ETV Bharat / city

करुया संकल्प जलसंवर्धनाचा, नाशिकचा मानाचा राजा मित्र मंडळ कार्यकर्त्यांशी खास बातचीत - nashik water conservation news

मानाचा राजा मित्र मंडळ नाशिक येथे 'करुया संकल्प जलसंवर्धना'चा अंतर्गत कार्यकर्त्यांशी खास संवाद साधण्यात आला. यावेळी पाणी बचतीवर कार्यकर्त्यांनी आपली मतं मांडली

मानाचा राजा मित्र मंडळाच्या कार्यकरत्यांशी संवाद साधताना प्रतिनीधी
author img

By

Published : Sep 5, 2019, 11:05 PM IST

नाशिक - करूया संकल्प जलसंवर्धनाचा मोहिमेअंतर्गत नाशिक येथील प्रसिद्ध मानाचा राजा मित्र मंडळाच्या पदाधिकारी आणि भाविकांशी 'ईटीव्ही भारत'ने संवाध साधला. त्यांना पाणी बचतीबद्दल काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मानाचा राजा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रतिनिधी

मराठवाड्यासोबत नाशिक जिल्ह्याला उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा बसल्या. नाशिकच्या 15 तालुक्यांपैकी 9 तालुक्यात सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून मदत पोहचवली. या काळात अनेक गावातील वाड्या-वस्त्यांवर हजारो टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. सर्वाधिक धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील पेठ, सूरगाणा, हरसूल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीतील नागरिकांना पाण्याच्या एका हंड्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली होती. पाण्याने तळ गाठलेल्या विहिरीत, जीव मुठीत धरून महिला उतरत असल्याचे भीषण वास्तव संपूर्ण महाराष्ट्राने बघितले होते.

ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष होते, त्याप्रकारचे दुर्भिक्ष नाशिक शहराला देखील पाणी कपातीला सामोरे जावे लागले होते. गंगापूर धरणातील पाणी साठा कमी झाल्याने जवळ पास दीड महिना शहरात दिवसातून एकदा पाणी कपात करावी लागली होती. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर महानगर पालिकेने दंडात्मक कारवाई केली होती. यानंतर बहुतांश नाशिककरांनी स्वतः हुन पाणी जपून वापरण्याचा संकल्प करत एक आदर्श निर्माण केला. नेमके पाणी बचतीसाठी नागरिकांनी काय केले हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

नाशिक - करूया संकल्प जलसंवर्धनाचा मोहिमेअंतर्गत नाशिक येथील प्रसिद्ध मानाचा राजा मित्र मंडळाच्या पदाधिकारी आणि भाविकांशी 'ईटीव्ही भारत'ने संवाध साधला. त्यांना पाणी बचतीबद्दल काय वाटते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

मानाचा राजा मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधताना प्रतिनिधी

मराठवाड्यासोबत नाशिक जिल्ह्याला उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा बसल्या. नाशिकच्या 15 तालुक्यांपैकी 9 तालुक्यात सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून मदत पोहचवली. या काळात अनेक गावातील वाड्या-वस्त्यांवर हजारो टँकरने पाणी पुरवठा करण्यात आला. सर्वाधिक धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील पेठ, सूरगाणा, हरसूल, त्र्यंबकेश्वर, इगतपुरीतील नागरिकांना पाण्याच्या एका हंड्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली होती. पाण्याने तळ गाठलेल्या विहिरीत, जीव मुठीत धरून महिला उतरत असल्याचे भीषण वास्तव संपूर्ण महाराष्ट्राने बघितले होते.

ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष होते, त्याप्रकारचे दुर्भिक्ष नाशिक शहराला देखील पाणी कपातीला सामोरे जावे लागले होते. गंगापूर धरणातील पाणी साठा कमी झाल्याने जवळ पास दीड महिना शहरात दिवसातून एकदा पाणी कपात करावी लागली होती. पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर महानगर पालिकेने दंडात्मक कारवाई केली होती. यानंतर बहुतांश नाशिककरांनी स्वतः हुन पाणी जपून वापरण्याचा संकल्प करत एक आदर्श निर्माण केला. नेमके पाणी बचतीसाठी नागरिकांनी काय केले हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

Intro:करूया जलसंवर्धनाचा संकल्प,नाशिकचा मानाचा राजा मित्र मंडळ...


Body:करूया जलसंवर्धनाचा संकल्प या मोहिमे अंतर्गत नाशिक येथील प्रसिद्ध मानाचा राजा मित्र मंडळचे पदाधिकारी आणि भविकांनां पाणी बचती बाबत त्यांना काय वाटते हे ई टीव्ही भारत ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला...

मराठावाड्या सोबत नाशिक जिल्ह्याला देखील मागील उन्हाळ्यात दुष्काळाच्या झळा पोहचल्या नाशिकच्या 15 तालुक्या पैकी 9 तालुक्यात सरकारने कोरडा दुष्काळ जाहीर करून मदत पोहचवली, ह्या काळात अनेक गावातील वाड्या वस्त्यांवर हजारो टँकर ने पाणी पुरवठा करण्यात आल्या,सर्वाधिक धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भाग असलेल्या पेठ,सुरगाणा,हरसूल,त्र्यंबकेश्वर, इगतपुरी भागातील नागरिकांना पाण्याच्या एक हंड्यासाठी पायपीट करण्याची वेळ आली होती,तसेच पाण्याने तळ गाठलेल्या विहिरीत ,जीव मुठीत धरून
महिला विहिरीत उतरत असल्याचे भीषण वास्तव्य संपूर्ण महाराष्ट्राने बघितलं होतं..
ज्या प्रकारे ग्रामीण भागात पाण्याचे दुर्भिक्ष होतं तसेच नाशिक शहराला देखील पाणी कपातीला सामोरं जावं लागलं,गंगापुर धरणातील पाणी साठा कमी झाल्याने जवळ पास दीड महिना शहरात दिवसातून एकदा पाणी कपात करावी लागली होती,तसेच पाण्याचा अपव्यय करणाऱ्या नागरिकांवर महानगर पालिकेनं दंडात्मक कारवाई केली होती..ह्यानंतर बहुतांश नाशिककरांनी स्वतः हुन पाणी जपून वापरण्याचा संकल्प करत एक आदर्श निर्माण केला,नेमकं पाणी बचती साठी नागरिकांनी काय केलं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला..
चौपाल
कपिल भास्कर नाशिक...








Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.