना देण्यात आली होती. मात्र इतर सर्व प्रसिद्धी माध्यमातून माहिती मिळाली, कि राज्यपालांना सुपूर्द केलेली यादी राजभवनमधून गहाळ झालेली आहे. याबाबत संपूर्ण माहिती जनतेला मिळणे अभिप्रेत आहे. तसेच राजभवन सारख्या महाराष्ट्र शासनाच्या अति महत्वाच्या वास्तूमधून अशा प्रकारे महत्वाची व गोपनीय माहिती गहाळ होणे ही अत्यंत दुदैवी, निंदनीय व लांछनीय बाब आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी केली.
राजभवनातून पत्र गायब होणे हा महाराष्ट्राचा अपमान.. शिवसैनिकांच्यावतीने पोलीस आयुक्तांना निवेदन - शिवसेना
राजभवनातून कागदपत्रे गायब होतात आणि ते निर्ल्लजपणे मान्य केले जाते, हा महाराष्ट्र आणि महाराज या दोघांचा अपमान आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी शिवसेना पुणे शहरच्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे.
![राजभवनातून पत्र गायब होणे हा महाराष्ट्राचा अपमान.. शिवसैनिकांच्यावतीने पोलीस आयुक्तांना निवेदन disappearance of the letter from Raj Bhavan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-11892014-102-11892014-1621947916707.jpg?imwidth=3840)
पुणे - स्वराज्यातून गवताची एक काडी सुद्धा हरवता कामा नये, असा आदेश देणाऱ्या छत्रपतींच्या राज्यातून ते ही राजभवनातून कागदपत्रे गायब होतात आणि ते निर्ल्लजपणे मान्य केले जाते, हा महाराष्ट्र आणि महाराज या दोघांचा अपमान आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी, या मागणीसाठी शिवसेना पुणे शहरच्या वतीने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना निवेदन देण्यात आले आहे.
चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई करावी -
महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने राज्यपाल यांना राजभवनात जाऊन सरकारच्या वतीने विधान परिषदेवर १२ सदस्यांची नियुक्ती करणेबाबत महाराष्ट्र राज्य सरकारमधील शिवसेना व मित्रपक्षांच्या (महाविकास आघाडी) वतीने १२ व्यक्तींच्या नावाची यादी राज्यपाल यांना देण्यात आली होती. मात्र इतर सर्व प्रसिद्धी माध्यमातून माहिती मिळाली, कि राज्यपालांना सुपूर्द केलेली यादी राजभवनमधून गहाळ झालेली आहे. याबाबत संपूर्ण माहिती जनतेला मिळणे अभिप्रेत आहे. तसेच राजभवन सारख्या महाराष्ट्र शासनाच्या अति महत्वाच्या वास्तूमधून अशा प्रकारे महत्वाची व गोपनीय माहिती गहाळ होणे ही अत्यंत दुदैवी, निंदनीय व लांछनीय बाब आहे. याची चौकशी व्हावी, अशी मागणी यावेळी शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांनी केली.