ETV Bharat / city

'उत्तरप्रदेश महाराष्ट्रापेक्षाही सर्वात मोठे राज्य, त्याचेच विभाजन करावे'

महाराष्ट्रपेक्षा उत्तर प्रदेश दुपटीने मोठा आहे. महाराष्ट्राचे विभाजन करण्यापेक्षा त्याचे विभाजन करा, असे वक्तव्य मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

author img

By

Published : Jan 13, 2020, 7:47 AM IST

chagan bhujbal
छगन भुजबळ

नाशिक - नांदगाव तालुक्यात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रापेक्षाही उत्तर प्रदेश दुप्पटीने मोठा आहे. तेव्हा त्याचे अजून भाग करा. जिथे आवश्यकता आहे, तिथेच विभाजन करावे. महाराष्ट्रात सर्व काही सुरळीत सुरू आहे. तेव्हा जे प्रश्न आहे त्यावरून लक्ष हटवण्याचे काम करू नये, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

नांदगांव तालुक्यात पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती...

हेही वाचा... 'माझी लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे, हा तर मराठी मातीचा अपमान'

भाजप 2014 पूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी करत होता. मात्र, 2014 नंतर अगदी कालपर्यंत सत्तेत असताना कोणीच मागणी केली नाही. आत्ता काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता आल्याने हे पुन्हा माणगी करत आहे की, वेगळा विदर्भ करा. मात्र, त्यांना विदर्भ वेगळा करण्यापेक्षा या राज्याचे तुकडे करण्यातच जास्त रस आहे. आम्ही मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शहीद झालेल्यांसोबत गद्दारी करणार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... "काँग्रेस-राष्ट्रवादीवाले नीट वागले नाही तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील"

नांदगांव तालुक्यात पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास आलेले मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली. आपल्या खास शैलीत भाषण करताना त्यांनी, पत्रकारिता करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याची कल्पना आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या कार्यकाळात हे प्रश्न नक्कीच मार्गी लावू, असे प्रतिपादन भुजबळ यांनी यावेळी केले.

नाशिक - नांदगाव तालुक्यात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी वेगळ्या विदर्भाची मागणी करणाऱ्यांना टोला लगावला आहे. महाराष्ट्रापेक्षाही उत्तर प्रदेश दुप्पटीने मोठा आहे. तेव्हा त्याचे अजून भाग करा. जिथे आवश्यकता आहे, तिथेच विभाजन करावे. महाराष्ट्रात सर्व काही सुरळीत सुरू आहे. तेव्हा जे प्रश्न आहे त्यावरून लक्ष हटवण्याचे काम करू नये, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.

नांदगांव तालुक्यात पत्रकार दिनाच्या कार्यक्रमाला मंत्री छगन भुजबळ यांची उपस्थिती...

हेही वाचा... 'माझी लायकी काय आहे हे स्वतःला कळलं पाहिजे, हा तर मराठी मातीचा अपमान'

भाजप 2014 पूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी करत होता. मात्र, 2014 नंतर अगदी कालपर्यंत सत्तेत असताना कोणीच मागणी केली नाही. आत्ता काँग्रेस-शिवसेना-राष्ट्रवादीची सत्ता आल्याने हे पुन्हा माणगी करत आहे की, वेगळा विदर्भ करा. मात्र, त्यांना विदर्भ वेगळा करण्यापेक्षा या राज्याचे तुकडे करण्यातच जास्त रस आहे. आम्ही मात्र संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शहीद झालेल्यांसोबत गद्दारी करणार नाही, असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... "काँग्रेस-राष्ट्रवादीवाले नीट वागले नाही तर उद्धव ठाकरे राजीनामा देतील"

नांदगांव तालुक्यात पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास आलेले मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात चौफेर फटकेबाजी केली. आपल्या खास शैलीत भाषण करताना त्यांनी, पत्रकारिता करताना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. याची कल्पना आहे. त्यामुळे आमच्या सरकारच्या कार्यकाळात हे प्रश्न नक्कीच मार्गी लावू, असे प्रतिपादन भुजबळ यांनी यावेळी केले.

Intro:मनमाड :भाजप 2014 पूर्वी वेगळ्या विदर्भाची मागणी करत होत पण 2014 नंतर तर काल पर्यंत कोणीच मागणी केली नाही आणि आत्ता काँग्रेस-शिवसेना- राष्ट्रवादी ची सत्ता आल्याने हे माणगी करत आहे की पुन्हा वेगळा विदर्भ करा विदर्भ वेगळा करण्यापेक्षा त्यांना राज्याचे चार तुकडे करण्यात जास्त रस आहे मात्र आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत शहीद झालेल्यासोबत गद्दारी करणार नाही.Body:मनमाड येथील पत्रकार दिनाच्या निमित्ताने कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी पत्राकाराशी सवांद साधला यावेळी त्यांनी महाराष्ट्र पेक्षा उत्तर प्रदेश दुपटीने मोठा असून त्याचे अजून भाग करा जेथे आवश्यकता आहे तिथे विभाजन करा महाराष्ट्र सर्व नीट चालू आहे जे प्रश्न आहे त्यावरून लक्ष हटवण्याचा काम करू नये असा टोलाही त्यांनी लगावला
भाजपवाल्यांना सध्या सत्ता नसल्याने काही काम राहिलेल त्यामुळेच खडसे आणि महाजन यांच्यात असे रिकामे उद्योग सुरू आहेत भाजप हा अतिशय शिस्तबद्ध पक्ष असून हे त्याच्यात हे बसत नाही त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष न देता आपले काम सुरू ठेवावे असेही भुजबळ म्हणालेConclusion:मनमाड नांदगांव तालुक्यातील पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास आलेल्या भुजबळ यांनी चोफेर फटकेबाजी करत आपल्या शैलीत जोरदार भाषण ठोकले तर पत्रकारिता करतांना अनेक समस्यांना तोंड देत पत्रकारिता करावी लागत असते आमच्या सरकारच्या कार्यकाळात आम्ही नक्कीच त्यांचे प्रश्न मार्गी लावू असे प्रतिपादन भुजबळ यांनी यावेळी केले.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.