ETV Bharat / city

Narendra Modi Birthday देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढदिवस साजरा करण्यासाठी तो करणार 2 हजार किलोमीटरची पदयात्रा

author img

By

Published : Aug 13, 2022, 5:37 PM IST

Updated : Aug 13, 2022, 9:34 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोदी भक्त तरुण तब्बल 2 हजार किलोमीटरची यात्रा करत दिल्लीच्या दिशेने निघाला आहे नरेंद्र मोदींच्या Narendra Modi यांचा वाढदिवस साजरा करण्याचे फलक घेऊन शहरा शहरातून पायदळ वाट काढत नागपूरातून पुढच्या प्रवासात रवाना झाला आहे.

Narendra Modi Birthday दे
Narendra Modi Birthday दे

नागपूर आझादीच्या अमृतमहोत्सवी वर्षात Amritmahotsav of Azadi देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोदी भक्त तरुण तब्बल 2 हजार किलोमीटरची यात्रा करत दिल्लीच्या दिशेने निघाला आहे नरेंद्र मोदींच्या यांचा वाढदिवस साजरा करण्याचे फलक घेऊन शहरा शहरातून पायदळ वाट काढत नागपूरातून पुढच्या प्रवासात रवाना झाला आहे. 60 दिवस रोज पायदळ चालून तो 17 सप्टेंबरला दिल्लीला पोहचणार आहे. सर्जिकल स्ट्राईक, राम मंदिर, कलम 370 यासह अनके देशहिताच्या निर्णयाला भावून त्याने पायदळ यात्रा करण्याचा निर्णय घेतला. त्याच्याबद्दल जाणून घेऊ या खास रिपोर्ट मधून

Narendra Modi Birthday दे

मूळचा आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा जिल्ह्यातील बदवेलचा 32 वर्षीय हा पथीपती नरसिम्हां असे या तरुणांचे नाव आहे. अंगात सदरा आणि पांढरी धोती, गळ्यात भगवा दुपट्टा, खांद्यावर एक बॅग, हातात छत्री असा पेहराव पाहून तुम्हाला हा तरुण ग्रामीण भागातून आलेला वाटत असला तरी तो एमबीए केले आहे. सध्या तो हॉटेल व्यस्थापन व्यवसायात कार्यरत आहे. नौकरीवर असतांना दोन महिन्याची सुट्टी घेऊन 2 हजार किलोमीटरची पदयात्रा करण्याचा निश्चय केला. 17 जुलैला पदयात्रा सुरू केली आहे. यात 17 सप्टेंबरला दिल्लीत पोहोचण्याच मानस आहे. सध्या त्याने जवळपास 930 किलोमीटर अंतर पायदळ चालून तो नागपुरला पोहचला आहे.


असा असतो प्रवास रोज सकाळी उठून साधारण 5 ते 6 वाजता दिल्लीची वाट जवळ करण्यासाठी आपला प्रवास सुरु करतो. या दरम्यान चहा नास्ता घेतो. शक्य तिथे जेवण करणे, रात्री भाजपच्या पदाधिकरी भेटल्यास त्यांनी व्यवस्था केल्यास राहतात. यात कुठली व्यवस्था न झाल्यास शक्य तिथे कधी मंदिर कधी पेट्रोलपंप त्या ठिकाणी आपला मुक्काम करत आपला प्रवास सुरु करतो. आपला मार्ग निवडताना गुगलमॅपच्या साह्याने मोबाईलवरन प्रवासाची दिशा ठरवतो.

या प्रवासात मागील काही दिवसात सतत सुरू असलेल्या पावसामुळे व्यत्यय आला. पण या परिस्थितीत हातात छत्री घेऊन त्याने पायदळ प्रवास थांबवला नाही. कुठल्याही परिस्थितीत 17 सप्टेंबरला दिल्लीत पोहचणे हेच एक लक्ष ठेवून तो चालत आहे. काहींनी त्याला हिनवले, काहींनी वाटेत त्रास देण्याचा प्रयत्न केला पण त्याचे पाय थांबले नाही. काहींनी आमिष देत परत जाण्यास सांगितले. काही वाईट अनुभव वाटेत आले. पण मागे फिरून न पाहता पथीपती पुढे चालत राहिला.

हेही वाचा - Har Ghar Tiranga जाणून घ्या ध्वजारोहण करतानाचे नियम

नागपूर आझादीच्या अमृतमहोत्सवी वर्षात Amritmahotsav of Azadi देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी Prime Minister Narendra Modi यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मोदी भक्त तरुण तब्बल 2 हजार किलोमीटरची यात्रा करत दिल्लीच्या दिशेने निघाला आहे नरेंद्र मोदींच्या यांचा वाढदिवस साजरा करण्याचे फलक घेऊन शहरा शहरातून पायदळ वाट काढत नागपूरातून पुढच्या प्रवासात रवाना झाला आहे. 60 दिवस रोज पायदळ चालून तो 17 सप्टेंबरला दिल्लीला पोहचणार आहे. सर्जिकल स्ट्राईक, राम मंदिर, कलम 370 यासह अनके देशहिताच्या निर्णयाला भावून त्याने पायदळ यात्रा करण्याचा निर्णय घेतला. त्याच्याबद्दल जाणून घेऊ या खास रिपोर्ट मधून

Narendra Modi Birthday दे

मूळचा आंध्र प्रदेश राज्यातील कडप्पा जिल्ह्यातील बदवेलचा 32 वर्षीय हा पथीपती नरसिम्हां असे या तरुणांचे नाव आहे. अंगात सदरा आणि पांढरी धोती, गळ्यात भगवा दुपट्टा, खांद्यावर एक बॅग, हातात छत्री असा पेहराव पाहून तुम्हाला हा तरुण ग्रामीण भागातून आलेला वाटत असला तरी तो एमबीए केले आहे. सध्या तो हॉटेल व्यस्थापन व्यवसायात कार्यरत आहे. नौकरीवर असतांना दोन महिन्याची सुट्टी घेऊन 2 हजार किलोमीटरची पदयात्रा करण्याचा निश्चय केला. 17 जुलैला पदयात्रा सुरू केली आहे. यात 17 सप्टेंबरला दिल्लीत पोहोचण्याच मानस आहे. सध्या त्याने जवळपास 930 किलोमीटर अंतर पायदळ चालून तो नागपुरला पोहचला आहे.


असा असतो प्रवास रोज सकाळी उठून साधारण 5 ते 6 वाजता दिल्लीची वाट जवळ करण्यासाठी आपला प्रवास सुरु करतो. या दरम्यान चहा नास्ता घेतो. शक्य तिथे जेवण करणे, रात्री भाजपच्या पदाधिकरी भेटल्यास त्यांनी व्यवस्था केल्यास राहतात. यात कुठली व्यवस्था न झाल्यास शक्य तिथे कधी मंदिर कधी पेट्रोलपंप त्या ठिकाणी आपला मुक्काम करत आपला प्रवास सुरु करतो. आपला मार्ग निवडताना गुगलमॅपच्या साह्याने मोबाईलवरन प्रवासाची दिशा ठरवतो.

या प्रवासात मागील काही दिवसात सतत सुरू असलेल्या पावसामुळे व्यत्यय आला. पण या परिस्थितीत हातात छत्री घेऊन त्याने पायदळ प्रवास थांबवला नाही. कुठल्याही परिस्थितीत 17 सप्टेंबरला दिल्लीत पोहचणे हेच एक लक्ष ठेवून तो चालत आहे. काहींनी त्याला हिनवले, काहींनी वाटेत त्रास देण्याचा प्रयत्न केला पण त्याचे पाय थांबले नाही. काहींनी आमिष देत परत जाण्यास सांगितले. काही वाईट अनुभव वाटेत आले. पण मागे फिरून न पाहता पथीपती पुढे चालत राहिला.

हेही वाचा - Har Ghar Tiranga जाणून घ्या ध्वजारोहण करतानाचे नियम

Last Updated : Aug 13, 2022, 9:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.