पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मार्गदर्शक सूचनेनंतर महाविद्यालय सुरू करण्यात आलेली आहे. मात्र महाविद्यालय सुरू झाली असली तरी विद्यालयांमध्ये अजूनही शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दोन डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांच महाविद्यालयात उपस्थित असतील अशी सूचना असताना पुण्यातील एच व्ही देसाई महाविद्यालयात काही विद्यार्थी दोन्ही डोस न घेताच महाविद्यालयात उपस्थित झाले होते. महाविद्यालय सुरू झाली असली तरी जी विद्यार्थीची उपस्थिती असली पाहिजे ती पाहायला मिळत नाही.
आजपासून महाविद्यालय सुरू -
राज्यात कोरोनाचा धोका कमी होत असल्याने लागू करण्यात आलेल्या निर्बंध शिथिलता आणली गेली आहे.राज्यात आधी शाळा सुरू करण्यात आल्या त्यानंतर धार्मिक स्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आणि आत्ता महाविद्यालय आणि विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातील सर्व कृषी विद्यापीठ अभिमत विद्यापीठ स्वयं अर्थसहय्यीत विद्यापीठेशी सलंगन महाविद्यालयातील नियमित वर्ग आजपासून सुरू करण्याबाबतच्या सूचना सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांनी दिलेले आहे त्या पार्श्वभूमीवर आजपासून पुण्यातील महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे.
![आजपासून महाविद्यालयं सुरू](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-pun-01-college-open-pune-avb-mh10021_20102021120250_2010f_1634711570_472.jpg)
शासनाच्या सूचनांचे पालन करू -
शासनाने ज्या सूचना दिल्या आहेत त्यासर्व सूचनांचा आम्ही पालन करत आहोत. ज्या विद्यार्थ्यांचे दोन्ही डोस झालेले आहे त्यांची माहिती गुगल द्वारे घेऊन त्यांचे अर्ज भरून घेतले जात आहे. विद्यार्थ्यांची माहिती घेतल्यानंतरच त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिला जात आहे.एक ते दीड वर्षापासून महाविद्यालय ही बंद होती त्यामुळे सुरूवातीच्या दोन ते चार दिवस अशाच अडीअडचणींना महाविद्यालयांना सामोरे जावे लागणार आहे मात्र त्यानंतर नक्कीच महाविद्यालय अनेक अडचणींवर मात करेल आणि येणाऱ्या काळात जी महाविद्यालयांमध्ये सुरुवातीच्या काळात विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत महाविद्यालय गजबजलेले असायचे तशाच पद्धतीचा स्वरूप येणाऱ्या काळातही दिसेल असा विश्वास यावेळी एच व्ही देसाई महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांमध्ये आनंद -
गेली एक ते दीड वर्ष महाविद्यालय बंद होती. ऑनलाईन शिक्षण सुरू होता पण शिक्षक जे काही शिकवत आहे ते समजत नव्हतं.पण आजपासून महाविद्यालय सुरू झाल्याने आनंद होत आहे अनेक मित्र मैत्रिणींना देखील भेटता येणार आहे.घरच्यांनी ही अनेक सूचना दिलेल्या आहेत. महाविद्यालयांकडून जे नियम घालून देण्यात आलेले आहे त्या नियमांचा आम्ही बदल करू असे यावेळी विद्यार्थ्यांनी म्हटले आहे.
एक ते दोन विद्यार्थ्यांनी डोसच घेतले नाही -
दोन्ही डोस घेतलेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात उपस्थित राहता येणार आहे अशी अट असताना ही काही विद्यार्थ्यांनी दोन्ही डोस घेतलेली नसताना ही महाविद्यालयात उपस्थिती दर्शविली.