ETV Bharat / city

निसर्गोपचारच्या माध्यमातून गांधींच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न - केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक - निसर्गोपचार आणि महात्मा गांधी

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमीत्त गोव्यात तीन दिवसांच्या निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक, निसर्गोपचार संस्थेच्या सत्य लक्ष्मी आणि देशाच्या विविध भागांतून उपस्थित राहिलेले शिबिरार्थी सहभागी झाले होते.

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक
author img

By

Published : Oct 2, 2019, 5:28 PM IST

पणजी - महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमीत्त गोव्यात तीन दिवसांच्या निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून निसर्गोपचार आणि महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे, असे मत केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

गोव्यात तीन दिवसांच्या निसर्गोपचार शिबिरात देशाच्या विविध भागांतून शिबिरार्थी सहभागी


या शिबिराचे उद्घाटन गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मिरामार ते कला अकादमी दरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत श्रीपाद नाईक, निसर्गोपचार संस्थेच्या सत्य लक्ष्मी आणि देशाच्या विविध भागांतून उपस्थित राहिलेले शिबिरार्थी सहभागी झाले.

हेही वाचा - गांधी@150; ईटीव्ही भारतच्या माध्यमातून देशातील सर्वश्रेष्ठ गायकांकडून बापूंना संगीतमय श्रद्धांजली


निसर्गोपचार शिबिराच्या निमित्ताने तज्ञ लोकांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे निसर्गोपचारांविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यास मदत होईल. निसर्गोपचार शिबिराला देशाच्या विविध भागांतून चांगला प्रतिसाद लाभला आहे. या शिबिरानंतरही येथील डॉक्टरांचे कार्य सुरू राहणार आहे, अशी माहिती श्रीपाद नाईक यांनी दिली. या शिबिरात जास्तीत जास्त गोमंतकियांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन नाईक यांनी केले.

पणजी - महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमीत्त गोव्यात तीन दिवसांच्या निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या माध्यमातून निसर्गोपचार आणि महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे, असे मत केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले.

गोव्यात तीन दिवसांच्या निसर्गोपचार शिबिरात देशाच्या विविध भागांतून शिबिरार्थी सहभागी


या शिबिराचे उद्घाटन गोव्याच्या राज्यपाल डॉ. मृदुला सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मिरामार ते कला अकादमी दरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या पदयात्रेत श्रीपाद नाईक, निसर्गोपचार संस्थेच्या सत्य लक्ष्मी आणि देशाच्या विविध भागांतून उपस्थित राहिलेले शिबिरार्थी सहभागी झाले.

हेही वाचा - गांधी@150; ईटीव्ही भारतच्या माध्यमातून देशातील सर्वश्रेष्ठ गायकांकडून बापूंना संगीतमय श्रद्धांजली


निसर्गोपचार शिबिराच्या निमित्ताने तज्ञ लोकांच्या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे निसर्गोपचारांविषयी लोकांमध्ये जनजागृती करण्यास मदत होईल. निसर्गोपचार शिबिराला देशाच्या विविध भागांतून चांगला प्रतिसाद लाभला आहे. या शिबिरानंतरही येथील डॉक्टरांचे कार्य सुरू राहणार आहे, अशी माहिती श्रीपाद नाईक यांनी दिली. या शिबिरात जास्तीत जास्त गोमंतकियांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन नाईक यांनी केले.

Intro:पणजी : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून गोव्यात तीन दिवसांच्या निसर्गोपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने निसर्गोपचार आणि महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्या़चे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न आहे, असे मत केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केले. या शिबिराच्या निमित्ताने आयोजित पदयात्रेत सहभागी होताना सांगितले.


Body:पणजीत आयोजित या शिबिराचे उद्घाटन गोव्याच्या राज्यपाल डॉ. म्रुदुला सिन्हा यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मिरामार ते कला अकादमी दरम्यान पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये केंद्रीय मंत्री नाईक यांच्यासह निसर्गोपचार संस्थेच्या सत्य लक्ष्मी आदींसह देशाच्या विविध भागांतून उपस्थित राहिलेले शिबिरार्थी सहभागी झाले होते.
यावेळी महात्मा गांधी यांच्या वेशभूषा केलेली व्यक्ती सर्वांच्या पुढे मंत्र्यांच्या सोबत चालत होती.
याविषयी अधिक माहिती देताना नाईक म्हणाले, निसर्गोपचार शिबिराच्या निमित्ताने तज्ञांच्या परिषदांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे याविषयी जनजागृती करण्यास मदत होईल. या शिबिराला देशाच्या विविध भागांतून चांगला प्रतिसाद लाभला आहे. या शिबिरानंतरही येथील डॉक्टरांचे कार्य सुरू राहणार आहे. त्यामुळे लोकांत जाणीव जागृती करण्यासाठी या पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यामुळे भविष्यात येथील लोकांना वाटू शकते की , मी निसर्गोपचार का घेऊ नये? .
या शिबिरात जास्तीत जास्त गोमंतकियांनी सहभागी होत याचा लाभ घ्यावा तसेच ही पध्दती आत्मसात करावी, कसे आवाहनही त्यांनी यावेळी केले.


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.