ETV Bharat / city

शिवसेना पैसे घेवून मंत्री, आमदार बनवते; नारायण राणेंचा गंभीर आरोप

author img

By

Published : Sep 22, 2019, 9:27 AM IST

शिवसेनेत पैसे घेऊन मंत्री, आमदार आणि महापौर केले जाते. त्याचबरोबर मनपातून काही टक्के हिस्सा घेतला जात असल्याने सेना कमजोर झाल्याचा गंभीर आरोप नारायण राणे यांनी केला आहे. शिवाय सेनेत आता वाघ राहिले नसून त्यात शेळ्या-मेंढ्या असल्याचे म्हणत राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले.

नारायण राणे

पुणे - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेने तानाजी सावंत यांना पैसे घेऊन मंत्रीपद दिले आहेत. सावंत यांनी किती पैसे दिलेत हेही जगजाहीर झाले आहे. शिवसेनेत पैसे घेऊन मंत्री, आमदार आणि महापौर केले जाते. त्याचबरोबर मनपातून काही टक्के हिस्सा घेतला जात असल्याने सेना कमजोर झाल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. शिवाय बाळासाहेबांची शिवसेना राहिले नसून सेनेला शेळी किंवा मांजर म्हटले तरी हरकत नाही. आता सेनेत वाघ राहिले नसून त्यात शेळ्या-मेंढ्या असल्याचे म्हणत राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच माझ्या भाजप प्रवेशाला सेनाच आडकाठी करत आहे. मला मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून बोलल्यानंतर मी गेलो. या सर्वांनी माझ्या नेतृत्वात काम केले आहे. मी भाजपमध्ये जाणार हेही स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे सोडले तर सर्वच राजकीय पक्षात माझे चांगले संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमधील युवर्स ट्रुली या कार्यक्रमात नारायण राणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेसच जबाबदार आहे. सर्वसामान्यांचा संपर्क तुटला आणि भ्रष्टाचार वाढून फक्त पैशाने काम करण्याची सवय लागल्याने काँग्रेसची अधोगती झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहुल गांधीं प्रभावहीन झाल्याचेही ते म्हणाले. नारायण राणे पुढे म्हणाले की, शिवसेना भुजबळांना पक्षात घ्यायला तयार आहेत. शिवसेनेला प्रदीप शर्मा, भुजबळ चालते. फक्त नारायण राणे चालत नाही. शिवसेनेला राणेंची फार भीती वाटते. मात्र, मलाच सेनेत जायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या भाजप प्रवेशात शिवसेना आडकाठी आणत आहे. मला मंत्रीपदही मिळणार होते, शपथ घ्यायचा दिवस ठरला होता. मात्र शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याने ते बारगळण्याचा आरोप राणे यांनी केला.

पुणे - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केला आहे. शिवसेनेने तानाजी सावंत यांना पैसे घेऊन मंत्रीपद दिले आहेत. सावंत यांनी किती पैसे दिलेत हेही जगजाहीर झाले आहे. शिवसेनेत पैसे घेऊन मंत्री, आमदार आणि महापौर केले जाते. त्याचबरोबर मनपातून काही टक्के हिस्सा घेतला जात असल्याने सेना कमजोर झाल्याचा गंभीर आरोप राणे यांनी केला आहे. शिवाय बाळासाहेबांची शिवसेना राहिले नसून सेनेला शेळी किंवा मांजर म्हटले तरी हरकत नाही. आता सेनेत वाघ राहिले नसून त्यात शेळ्या-मेंढ्या असल्याचे म्हणत राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच माझ्या भाजप प्रवेशाला सेनाच आडकाठी करत आहे. मला मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून बोलल्यानंतर मी गेलो. या सर्वांनी माझ्या नेतृत्वात काम केले आहे. मी भाजपमध्ये जाणार हेही स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे सोडले तर सर्वच राजकीय पक्षात माझे चांगले संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवलमधील युवर्स ट्रुली या कार्यक्रमात नारायण राणे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेसच जबाबदार आहे. सर्वसामान्यांचा संपर्क तुटला आणि भ्रष्टाचार वाढून फक्त पैशाने काम करण्याची सवय लागल्याने काँग्रेसची अधोगती झाल्याचा आरोप त्यांनी केला. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहुल गांधीं प्रभावहीन झाल्याचेही ते म्हणाले. नारायण राणे पुढे म्हणाले की, शिवसेना भुजबळांना पक्षात घ्यायला तयार आहेत. शिवसेनेला प्रदीप शर्मा, भुजबळ चालते. फक्त नारायण राणे चालत नाही. शिवसेनेला राणेंची फार भीती वाटते. मात्र, मलाच सेनेत जायचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझ्या भाजप प्रवेशात शिवसेना आडकाठी आणत आहे. मला मंत्रीपदही मिळणार होते, शपथ घ्यायचा दिवस ठरला होता. मात्र शिवसेनेने सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याने ते बारगळण्याचा आरोप राणे यांनी केला.

Intro:(फाईल फोटो वापरावा, या कार्यक्रमासाठी इलेक्ट्रॉनिक मीडियाला प्रवेश नव्हता)

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर गंभीर आरोप केलाय. तानाजी सावंत यांना पैसे घेऊन मंत्रीपद दिलंय. सावंत यांनी किती पैसे दिलेत हे जगजाहीर झालंय. शिवसेनेत पैसे घेऊन मंत्री,आमदार, महापौर केलं जातं. त्याचबरोबर मनपतून टक्केवारी घेतली जात असल्यानं सेना कमजोर झाल्याचा आरोप राणेंनी केलाय. बाळासाहेबांची शिवसेना राहिले नसून सेनेला शेळी किंवा मांजर म्हटलं तरी हरकत नाही, सेनेत वाघ राहिले नसून शेळ्या-मेंढ्या झाल्याचा आरोप केलाय.
तर माझ्या भाजप प्रवेशाला सेनाच आडकाठी करत आहे. मला भाजपनं मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून बोलल्यानंतर मी गेलोय. या सर्वांनी माझ्या नेतृत्वात काम केलंय. मी भाजपात जाणार हे नक्की, असल्याचं ही राणेंनी म्हटलंय. उद्धव ठाकरे सोडले तर सर्व राजकीय पक्षात माझे चांगले संबंध असल्याचं त्यांनी सांगितलं. Body:पुण्यात ते पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवल मध्ये युवर्स ट्रुली नारायण राणे या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या पराभवाला काँग्रेस जबाबदार आहे. सर्वसामान्यांचा संपर्क तुटला आणि भ्रष्टाचार वाढवून फक्त पैशाने काम करण्याची सवय लागल्याने अधोगती झाल्याचा आरोप केला. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्यासमोर राहुल गांधीं प्रभावहीन झाल्याचा आरोप त्यांनी केलाय.

यावेळी बोलताना नारायण राणे यांनी भुजबळ,काँग्रेस शिवसेना आणि विलासरावांवर आपले मत व्यक्त केलं.
भुजबळांना शिवसेनेत घ्यायला तयार आहेत. शिवसेनेला प्रदीप शर्मा, भुजबळ चालतो फक्त राहणार नारायण राणे चालत नाही. शिवसेनेला राणेंची फार भीती वाटते, मात्र मलाच सेनेत जायचं जायचं नसल्याचं त्यांनी म्हटलंय.
Conclusion:तर भाजप प्रवेशात शिवसेना आडकाठी आहे. मला मंत्रीपदही मिळणार होतं, शपथ घ्यायचा दिवस ठरला होता मात्र यांनी सरकारमधून बाहेर पडण्याचा इशारा दिल्याने ते बारगळण्याचा आरोप राणे यांनी केलाय.

तर काँग्रेसच्या पराभवाला कॉंग्रेस आणि नेते जबाबदार आहे. काँग्रेस नेत्यांचा सर्वसामान्यांचा संपर्क तुटला. दिल्लीतील ने त्याला भेटायला जातात मात्र जनतेचे काम करत नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. काँग्रेसमध्ये भ्रष्टाचार एवढा वाढला त्याला आळा घालायला कोणी नव्हतं. सर्व गोष्टी पैशानं करायची त्यांना सवय लागली.तर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तुलनेत राहुल गांधी प्रभावहीन झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. पक्षाकडून पद आणि पैसे कमावण्यावर भर दिल्याने काँग्रेसची अधोगती झाल्याचं राण्यांनी खडेबोल सुनावले.

तर विलासराव देशमुख आणि माझे अतिशय चांगले संबंध होते. त्यांनी मला महसूल मंत्रीपद दिलं. मात्र मुख्यमंत्री व्हायला संधी दिली नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.