ETV Bharat / city

उत्तर महाराष्ट्र विभाग : युतीच्या जागा टिकणार की वाढणार? काँग्रेस राष्ट्रवादीसाठी मात्र अस्तित्वाची लढाई

author img

By

Published : Sep 21, 2019, 11:12 AM IST

एकेकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असल्याने उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीला विधानसभेच्या निवडणुकीसाठी ताकदीचे उमेदवार मिळणं देखील कठीण झालं आहे...लोकसभा निवडणुकीनतंर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजप, सेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युतीचे पारडे जड असल्याचे चित्र आहे...

उत्तर महाराष्ट्र विभाग मतदार संघांचा आढावा

नाशिक - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे..लोकसभा निवडणुकीनतंर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजप, सेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युतीचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. एकेकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असल्याने उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीला विधानसभेच्या निवडणुकीसाठी ताकदीचे उमेदवार मिळणं देखील कठीण झालं आहे.

उत्तर महाराष्ट्र विभाग मतदार संघांचा आढावा

हेही वाचा... पुलवामासारखा प्रकार यावेळी घडला नाही, तर सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही - पवार

नाशिक जिल्हा

जिल्ह्यात एकूण 15 विधानसभा मतदारसंघ असून,2014 मधील विधानासभा मतदारसंघ पक्षीय बलाबल बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 2, भाजप 4, शिवसेना 4, माकप 1 अशी परिस्थिती आहे. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी युतीच्या उमेदवारांना पसंती दिल्याने नाशिकमधून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या भारती पवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. असेच चित्र विधानसभेतही दिसेल असं राजकीय जाणकारांचे म्हणणं आहे. नाशिक जिल्ह्यात प्रमुख लढत येवला मतदारसंघात होईल असं दिसतंय, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचा हा बालेकिल्ला...छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात होत होत्या, मात्र भुजबळांनी पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहत, शिवसेनेत जाणार का ? या प्रश्नाला पूर्णविराम दिला. अस म्हटलं जातंय की, भुजबळांना शिवसेनेतुनच मोठ्या प्रमाणात विरोध झाला. भुजबळांनी सेनेत प्रवेश केल्यास आपलं अस्तित्व धोक्यात येईल या भीतीने नाशिकच्या काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून भुजबळांना सेनेत येण्यासाठी विरोध केला. तसेच येवला मतदार राष्ट्रवादीकडून भुजबळांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून त्यांना पक्षातीलच काही नेत्यांनी येवला मतदारसंघातून तिकीट मिळावे म्हणून पक्षाकडे उमेदवारी मगितली आहे.

नाशिक जिल्हा

त्यामुळे भुजबळांना पक्षातूनच काही प्रमाणात विरोध होत असल्याचे चित्र आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर युतीला मिळालेलं यश बघता भाजप शिवसेनेमधून निवडणूक लढवण्यास अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. यात नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून 18 जणांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. अशीच परिस्थिती इतर मतदारसंघांची देखील आहे. तर, दुसरीकडे मनसेने विधानसभा निवडणुकीसंदर्भात कुठलीच भूमिका स्पष्ट नं केल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे.

हेही वाचा.. विधानसभेत ईव्हीएम हॅक होणार नाही, त्यामुळे सत्ता आमचीच - प्रकाश आंबेडकर

जळगाव जिल्हा

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी, 6 मतदारसंघ भाजप, 3 मतदारसंघात शिवसेनेचे, तसेच उरलेल्या दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा एक आणि एक अपक्ष आमदार आहे.
या ठिकणी भाजप-सेनेची युती तुटली तर भाजपच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते असं चित्र आहे. लोकसभेतील युती कायम राहिली तरीही भाजपचेच पारडे सेनेच्या तुलनेत जड राहणार आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई ठरणार आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक मानले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासारखे वजनदार नेतेमंडळी आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला आपसूकच होईल. या निवडणुकीत भाजप-सेनेची युती होईल, अशीच सध्या चर्चा आहे. त्यामुळे युतीच्या २००९ च्या फॉर्म्युल्यानुसार ११ पैकी 6 मतदारसंघ भाजपकडे तर पाच मतदारसंघ हे शिवसेनेकडे आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेनेच्या जळगाव शहर मतदारसंघात भाजपचा आमदार झाला होता. त्यामुळे जागा वाटप करताना भाजप विद्यमान आमदारांचा मतदारसंघ सेनेला सोडणार नसल्याचे सध्या तरी हे चित्र स्पष्ट आहे.

जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीण मतदारसंघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाल्याने ते निवडणुकीच्या मैदानातून सध्या तरी बाद झाले आहेत. यामुळे तिथे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयाचा मार्ग तूर्ततरी मोकळा दिसतो आहे. मात्र, युती तुटल्यास भाजप देखील या मतदारसंघात आपली ताकद लावून गुलाबराव पाटलांच्या वाटेत काटे पेरल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे जळगाव शहर मतदारसंघातून इच्छुक असलेले सेनेचे माजी मंत्री सुरेश जैन आणि चोपडा मतदारसंघातून सेनेकडून दावेदार असलेले विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांना देखील घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्याने ते रिंगणातून बाद झाले आहेत. त्यामुळे सेनेची डोकेदुखी वाढली आहे. युती तुटली तर जळगाव जिल्ह्यात भाजपच मोठा भाऊ ठरणार असं चित्र आहे...

हेही वाचा... राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा स्वबळाचा नारा; राज्यात 25 जागेवर उमेदवार देणार​​​​​​​

अहमदनगर जिल्हा

राजकीय दृष्ट्या अहमदनगर जिल्ह्याला विशेष महत्व आहे. राजकीय वारसा असलेल्या विखे पाटील आणि थोरात कुटुंबाभोवती बऱ्यापैकी या नगर जिल्ह्याचे राजकारण सुरू असते. नगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ असून, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 5, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 3, सेना 1 असे पक्षीय बलाबल होते.

लोकसभा निवडणुकीनंतर नगर जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे नगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे..येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व 12 जागांवर भाजपची सत्ता असेल, असा चंग राधाकृष्ण विखे पाटील यांनी बांधला आहे. यामुळे साहजिक निवडणूकीच्या रिंगणात असणारे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनाच आवाहन दिल्याचे दिसून येत आहे.

अहमदनगर जिल्हा

तसेच याच जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि शरद पवार यांच्या विश्वासातील मधुकर पिचड यांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे साहजिकच नगर जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांना खिंडार पडले असून याचा फायदा युतीच्या उमेदवाराला होऊ शकतो. नगर जिल्ह्यातील लक्षवेधी लढत कर्जत जानखेड मतदारसंघातील म्हणता येईल. येथे पालकमंत्री राम शिंदें यांच्या विरोधात शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणूकीच्या रिंगणार उतरतील असं म्हटलं जातंय.

हेही वाचा... मनसे निवडणूक लढण्याची शक्यता, राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय​​​​​​​

धुळे जिल्हा
राज्यातल्या सगळ्या मतदारसंघांप्रमाणे धुळे विधानसभा मतदारसंघाकडे देखील सगळ्यांच लक्ष लागून आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 5 विधानसभा मतदारसंघ असून 2014 निवडणुकीचे पक्षीय बलाबल बघितले तर, भाजपने 2 जागांवर तर काँग्रेसने 3 जागांवर विजय मिळवला होता.

धुळे जिल्हा

यंदाच्या निवडणुकीत होणारे बदल हे शिवसेना भाजप युतीवर अवलंबून असणार आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली, आणि याचे श्रेय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जातंय. पालिकेच्या निवडणुकीत महाजन येथे आठ दिवस तळ ठोकून होते. तसेच लोकसभा निवडणुकीत देखील मतदारांचा चांगला जनाधार भाजपला मिळाला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरीश पटेल आणि राजवर्धन पाटील मांडे हे भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असून असे झाल्यास धुळे जिल्ह्यात युतीची ताकद वाढू शकेल. तसेच धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अनिल गोटे हे शिवसेनेतून निवडणूक लढवण्यास उत्सुक असून, मात्र तसे नं झाल्यास गोटे हे अपक्ष निवडणुकीस सामोरे जाऊ शकतील अशी चर्चा सुरू आहे.

नंदुरबार जिल्हा

आदिवासी भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील चारपैकी दोन विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवत भाजपने मागील निवडणुकीत काँग्रेसला हादरा दिला होता. मात्र, त्यानंतर जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने प्राबल्य राखले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हा मतदारसंघ कायम राखला. या निवडणुकीत विधानसभा निहाय घेतलेली मते आगामी निवडणुकीत काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

मागील निवडणुकीत नवापूर आणि धडगाव या दोन जागांवर काँग्रेसने विजय संपादित केला होता. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेसचे मताधिक्य अतिशय कमी झाले. काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने नवीन रणनीती आखली आहे. नवापूरसह संपूर्ण जिल्ह्यावर प्रदीर्घ काळ प्राबल्य राखणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे आमदार सुरूपसिंग नाईक यांनी नवापूरचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. आता पुत्र शिरीष नाईकला काँग्रेसची उमेदवारी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. नाईकांना आव्हान देण्यासाठी भरत गावितांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार शरद गावित यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला असून हा मतदारसंघ काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीला सोडावा, अशी भूमिका घेतली आहे.

नंदुरबार जिल्हा

आमदार चंद्रकांत रघुवंशी हे काँग्रेसचा गड राखण्यासाठी धडपडत आहेत. डॉ. गावित स्वत: शिवसेनेकडून अक्कलकुवा-अक्राणीमधून मैदानात उतरल्यास नंदुरबार विधानसभा मतदारसंघात ते लहान कन्येला पुढे आणतील, अशी चर्चा आहे. एकूणच भाजपची ताकद नंदुरबार जिल्ह्यात वाढत असली तरी काँग्रेसच्या विचार सरणीचा आणि काँग्रेसला मानणारा पारंपरिक मतदार येथे कायम असल्याचे दिसून येतो.

हेही वाचा... आघाडीतील जागावाटप राजू शेट्टी यांना अमान्य; मित्रपक्षांसाठी 60 जागांची मागणी

नाशिक - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे..लोकसभा निवडणुकीनतंर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजप, सेना पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत युतीचे पारडे जड असल्याचे चित्र आहे. एकेकाळी काँग्रेस, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळख असल्याने उत्तर महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादीला विधानसभेच्या निवडणुकीसाठी ताकदीचे उमेदवार मिळणं देखील कठीण झालं आहे.

उत्तर महाराष्ट्र विभाग मतदार संघांचा आढावा

हेही वाचा... पुलवामासारखा प्रकार यावेळी घडला नाही, तर सत्ताबदल झाल्याशिवाय राहणार नाही - पवार

नाशिक जिल्हा

जिल्ह्यात एकूण 15 विधानसभा मतदारसंघ असून,2014 मधील विधानासभा मतदारसंघ पक्षीय बलाबल बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस 4, काँग्रेस 2, भाजप 4, शिवसेना 4, माकप 1 अशी परिस्थिती आहे. आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी युतीच्या उमेदवारांना पसंती दिल्याने नाशिकमधून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि दिंडोरी मतदारसंघातून भाजपच्या भारती पवार मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. असेच चित्र विधानसभेतही दिसेल असं राजकीय जाणकारांचे म्हणणं आहे. नाशिक जिल्ह्यात प्रमुख लढत येवला मतदारसंघात होईल असं दिसतंय, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांचा हा बालेकिल्ला...छगन भुजबळ हे शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात होत होत्या, मात्र भुजबळांनी पुणे येथे झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीला उपस्थित राहत, शिवसेनेत जाणार का ? या प्रश्नाला पूर्णविराम दिला. अस म्हटलं जातंय की, भुजबळांना शिवसेनेतुनच मोठ्या प्रमाणात विरोध झाला. भुजबळांनी सेनेत प्रवेश केल्यास आपलं अस्तित्व धोक्यात येईल या भीतीने नाशिकच्या काही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून भुजबळांना सेनेत येण्यासाठी विरोध केला. तसेच येवला मतदार राष्ट्रवादीकडून भुजबळांनी आपली उमेदवारी जाहीर केली असून त्यांना पक्षातीलच काही नेत्यांनी येवला मतदारसंघातून तिकीट मिळावे म्हणून पक्षाकडे उमेदवारी मगितली आहे.

नाशिक जिल्हा

त्यामुळे भुजबळांना पक्षातूनच काही प्रमाणात विरोध होत असल्याचे चित्र आहे. तसेच लोकसभा निवडणुकीनंतर युतीला मिळालेलं यश बघता भाजप शिवसेनेमधून निवडणूक लढवण्यास अनेक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. यात नाशिक पश्चिम मतदारसंघातून भाजपकडून उमेदवारी मिळावी म्हणून 18 जणांनी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली आहे. अशीच परिस्थिती इतर मतदारसंघांची देखील आहे. तर, दुसरीकडे मनसेने विधानसभा निवडणुकीसंदर्भात कुठलीच भूमिका स्पष्ट नं केल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून येत आहे.

हेही वाचा.. विधानसभेत ईव्हीएम हॅक होणार नाही, त्यामुळे सत्ता आमचीच - प्रकाश आंबेडकर

जळगाव जिल्हा

भाजपचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी, 6 मतदारसंघ भाजप, 3 मतदारसंघात शिवसेनेचे, तसेच उरलेल्या दोन मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचा एक आणि एक अपक्ष आमदार आहे.
या ठिकणी भाजप-सेनेची युती तुटली तर भाजपच्या जागांमध्ये वाढ होऊ शकते असं चित्र आहे. लोकसभेतील युती कायम राहिली तरीही भाजपचेच पारडे सेनेच्या तुलनेत जड राहणार आहे. दुसरीकडे, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी ही निवडणूक अस्तित्त्वाची लढाई ठरणार आहे. सध्या जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचे संकटमोचक मानले जाणारे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन तसेच माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यासारखे वजनदार नेतेमंडळी आहेत. त्यांच्या अनुभवाचा फायदा भाजपला आपसूकच होईल. या निवडणुकीत भाजप-सेनेची युती होईल, अशीच सध्या चर्चा आहे. त्यामुळे युतीच्या २००९ च्या फॉर्म्युल्यानुसार ११ पैकी 6 मतदारसंघ भाजपकडे तर पाच मतदारसंघ हे शिवसेनेकडे आहेत.
२०१४ च्या निवडणुकीत युती तुटल्याने शिवसेनेच्या जळगाव शहर मतदारसंघात भाजपचा आमदार झाला होता. त्यामुळे जागा वाटप करताना भाजप विद्यमान आमदारांचा मतदारसंघ सेनेला सोडणार नसल्याचे सध्या तरी हे चित्र स्पष्ट आहे.

जळगाव जिल्हा

जळगाव ग्रामीण मतदारसंघातून इच्छुक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना घरकुल घोटाळ्यात शिक्षा झाल्याने ते निवडणुकीच्या मैदानातून सध्या तरी बाद झाले आहेत. यामुळे तिथे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्या विजयाचा मार्ग तूर्ततरी मोकळा दिसतो आहे. मात्र, युती तुटल्यास भाजप देखील या मतदारसंघात आपली ताकद लावून गुलाबराव पाटलांच्या वाटेत काटे पेरल्याशिवाय राहणार नाही. त्याचप्रमाणे जळगाव शहर मतदारसंघातून इच्छुक असलेले सेनेचे माजी मंत्री सुरेश जैन आणि चोपडा मतदारसंघातून सेनेकडून दावेदार असलेले विद्यमान आमदार चंद्रकांत सोनवणे यांना देखील घरकुल प्रकरणात शिक्षा झाल्याने ते रिंगणातून बाद झाले आहेत. त्यामुळे सेनेची डोकेदुखी वाढली आहे. युती तुटली तर जळगाव जिल्ह्यात भाजपच मोठा भाऊ ठरणार असं चित्र आहे...

हेही वाचा... राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा स्वबळाचा नारा; राज्यात 25 जागेवर उमेदवार देणार​​​​​​​

अहमदनगर जिल्हा

राजकीय दृष्ट्या अहमदनगर जिल्ह्याला विशेष महत्व आहे. राजकीय वारसा असलेल्या विखे पाटील आणि थोरात कुटुंबाभोवती बऱ्यापैकी या नगर जिल्ह्याचे राजकारण सुरू असते. नगर जिल्ह्यात एकूण 12 विधानसभा मतदारसंघ असून, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप 5, काँग्रेस 3, राष्ट्रवादी 3, सेना 1 असे पक्षीय बलाबल होते.

लोकसभा निवडणुकीनंतर नगर जिल्ह्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासोबत त्यांचा मुलगा सुजय विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. यामुळे नगर जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली आहे..येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सर्व 12 जागांवर भाजपची सत्ता असेल, असा चंग राधाकृष्ण विखे पाटील यांनी बांधला आहे. यामुळे साहजिक निवडणूकीच्या रिंगणात असणारे काँग्रेसचे विरोधी पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनाच आवाहन दिल्याचे दिसून येत आहे.

अहमदनगर जिल्हा

तसेच याच जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि शरद पवार यांच्या विश्वासातील मधुकर पिचड यांनी देखील राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे साहजिकच नगर जिल्ह्यात काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षांना खिंडार पडले असून याचा फायदा युतीच्या उमेदवाराला होऊ शकतो. नगर जिल्ह्यातील लक्षवेधी लढत कर्जत जानखेड मतदारसंघातील म्हणता येईल. येथे पालकमंत्री राम शिंदें यांच्या विरोधात शरद पवार यांचे नातू रोहित पवार निवडणूकीच्या रिंगणार उतरतील असं म्हटलं जातंय.

हेही वाचा... मनसे निवडणूक लढण्याची शक्यता, राज ठाकरे घेणार अंतिम निर्णय​​​​​​​

धुळे जिल्हा
राज्यातल्या सगळ्या मतदारसंघांप्रमाणे धुळे विधानसभा मतदारसंघाकडे देखील सगळ्यांच लक्ष लागून आहे. धुळे जिल्ह्यात एकूण 5 विधानसभा मतदारसंघ असून 2014 निवडणुकीचे पक्षीय बलाबल बघितले तर, भाजपने 2 जागांवर तर काँग्रेसने 3 जागांवर विजय मिळवला होता.

धुळे जिल्हा

यंदाच्या निवडणुकीत होणारे बदल हे शिवसेना भाजप युतीवर अवलंबून असणार आहेत. काही महिन्यांपूर्वी झालेल्या धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपला एकहाती सत्ता मिळाली, आणि याचे श्रेय जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना जातंय. पालिकेच्या निवडणुकीत महाजन येथे आठ दिवस तळ ठोकून होते. तसेच लोकसभा निवडणुकीत देखील मतदारांचा चांगला जनाधार भाजपला मिळाला. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमरीश पटेल आणि राजवर्धन पाटील मांडे हे भाजपमध्ये जाण्यास इच्छुक असून असे झाल्यास धुळे जिल्ह्यात युतीची ताकद वाढू शकेल. तसेच धुळे शहर विधानसभा मतदारसंघातून माजी आमदार अनिल गोटे हे शिवसेनेतून निवडणूक लढवण्यास उत्सुक असून, मात्र तसे नं झाल्यास गोटे हे अपक्ष निवडणुकीस सामोरे जाऊ शकतील अशी चर्चा सुरू आहे.

नंदुरबार जिल्हा

आदिवासी भाग म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या नंदुरबार जिल्ह्यातील चारपैकी दोन विधानसभा मतदारसंघात कमळ फुलवत भाजपने मागील निवडणुकीत काँग्रेसला हादरा दिला होता. मात्र, त्यानंतर जिल्हा परिषद आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने प्राबल्य राखले. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने हा मतदारसंघ कायम राखला. या निवडणुकीत विधानसभा निहाय घेतलेली मते आगामी निवडणुकीत काँग्रेससाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.

मागील निवडणुकीत नवापूर आणि धडगाव या दोन जागांवर काँग्रेसने विजय संपादित केला होता. लोकसभा निवडणुकीत या दोन्ही मतदारसंघांत काँग्रेसचे मताधिक्य अतिशय कमी झाले. काँग्रेसला शह देण्यासाठी भाजपने नवीन रणनीती आखली आहे. नवापूरसह संपूर्ण जिल्ह्यावर प्रदीर्घ काळ प्राबल्य राखणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री माणिकराव गावित यांचे पुत्र भरत गावित यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे आमदार सुरूपसिंग नाईक यांनी नवापूरचे अनेक वर्षे प्रतिनिधित्व केले. आता पुत्र शिरीष नाईकला काँग्रेसची उमेदवारी मिळावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. नाईकांना आव्हान देण्यासाठी भरत गावितांनी कंबर कसली आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार शरद गावित यांनी या मतदारसंघावर दावा सांगितला असून हा मतदारसंघ काँग्रेसऐवजी राष्ट्रवादीला सोडावा, अशी भूमिका घेतली आहे.

नंदुरबार जिल्हा

आमदार चंद्रकांत रघुवंशी हे काँग्रेसचा गड राखण्यासाठी धडपडत आहेत. डॉ. गावित स्वत: शिवसेनेकडून अक्कलकुवा-अक्राणीमधून मैदानात उतरल्यास नंदुरबार विधानसभा मतदारसंघात ते लहान कन्येला पुढे आणतील, अशी चर्चा आहे. एकूणच भाजपची ताकद नंदुरबार जिल्ह्यात वाढत असली तरी काँग्रेसच्या विचार सरणीचा आणि काँग्रेसला मानणारा पारंपरिक मतदार येथे कायम असल्याचे दिसून येतो.

हेही वाचा... आघाडीतील जागावाटप राजू शेट्टी यांना अमान्य; मित्रपक्षांसाठी 60 जागांची मागणी

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.