ETV Bharat / city

महाराष्ट्रातील हजारो शेतकरी दिल्लीत धडकतील; किसान सभेच्या बैठकीत निर्णय

author img

By

Published : Dec 18, 2020, 7:38 PM IST

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने चलो दिल्लीचा नारा दिला आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वाखाली 21 डिसेंबरला नाशिकहून वाहन मोर्चाद्वारे दिल्लीला रवाना होतील.

डॉ. अशोक ढवळे, किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष
डॉ. अशोक ढवळे, किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष

नाशिक - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने चलो दिल्लीचा नारा दिला आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वाखाली 21 डिसेंबरला नाशिकहून वाहन मोर्चाद्वारे दिल्लीला रवाना होतील. त्यापुर्वी नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल, असा निर्णय किसान सभेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शेतकरी 1266 किलोमीटरचा प्रवास करून 24 डिसेंबर 2020 रोजी दिल्ली येथील बॉर्डरवर पोहोचतील.

किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे

बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जाणार-

दिल्लीला विविध राज्यांना जोडणारे प्रमुख महामार्ग शेतकऱ्यांनी अगोदरच ब्लॉक केले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी राजस्थान हरियाणा सीमेवर शहाजहानपूर येथे दिल्लीकडे जाणारा महामार्ग रोखत आंदोलनात सामील होतील. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान व दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आपले रेशन, पाणी, स्वयंपाक व निवासाची व्यवस्था सोबत घेऊन बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जाणार असल्याची माहिती किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हजारोंच्या संख्येने दिल्ली गाठणारे महाराष्ट्र हे पहिले-

दिल्ली येथील आंदोलनात दिल्लीच्या आजूबाजूची राज्ये प्रामुख्याने सामील झाली आहेत. 3 डिसेंबरच्या देशव्यापी निदर्शनांमध्ये व 8 डिसेंबरच्या भारत बंद मध्ये देशभरातील इतर राज्यांमधील जनतेने आंदोलनाला प्रचंड पाठिंबा दिला. मात्र दिल्लीपासून दूर असलेल्या राज्यांमधील शेतकरी अद्याप प्रत्यक्ष दिल्लीत जाऊन मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊ शकले नव्हते. रेल्वेची सामान्य वाहतूक बंद असल्याने इच्छा असूनही शेतकरी दिल्लीला जाऊ शकले नव्हते. मात्र आता हजारोंच्या संख्येने दिल्ली गाठणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या या लढाऊ कृतीनंतर इतर राज्यातील शेतकरीही दिल्लीच्या दिशेने कूच करतील, असा विश्वास किसान सभा व्यक्त करत आहे.

ही लढाई केंद्र सरकार व त्यांचे कॉर्पोरेट भागीदार यांच्या विरोधात-

महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमधील शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जमतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुपारी 1 वाजता दिल्लीच्या दिशेने निघतील. मोदी सरकार कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे आणले. त्यामुळे ही लढाई केंद्र सरकार व त्यांचे कॉर्पोरेट भागीदार यांच्या विरोधात आहे. दिल्लीला प्रस्थान करण्यापूर्वी नाशिक येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शने करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व समविचारी संघटनांचा पाठिंबा-

महाराष्ट्रातील सर्व समविचारी संघटनांचा चलो दिल्ली मोहिमेला पाठिंबा आहे. दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी वाहन जत्था धुळे येथे पोहचल्यावर राज्यभरातील सर्व समविचारी शेतकरी, कामगार व श्रमिक संघटनांच्या वतीने धुळे येथे पाठिंबा सभा घेण्यात येईल. यामध्ये विविध संघटना शेतकऱ्यांना आपला पाठिंबा व्यक्त करतील. तसेच ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, उमराणे, मालेगाव आणि शिरपूर येथेही जनतेच्या वतीने जत्थ्याचे स्वागत केले जाईल.

शेतकऱ्यांनी चलो दिल्ली आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे-

केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत. शेतकरी विरोधी प्रस्तावित वीजबिल विधेयक मागे घ्यावे व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट आधार भावाचे संरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय कायदा करावा, अशी मागणी किसान सभा करत आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाला आणखी व्यापक करत तीव्र करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या ऐतिहासिक चलो दिल्ली आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेने केले आहे.

हेही वाचा- आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन : कोरोना काळात भारतातील स्थलांतरितांचे प्रश्न

हेही वाचा- 'वाइन कॅपिटलवर' शिक्कामोर्तब.. आता नाशिकच्या वाइनला मिळणार जागतिक ओळख

नाशिक - दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेने चलो दिल्लीचा नारा दिला आहे. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातील हजारो शेतकरी किसान सभेच्या नेतृत्वाखाली 21 डिसेंबरला नाशिकहून वाहन मोर्चाद्वारे दिल्लीला रवाना होतील. त्यापुर्वी नाशिक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात येईल, असा निर्णय किसान सभेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. शेतकरी 1266 किलोमीटरचा प्रवास करून 24 डिसेंबर 2020 रोजी दिल्ली येथील बॉर्डरवर पोहोचतील.

किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे

बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जाणार-

दिल्लीला विविध राज्यांना जोडणारे प्रमुख महामार्ग शेतकऱ्यांनी अगोदरच ब्लॉक केले आहेत. महाराष्ट्रातील शेतकरी राजस्थान हरियाणा सीमेवर शहाजहानपूर येथे दिल्लीकडे जाणारा महामार्ग रोखत आंदोलनात सामील होतील. पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, राजस्थान व दिल्लीच्या आजूबाजूच्या राज्यांमधून आलेल्या शेतकऱ्यांप्रमाणेच महाराष्ट्रातील शेतकरी सुद्धा आपले रेशन, पाणी, स्वयंपाक व निवासाची व्यवस्था सोबत घेऊन बेमुदत मुक्कामाच्या तयारीने दिल्लीला जाणार असल्याची माहिती किसान सभेचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हजारोंच्या संख्येने दिल्ली गाठणारे महाराष्ट्र हे पहिले-

दिल्ली येथील आंदोलनात दिल्लीच्या आजूबाजूची राज्ये प्रामुख्याने सामील झाली आहेत. 3 डिसेंबरच्या देशव्यापी निदर्शनांमध्ये व 8 डिसेंबरच्या भारत बंद मध्ये देशभरातील इतर राज्यांमधील जनतेने आंदोलनाला प्रचंड पाठिंबा दिला. मात्र दिल्लीपासून दूर असलेल्या राज्यांमधील शेतकरी अद्याप प्रत्यक्ष दिल्लीत जाऊन मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होऊ शकले नव्हते. रेल्वेची सामान्य वाहतूक बंद असल्याने इच्छा असूनही शेतकरी दिल्लीला जाऊ शकले नव्हते. मात्र आता हजारोंच्या संख्येने दिल्ली गाठणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरत आहे. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांच्या या लढाऊ कृतीनंतर इतर राज्यातील शेतकरीही दिल्लीच्या दिशेने कूच करतील, असा विश्वास किसान सभा व्यक्त करत आहे.

ही लढाई केंद्र सरकार व त्यांचे कॉर्पोरेट भागीदार यांच्या विरोधात-

महाराष्ट्रातील 21 जिल्ह्यांमधील शेतकरी नाशिक येथील गोल्फ क्लब मैदान येथे दिनांक 21 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता जमतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून दुपारी 1 वाजता दिल्लीच्या दिशेने निघतील. मोदी सरकार कॉर्पोरेट कंपन्यांच्या फायद्यासाठी कृषी कायदे आणले. त्यामुळे ही लढाई केंद्र सरकार व त्यांचे कॉर्पोरेट भागीदार यांच्या विरोधात आहे. दिल्लीला प्रस्थान करण्यापूर्वी नाशिक येथील रिलायन्स पेट्रोल पंपावर जोरदार निदर्शने करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रातील सर्व समविचारी संघटनांचा पाठिंबा-

महाराष्ट्रातील सर्व समविचारी संघटनांचा चलो दिल्ली मोहिमेला पाठिंबा आहे. दिनांक 22 डिसेंबर रोजी दुपारी वाहन जत्था धुळे येथे पोहचल्यावर राज्यभरातील सर्व समविचारी शेतकरी, कामगार व श्रमिक संघटनांच्या वतीने धुळे येथे पाठिंबा सभा घेण्यात येईल. यामध्ये विविध संघटना शेतकऱ्यांना आपला पाठिंबा व्यक्त करतील. तसेच ओझर, पिंपळगाव बसवंत, चांदवड, उमराणे, मालेगाव आणि शिरपूर येथेही जनतेच्या वतीने जत्थ्याचे स्वागत केले जाईल.

शेतकऱ्यांनी चलो दिल्ली आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे-

केंद्र सरकारने केलेले शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत. शेतकरी विरोधी प्रस्तावित वीजबिल विधेयक मागे घ्यावे व शेतकऱ्यांना उत्पादन खर्चाच्या दीडपट आधार भावाचे संरक्षण मिळावे, यासाठी केंद्रीय कायदा करावा, अशी मागणी किसान सभा करत आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी दिल्ली येथे सुरू असलेल्या देशव्यापी आंदोलनाला आणखी व्यापक करत तीव्र करण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी दिल्लीकडे कूच करत आहेत. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या ऐतिहासिक चलो दिल्ली आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन किसान सभेने केले आहे.

हेही वाचा- आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिन : कोरोना काळात भारतातील स्थलांतरितांचे प्रश्न

हेही वाचा- 'वाइन कॅपिटलवर' शिक्कामोर्तब.. आता नाशिकच्या वाइनला मिळणार जागतिक ओळख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.