ETV Bharat / city

भोकर तालुक्यातील ५० गावांना भीषण पाणीटंचाईच्या झळा

भोकर तालुक्यात एकूण ५० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई असून केवळ २ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो.

author img

By

Published : Apr 16, 2019, 11:11 AM IST

भोकर गावातील पाणीटंचाई

नांदेड - भोकर तालुक्यातील अनेक वाडी तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावातील जमिनीखालील पाणी पातळी खालावल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला आहे.

भोकर गावातील पाणीटंचाई

तालुक्यातील जांभळी गावातील नागरिकांना पाण्याचा आज काहीच पर्याय उपलब्ध नाही. प्रशासनाने गावाची तहान भागविण्यासाठी एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात केले होते. परंतु, पाणी पातळी खालावल्याने सदरील अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणी उपसा करण्यासाठी नागरिकांना अनेक तास पाण्याची वाट पहावी लागत आहे.

हजारो लोकसंख्या असलेल्या गावात केवळ एकच विहिर अधिग्रहण करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. भोकर तालुक्यात एकूण ५० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई असून केवळ २ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दिवसेंदिवस वाढलेल्या भीषण पाणीटंचाईमुळे अनेक गावातून टँकरची मागणी होत आहे. पाणी टंचाईमुळे गावातील अनेक महिला पुरुषांना घरकाम, मजुरी सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

नांदेड - भोकर तालुक्यातील अनेक वाडी तांड्यावर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तालुक्यातील अनेक गावातील जमिनीखालील पाणी पातळी खालावल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला आहे.

भोकर गावातील पाणीटंचाई

तालुक्यातील जांभळी गावातील नागरिकांना पाण्याचा आज काहीच पर्याय उपलब्ध नाही. प्रशासनाने गावाची तहान भागविण्यासाठी एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात केले होते. परंतु, पाणी पातळी खालावल्याने सदरील अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणी उपसा करण्यासाठी नागरिकांना अनेक तास पाण्याची वाट पहावी लागत आहे.

हजारो लोकसंख्या असलेल्या गावात केवळ एकच विहिर अधिग्रहण करण्यात आली आहे. यामुळे तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. भोकर तालुक्यात एकूण ५० गावांमध्ये भीषण पाणीटंचाई असून केवळ २ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. दिवसेंदिवस वाढलेल्या भीषण पाणीटंचाईमुळे अनेक गावातून टँकरची मागणी होत आहे. पाणी टंचाईमुळे गावातील अनेक महिला पुरुषांना घरकाम, मजुरी सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. याकडे प्रशासनाने वेळीच लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.

Intro:नांदेड - भोकर तालुक्यातील 50 गावांमध्ये भीषण पाणीटंचाई.

नांदेड : एप्रिल महिना सुरू असून भोकर तालुक्यातील अनेक वाडी तांड्यावर भीषण पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. तालुक्यातीलअनेक गावातील पाणी पातळी खालावल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला आहे.Body:
हे चित्र भोकर तालुक्यातील जांभळी गावातील असून या गावातील नागरिकांना पाण्याचा आज काहीच पर्याय उपलब्द नसल्याने प्रशासनाणे गावची तहान भागविण्यासाठी एका विहिरीचे अधिग्रहण करण्यात आले असून पाणी पातळी खालावल्याने सदरील अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणी उपसा करण्यासाठी नागरिकांना अनेक तास पाण्याची वाट पहावी लागत आहे.Conclusion:हजारो लोकसंख्या असलेल्या या गावात केवळ एकचं विहीर अधिग्रहण केली आहे यामुळे तालुक्यातील अनेक गावातील नागरिकांना पाण्याच्या झळा सोसाव्या लागत आहेत. भोकर तालुक्यात एकूण 50 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई असून केवळ दोन गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो दिवसेंदिवस वाढलेली भीषण पाणीटंचाईमुळे अनेक गावातून टँकर ची मागणी होत आहे.पाणी टंचाईमुळे गावातील अनेक महिला पुरुषांना घरकाम, मजुरी सोडून पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.याकडे प्रशासनने लक्ष देणे आवश्यक आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.